शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

११ लाख वाहनांमुळे कोंडला छत्रपती संभाजीनगरचा श्वास; ‘पीयूसी’कडे दुर्लक्ष, प्रदूषणाला हातभार

By संतोष हिरेमठ | Updated: November 30, 2024 19:42 IST

छत्रपती संभाजीनगरात एका चौकात मिनिटाला धावतात ९५ वाहने

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहराच्या हवेची गुणवत्ता संवेदनशील बनली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालात गंभीर शेरा असून, शहर राज्यात चौथ्या क्रमाकांवर आहे. धूळ, घनकचरा, प्लास्टिकचा वापर, औद्योगिक वसाहतींसह वाहनांची वाढती संख्या प्रदूषणाला हातभार लावत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. वाहनांमधून निघणाऱ्या धुरात विविध प्रकारचे रासायनिक घटक असतात, जे आरोग्यासाठी हानीकारक ठरतात.

जिल्ह्यातील वाहनांची संख्या तब्बल २२ लाखांवर गेली असून, यातील ५० टक्के वाहने शहरातील रस्त्यांवर धावतात. शहरातील एका चौकात मिनिटाला ९५ वाहने धावत असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत आढळून आले. यातील अनेक वाहने धूर ओकत धावत होती. सिग्नलवर उभ्या काही वाहनांच्या नंबरवरून ‘पीयूसी’ची पडताळणी केली असता, काही वाहने ‘पीयूसी’शिवाय धावत असल्याचे आढळले. बाहेरगावाहून येणारी अवजड वाहने, मालवाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणाने शहरवासीयांचा ‘श्वास’ कोंडत आहे.

दुचाकीधारकांचे ‘पीयूसी’कडे दुर्लक्षचप्रत्येक वाहनाची पीयूसी तपासणी करणे गरजेचे आहे. परंतु हा नियम केवळ चारचाकींसाठीच असल्याची सध्या तरी परिस्थिती आहे. दुचाकी घेतल्यानंतर पुन्हा कधीच पीयूसी काढली जात नाही. शहरात विनापीयूसी धावणाऱ्या वाहनांमध्ये दुचाकींची संख्या सर्वाधिक आहे.

जुगाड करून मिळते ‘पीयूसी’एखाद्या वाहनाला ‘पीयूसी’ नाकारणे, हे क्वचितच होते. जुने वाहन असले तरी सहजपणे ‘पीयूसी’ प्रमाणपत्र मिळत असल्याची स्थिती आहे. ‘पीयूसी’ देणाऱ्या केंद्रांची तपासणी करण्याची खरी आवश्यकता आहे.

‘पीयूसी’ नसलेल्यांना ७२ लाखांचा दंडआरटीओ कार्यालयाने एप्रिलपासून आतापर्यंत ‘पीयूसी’ नसलेल्या २ हजार ३६७ वाहनांना ७२ लाख ९० हजार ५०० रुपये दंड ठोठावला. आतापर्यंत ६९ लाख ३५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला.

पीयूसी सेंटरची संख्या-४०जिल्ह्यातील वाहनांची संख्याडिझेल वाहने - १,२१,४१३पेट्रोल वाहने- २०,७५,८७७एलपीजी वाहने- १३,९५८सीएनजी वाहने- ८,७५०इलेक्ट्रिक वाहने- ३२,०४५इतर- ९,६५१

वर्षाला ७० हजार ते ८७ हजार वाहनांची भरदरवर्षी ७० हजार ते ८५ हजार वाहनांची भर पडत आहे. जिल्ह्यात २०२२-२३ या आर्थिक वर्षात तब्बल ८२ हजार ५२९ नवीन वाहने दाखल झाली. तर २०२३-२४ या आर्थिक वर्षात ८७ हजार ५६६ नवी वाहने रस्त्यावर आली.

प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे यांना सवालप्रश्न : ‘पीयूसी’ नसलेल्या वाहनांवर काय कारवाई होते?काठोळे : ‘पीयूसी’ नसलेल्या वाहनांवर नियमितपणे कारवाई केली जाते. ‘पीयूसी’ नसेल तर वाहन मालकाला २ हजार रुपये दंड होतो. वाहन अन्य व्यक्ती चालवत असेल तर ४ हजार रुपये दंड होतो.

प्रश्न : शहरात धूर सोडत धावणारी वाहने दिसतात?काठोळे : प्रत्येक वाहनधारकांनी ‘पीयूसी’ काढावी. वाहन धूर सोडत असेल तर दुरुस्ती केली पाहिजे. त्यानंतर ‘पीयूसी’ काढावे.

प्रश्न : जुन्या वाहनांची संख्या अधिक आहे का?काठोळे : जुन्या वाहनांचे प्रमाण कमी आहे. वाहन संख्या सुरुवातीपासूनची आहे. त्यातील अनेक वाहने आज रस्त्यावर नाहीत. जुन्या वाहनांची संख्या खूप कमी आहे.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरpollutionप्रदूषणTrafficवाहतूक कोंडी