शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

'पोलिसांना जातो दरमहा ८० लाख रुपयांचा हप्ता'; अंबादास दानवेंनी यादीच दाखवली

By बापू सोळुंके | Updated: April 20, 2023 19:28 IST

यासोबतच तीन खाजगी व्यक्तींची नावे जाहीर करीत या लोकांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी अंबादास दानवे यांनी केली.

छत्रपती संभाजीनगर: शहरातील विविध अवैध धंदेवाल्यांकडून पोलिसांना हाप्ते देण्यात येतात. या वसुलीतून महिन्याकाठी ६० ते ८० लाखांचा हप्ता पोलिसांना मिळतो,असा आरोप करीत विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते आ. अंबादास दानवे यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत हप्ते देणाऱ्या अवैध धंदेवाल्यांची यादीच जाहीर केल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. यासोबतच तीन खाजगी व्यक्तींची नावे जाहीर करीत या लोकांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी दानवे यांनी केली.

आ. दानवे यांनी  तीन दिवसापूर्वी पोलीस महासंचालकांना पत्र पाठवून शहरातील अवैध धंदे वाल्यांकडून शहर पोलिसांकडून सुरू असलेल्या हाप्तेखोरीबद्दल तक्रार केली होती. यापार्श्वभूमीवर गुरूवारी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शहरातील वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यांतर्गत गुटखा व्यापारी, गावठी दारू, मटकाचालक, अनधिकृत लॉटरी,मुरूम तस्करी, वाइन शॉप, बीअर शॉपीचालक, वाळू व्यवसायिकांकडून पोलिसांना किती हाप्ता मिळतो, याची माहिती दिली. यावेळी त्यांनी कोण, किती हाप्ता देतो,याबाबतची यादीच जाहिर केली. एवढेच नव्हे तर तीन खाजगी व्यक्तीमार्फत ही वसुली केली जात असल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले. शहरात टाचणी जरी पडली तरी पोलिस आयुक्तांना माहिती व्हायला हवे, असे असताना एवढी मोठी हाप्तेखोरी सुरू असेल आणि याची पोलीस आयुक्तांना माहिती नसावी, का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. जर पोलीस आयुक्तांना हे माहिती नसेल तर त्यांनी तात्काळ कारवाई करून हे थांबवावे,अशी आपली मागणी असल्याचे त्यांनी नमूद केले.

किराडपुरा जाळपोळीस पोलिसही जबाबदारआज गुरूवारी पुन्हा पत्रकार परिषदेत शहर पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्हं उपस्थित केले. ते म्हणाले की, किराडपुरा जाळपोळ घटना घडण्यापूर्वी सायंकाळी ७ वाजता झालेल्या भांडणानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली असती तर रात्री दिड वाजेची घटना घडली नसती. एवढेच नव्हे दिड वाजता जेव्हा मोठा जमाव चालून आला तेव्हा पोलीस नियंत्रण कक्षाला नागरीकांनी आणि पोलिसांनी अनेक कॉल केले. नियंत्रण कक्षातील पोलिसांनीही पोलीस आयुक्तांना कॉल केला होता, मात्र त्यांनी दिड तास प्रतिसाद दिला नव्हता, यामुळे याघटनेस समाजकंटकासोबतच शहर पोलीसही जबाबदार असल्याचा आरोप दानवे यांनी केला.

टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवेAurangabadऔरंगाबादPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी