शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

'पोलिसांना जातो दरमहा ८० लाख रुपयांचा हप्ता'; अंबादास दानवेंनी यादीच दाखवली

By बापू सोळुंके | Updated: April 20, 2023 19:28 IST

यासोबतच तीन खाजगी व्यक्तींची नावे जाहीर करीत या लोकांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी अंबादास दानवे यांनी केली.

छत्रपती संभाजीनगर: शहरातील विविध अवैध धंदेवाल्यांकडून पोलिसांना हाप्ते देण्यात येतात. या वसुलीतून महिन्याकाठी ६० ते ८० लाखांचा हप्ता पोलिसांना मिळतो,असा आरोप करीत विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते आ. अंबादास दानवे यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत हप्ते देणाऱ्या अवैध धंदेवाल्यांची यादीच जाहीर केल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. यासोबतच तीन खाजगी व्यक्तींची नावे जाहीर करीत या लोकांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी दानवे यांनी केली.

आ. दानवे यांनी  तीन दिवसापूर्वी पोलीस महासंचालकांना पत्र पाठवून शहरातील अवैध धंदे वाल्यांकडून शहर पोलिसांकडून सुरू असलेल्या हाप्तेखोरीबद्दल तक्रार केली होती. यापार्श्वभूमीवर गुरूवारी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शहरातील वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यांतर्गत गुटखा व्यापारी, गावठी दारू, मटकाचालक, अनधिकृत लॉटरी,मुरूम तस्करी, वाइन शॉप, बीअर शॉपीचालक, वाळू व्यवसायिकांकडून पोलिसांना किती हाप्ता मिळतो, याची माहिती दिली. यावेळी त्यांनी कोण, किती हाप्ता देतो,याबाबतची यादीच जाहिर केली. एवढेच नव्हे तर तीन खाजगी व्यक्तीमार्फत ही वसुली केली जात असल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले. शहरात टाचणी जरी पडली तरी पोलिस आयुक्तांना माहिती व्हायला हवे, असे असताना एवढी मोठी हाप्तेखोरी सुरू असेल आणि याची पोलीस आयुक्तांना माहिती नसावी, का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. जर पोलीस आयुक्तांना हे माहिती नसेल तर त्यांनी तात्काळ कारवाई करून हे थांबवावे,अशी आपली मागणी असल्याचे त्यांनी नमूद केले.

किराडपुरा जाळपोळीस पोलिसही जबाबदारआज गुरूवारी पुन्हा पत्रकार परिषदेत शहर पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्हं उपस्थित केले. ते म्हणाले की, किराडपुरा जाळपोळ घटना घडण्यापूर्वी सायंकाळी ७ वाजता झालेल्या भांडणानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली असती तर रात्री दिड वाजेची घटना घडली नसती. एवढेच नव्हे दिड वाजता जेव्हा मोठा जमाव चालून आला तेव्हा पोलीस नियंत्रण कक्षाला नागरीकांनी आणि पोलिसांनी अनेक कॉल केले. नियंत्रण कक्षातील पोलिसांनीही पोलीस आयुक्तांना कॉल केला होता, मात्र त्यांनी दिड तास प्रतिसाद दिला नव्हता, यामुळे याघटनेस समाजकंटकासोबतच शहर पोलीसही जबाबदार असल्याचा आरोप दानवे यांनी केला.

टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवेAurangabadऔरंगाबादPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी