शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

विद्यापीठाच्या पदव्युत्तर परीक्षांच्या वेळापत्रकात बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 19:45 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने जाहीर केलल्या मुदतपूर्व परीक्षांचे वेळापत्रक पुढे ढकलले आहे.

ठळक मुद्देविद्यापीठ प्रशासनाने २०१७-१८ च्या पदव्युत्तर प्रवेश सीईटीद्वारे देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र यात झालेल्या गोंधळामुळे पदव्युत्तरचे प्रवेश तब्बल दोन महिने उशीराने झाले.२६ मार्चपासून सुरु होणार्‍या पदव्युत्तरच्या परीक्षा आता ७ एप्रिलपासून सुरु होणार

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्यापरीक्षा विभागाने जाहीर केलल्या मुदतपूर्व परीक्षांचे वेळापत्रक पुढे ढकलले आहे. २६ मार्चपासून सुरु होणार्‍या पदव्युत्तरच्या परीक्षा आता ७ एप्रिलपासून सुरु होणार असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके यांनी दिली.

विद्यापीठ प्रशासनाने २०१७-१८ च्या पदव्युत्तर प्रवेश सीईटीद्वारे देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र यात झालेल्या गोंधळामुळे पदव्युत्तरचे प्रवेश तब्बल दोन महिने उशीराने झाले. याचा परिणाम पहिल्या सत्राच्या परीक्षांवर झाला. तिसर्‍या सत्राच्या परीक्षा डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच घेण्यात आल्या. तर प्रथम सत्राच्या परीक्षा डिसेंबरअखेर घेण्यात आल्या. यामुळे दुसर्‍या सत्राच्या अभ्यासक्रमाला नविन वर्षातच सुरुवातच झाली. यामुळे पदव्युत्तरच्या दुसर्‍या सत्राच्या परीक्षा एप्रिल महिन्याच्या शेवटी होण्याची शक्यता होती. मात्र परीक्षा विभागाने २६ मार्चपासूनच परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले. याविरोधात समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कुलगुरू, प्रकुलगुरू आणि परीक्षा संचालकांना निवेदन देत परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. यावर ‘लोकमत’मध्ये १८ मार्च रोजी प्रकाश टाकण्यात आला होता. यानंतर विद्यार्थी संघटनांनी आग्रही मागणी केल्यामुळे परीक्षा विभागाने वेळापत्रकामध्ये बदल केला आहे. नवीन वेळापत्रकानुसार २६ मार्चपासून सुरु होणार्‍या परीक्षा ७ एप्रिलपासून होणार असल्याची माहिती संचालक डॉ. नेटके यांनी दिली. 

पदवी परीक्षेत ३४० एमपी केसपदवी परीक्षेत १९ ते २१ मार्च या तीन दिवसात चार जिल्ह्यामध्ये तब्बल ३४० कॉपी करत असलेल्या विद्यार्थ्यांवर कारवाई (एमपी) करण्यात आली आहे. यावर्षीपासून परीक्षा विभागाने उपस्थित विद्यार्थ्यांची माहिती सूद्धा आॅनलाईन मागविण्यात आली. यात तीन्ही दिवसात १४ हजार १३१ विद्यार्थ्यांनी परीक्षेला दांडी मारली असल्याची माहितीही डॉ. नेटके यांनी दिली.

अधिसभेत परीक्षा विभागाचा ठरावदोन दिवसांपूर्वी झालेल्या विद्यापीठाच्या अधिसभा बैठकीत परीक्षा विभागाने प्रत्येक वर्षी पदवी परीक्षांमध्ये उडणारे गोंधळ पूर्णपणे थांबवले आहेत. तसेच कॉपीमुक्त परीक्षेसाठी अभियान राबविण्यात येत असून, परीक्षा हॉलमध्ये मोबाईल घेऊन जाण्यास पूर्णपणे बंदी घातली. यामुळे परीक्षा विभागाच्या अभिनंदनाचा ठराव डॉ. बाबासाहेब कोकाटे यांनी मांडला. तो बहुमताने मंजूर झाला आहे. 

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादexamपरीक्षाStudentविद्यार्थीuniversityविद्यापीठ