शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे काय होणार? आज ‘सर्वोच्च’ फैसला
2
आजचे राशीभविष्य, २८ नोव्हेंबर २०२५: संयम राखा आणि विचारपूर्वक व्यवहार करा!
3
२ मोठे नेते, २ दावे...राज्यात २ डिसेंबरनंतर राजकीय भूकंप?; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू
4
पहाटे ५ वाजता शिंदेसेनेच्या आमदाराच्या घरी १०० पोलिसांची धाड; घराची झाडाझडती, भाजपावर आरोप
5
महाराष्ट्रासह १० राज्यांतील मेडिकल कॉलेजांवर ईडीचे छापे; ३६ जणांवर गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?
6
राज-उद्धव ठाकरे भेट, ‘शिवतीर्थ’वर बंद दाराआड २ तास चर्चा; एकजुटीने महायुतीला थोपवण्याचा निर्णय?
7
इमारतींच्या छतांवर आणि महामार्गावर आता ‘नो होर्डिंग्ज; मुंबई महापालिकेचे जाहिरात धोरण जाहीर
8
दिशा सालियन आत्महत्या प्रकरणी हायकोर्टाचा पोलिसांना सवाल; "मृत्यूला ५ वर्ष झाली, आणखी किती..."
9
सिंधुदुर्गनंतर बदलापूरात पैसे वाटताना रंगेहाथ पकडले; महायुतीत शिंदेसेना-अजित पवार गटात जुंपली
10
श्रेयवाद, आरोप प्रत्यारोप अन् ‘अरे’ला ‘कारे’ने उत्तर; सत्ताधारी भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष वाढला
11
खराब हवेचे खापर इथिओपियातील ज्वालामुखीवर फोडू नका; प्रदूषणावरून हायकोर्टाने सरकारला सुनावले
12
गर्जेच्या शरीरावरही जखमा, संवादाचे रेकॉर्डिंग पोलिसांकडे; दाेन डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी 
13
ठाण्याची झणझणीत मिसळ की पुण्याचे श्रीखंड; शंभराव्या मराठी साहित्य संमेलनासाठी रस्सीखेच?
14
१०० वर्षांनी पंचग्रही योग, २०२६ला ७ राशींची मनासारखी कमाई; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-लाभ भरभराट!
15
ट्रेनमध्ये प्रवास करताना नेटवर्क का जाते? इंटरनेट का होते स्लो? जाणून घ्या 'या' समस्येवरचा उपाय
16
एकपेक्षा जास्त लग्न करणे गुन्हा...'या' राज्यात विधेयक मंजूर; दंडासह कठोर शिक्षेची तरतूद
17
ॲपल अडकली? भारतात ₹३.२० लाख कोटी दंडाची टांगती तलवार; कायदा बदलला अन्...
18
३०० सीट वाढणार, ४ कोच कायमस्वरुपी जोडले जाणार; वंदे भारत ट्रेनला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद
19
मन हेलावून टाकणारी घटना...! पती, पत्‍नी, प्रियकर अन् एक अजब करार...! सर्वत्र होतेय चर्चा 
20
टाटा सिएरा खरेच ₹११.४९ लाखांना मिळणार? नेक्सॉन, हॅरिअरलाच खाऊन टाकणार..., हो, नाही...
Daily Top 2Weekly Top 5

जनभावनेनुसार कायद्यात बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 00:58 IST

जनभावनेनुसार प्रत्येक कायद्यात बदल होतात. सरकारसोबत राहिल्यास निश्चित फायदाच होईल, असे आश्वासन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : वस्तू व सेवा कर (जीएसटी) मध्ये सुधारणा, बदल होतीलच असे आश्वासन आताच देता येणार नाहीत; परंतु जनभावनेनुसार प्रत्येक कायद्यात बदल होतात. सरकारसोबत राहिल्यास निश्चित फायदाच होईल, असे आश्वासन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी शुक्रवारी रात्री ‘जीएसटी फिडबॅक’ या वस्तू व सेवा कर विभागातर्फे आयोजित कार्यक्रमात दिले. टेक्सटाइल्स क्षेत्रात विरोध होतो आहे; परंतु त्यावरही तोडगा निघेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. एमजीएमच्या रुक्मिणी सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला महापौर भगवान घडमोडे, भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, खा. चंद्रकांत खैरे, आ. नारायण कुचे, आयुक्त मेहर, संयुक्त आयुक्त दीपा मुधोळ, एस. बी. देशमुख, उद्योजक मानसिंग पवार, विवेक देशपांडे, राम भोगले यांच्यासह शहरातील सीएमआयए, मसिआ, जिल्हा व्यापारी महासंघाचे प्रतिनिधी तथा ट्रान्सपोर्ट क्षेत्रातील व्यापाऱ्यांची उपस्थिती होती. देशभरात केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत जीएसटी फिडबॅकचे २०० ठिकाणी कार्यक्रम होतील. त्यातील सूचना, बदलांच्या मागण्यांचा अहवाल जीएसटी कौन्सिलकडे सादर केला जाईल. त्यानंतर पुढील निर्णय होतील, असे स्पष्ट करून गृहराज्यमंत्री अहिर म्हणाले, जीएसटीबाबत अनेक भीतीदायक अफवा पसरविल्या जात आहेत. ३६ वेळा रिटर्न्स दाखल करण्याची गरज नाही. एकदा दाखल केले तरी चालेल. ५२ हजार अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. टॅक्स देणारा, न देणारा आणि हातचे राखून टॅक्स देणारा असे तीन वर्ग देशात आहेत. ६ कोटी व्यापाऱ्यांपैकी ८५ लाख व्यापाऱ्यांनी नोंदणी केली आहे. पारदर्शकता आणणे हा उद्देश जीएसटीच्या अमलामागे आहे. ९० टक्के वस्तूंवर जास्त जीएसटी नाही. जीएसटीमुळे निर्यात वाढीला चालना मिळेल, असा दावा त्यांनी केला.अपील कार्यालय औरंगाबादेत हवेखा. खैरे यांनी नाशिकचे अपील कार्यालय औरंगाबादेत असावे. औरंगाबादच्या व्यापाऱ्यांनी नाशिकला का जावे, असा प्रश्न त्यांनी केला. विभागाचे आयुक्त मेहर यांची मेरठला बदली झाली आहे. ते कार्यमुक्त होतील, तत्पूर्वी जीएसटीच्या बाबतीत केलेल्या मागण्या पूर्ण होतील, जीएसटीमध्ये इन्स्पेक्टरराजचा धाक नसावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.