शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
3
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
4
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
5
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
6
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
7
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
8
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
9
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
10
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
11
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
12
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
13
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
14
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
15
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
16
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
17
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
18
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
19
पॅरिसमधील संग्रहालयात ‘धूम’स्टाईल चोरी, मौल्यवान रत्ने लांबवली, अखेर असे सापडले चोर  
20
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

शिवरायांच्या पुतळा अनावरणाची मध्यरात्रीची वेळ बदला; शिवजयंती महोत्सव समितीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2022 16:54 IST

राजकीय कार्यक्रमांना परवानगी आणि शिवप्रेमींना गुन्हे दाखल करण्याची धमकी

औरंगाबाद : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण मूक पद्धतीने होऊच शकत नाही. यामुळे क्रांती चौकातील शिवरायांच्या पुतळा अनावरण सोहळ्याची मध्यरात्रीची वेळ बदला; अन्यथा रात्री १० वाजल्यानंतर शिवप्रेमींना वाद्य वाजविण्याची परवानगी द्या, अशी मागणी जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष अभिजित देशमुख आणि माजी अध्यक्ष विनोद पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली.

क्रांती चौकातीलछत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण उद्या, शुक्रवारी मध्यरात्री करण्यात येणार असल्याचे महापालिकेने मंगळवारी (दि. १५) जाहीर केले. रात्री दहानंतर वाद्य वाजविण्यावर सर्वोच्च न्यायालयाचे निर्बंध आहेत. शिवजयंतीची जय्यत करणारे शिवप्रेमी क्रांती चौकातील शिवस्मारकाच्या अनावरण समारंभाचीही आतुरतेने प्रतीक्षा करीत आहेत. शिवस्मारकाचे अनावरण मोठ्या जल्लोषात व्हावे, अशी लाखो शिवप्रेमींची इच्छा आहे. असे असताना मध्यरात्री मूक पद्धतीने अनावरण सोहळ्याचे आयोजन कशासाठी करण्यात आले आह? असा सवाल विनोद पाटील यांनी केला.

ते म्हणाले की, राज्यात विधान परिषद, काही जिल्हा परिषदा, ग्रामपंचायती, जिल्हा बँका आणि दूध संघांच्या निवडणुका झाल्या, तेव्हाच्या गर्दीत कोरोना पसरला नाही. आता परिपत्रक काढून शिवप्रेमींवर निर्बंध लादून गुन्हे दाखल करण्याचा इशारा देणे, हे अन्यायकारक आहे. शिवजयंतीनिमित्त मराठा क्रांती मोर्चाने आयोजित केलेल्या वाहन रॅलीला पोलिसांनी परवानगी नाकारली. यामुळे बुधवारची रॅली रद्द करण्यात आली. एवढेच नव्हे तर कार्यकर्त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. शिवसेनेनेही ‘एक राजा - एक जयंती’ या तत्त्वानुसार १९ फेब्रुवारी रोजीच्या शिवजयंतीत सहभागी व्हावे, असे आवाहन आम्ही करतो. शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण कोणाच्या हस्ते करायचे, हा प्रशासनाचा निर्णय आहे. या पत्रकार परिषदेला महाेत्सव समितीचे राजू शिंदे, मनोज पाटील, प्रा. चंद्रकांत भराट, सुरेश वाकडे, मनोज गायके, सुमित खांबेकर, राजगौरव वानखेडे आणि अप्पासाहेब कुढेकर उपस्थित होते.

आम्ही सायंकाळपासून जल्लोष करणारशिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण मध्यरात्री असले तरी जिल्हा शिवजयंती महोत्सव समिती दुपारी चार वाजल्यापासूनच क्रांती चौकात जल्लोषाला सुरुवात करील. शासनाने शिवप्रेमींच्या भावना लक्षात घेऊन विशेष बाब म्हणून परिपत्रक काढून १८ फेब्रुवारी रोजी रात्रभर वाद्य वाजविण्याची परवानगी द्यावी, अशी समितीची मागणी असल्याचे त्यांनी नमूद केले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादkranti chowkक्रांती चौकShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज