शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

शिवरायांच्या पुतळा अनावरणाची मध्यरात्रीची वेळ बदला; शिवजयंती महोत्सव समितीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2022 16:54 IST

राजकीय कार्यक्रमांना परवानगी आणि शिवप्रेमींना गुन्हे दाखल करण्याची धमकी

औरंगाबाद : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण मूक पद्धतीने होऊच शकत नाही. यामुळे क्रांती चौकातील शिवरायांच्या पुतळा अनावरण सोहळ्याची मध्यरात्रीची वेळ बदला; अन्यथा रात्री १० वाजल्यानंतर शिवप्रेमींना वाद्य वाजविण्याची परवानगी द्या, अशी मागणी जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष अभिजित देशमुख आणि माजी अध्यक्ष विनोद पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली.

क्रांती चौकातीलछत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण उद्या, शुक्रवारी मध्यरात्री करण्यात येणार असल्याचे महापालिकेने मंगळवारी (दि. १५) जाहीर केले. रात्री दहानंतर वाद्य वाजविण्यावर सर्वोच्च न्यायालयाचे निर्बंध आहेत. शिवजयंतीची जय्यत करणारे शिवप्रेमी क्रांती चौकातील शिवस्मारकाच्या अनावरण समारंभाचीही आतुरतेने प्रतीक्षा करीत आहेत. शिवस्मारकाचे अनावरण मोठ्या जल्लोषात व्हावे, अशी लाखो शिवप्रेमींची इच्छा आहे. असे असताना मध्यरात्री मूक पद्धतीने अनावरण सोहळ्याचे आयोजन कशासाठी करण्यात आले आह? असा सवाल विनोद पाटील यांनी केला.

ते म्हणाले की, राज्यात विधान परिषद, काही जिल्हा परिषदा, ग्रामपंचायती, जिल्हा बँका आणि दूध संघांच्या निवडणुका झाल्या, तेव्हाच्या गर्दीत कोरोना पसरला नाही. आता परिपत्रक काढून शिवप्रेमींवर निर्बंध लादून गुन्हे दाखल करण्याचा इशारा देणे, हे अन्यायकारक आहे. शिवजयंतीनिमित्त मराठा क्रांती मोर्चाने आयोजित केलेल्या वाहन रॅलीला पोलिसांनी परवानगी नाकारली. यामुळे बुधवारची रॅली रद्द करण्यात आली. एवढेच नव्हे तर कार्यकर्त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. शिवसेनेनेही ‘एक राजा - एक जयंती’ या तत्त्वानुसार १९ फेब्रुवारी रोजीच्या शिवजयंतीत सहभागी व्हावे, असे आवाहन आम्ही करतो. शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण कोणाच्या हस्ते करायचे, हा प्रशासनाचा निर्णय आहे. या पत्रकार परिषदेला महाेत्सव समितीचे राजू शिंदे, मनोज पाटील, प्रा. चंद्रकांत भराट, सुरेश वाकडे, मनोज गायके, सुमित खांबेकर, राजगौरव वानखेडे आणि अप्पासाहेब कुढेकर उपस्थित होते.

आम्ही सायंकाळपासून जल्लोष करणारशिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण मध्यरात्री असले तरी जिल्हा शिवजयंती महोत्सव समिती दुपारी चार वाजल्यापासूनच क्रांती चौकात जल्लोषाला सुरुवात करील. शासनाने शिवप्रेमींच्या भावना लक्षात घेऊन विशेष बाब म्हणून परिपत्रक काढून १८ फेब्रुवारी रोजी रात्रभर वाद्य वाजविण्याची परवानगी द्यावी, अशी समितीची मागणी असल्याचे त्यांनी नमूद केले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादkranti chowkक्रांती चौकShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज