शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

शिवरायांच्या पुतळा अनावरणाची मध्यरात्रीची वेळ बदला; शिवजयंती महोत्सव समितीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2022 16:54 IST

राजकीय कार्यक्रमांना परवानगी आणि शिवप्रेमींना गुन्हे दाखल करण्याची धमकी

औरंगाबाद : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण मूक पद्धतीने होऊच शकत नाही. यामुळे क्रांती चौकातील शिवरायांच्या पुतळा अनावरण सोहळ्याची मध्यरात्रीची वेळ बदला; अन्यथा रात्री १० वाजल्यानंतर शिवप्रेमींना वाद्य वाजविण्याची परवानगी द्या, अशी मागणी जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष अभिजित देशमुख आणि माजी अध्यक्ष विनोद पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली.

क्रांती चौकातीलछत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण उद्या, शुक्रवारी मध्यरात्री करण्यात येणार असल्याचे महापालिकेने मंगळवारी (दि. १५) जाहीर केले. रात्री दहानंतर वाद्य वाजविण्यावर सर्वोच्च न्यायालयाचे निर्बंध आहेत. शिवजयंतीची जय्यत करणारे शिवप्रेमी क्रांती चौकातील शिवस्मारकाच्या अनावरण समारंभाचीही आतुरतेने प्रतीक्षा करीत आहेत. शिवस्मारकाचे अनावरण मोठ्या जल्लोषात व्हावे, अशी लाखो शिवप्रेमींची इच्छा आहे. असे असताना मध्यरात्री मूक पद्धतीने अनावरण सोहळ्याचे आयोजन कशासाठी करण्यात आले आह? असा सवाल विनोद पाटील यांनी केला.

ते म्हणाले की, राज्यात विधान परिषद, काही जिल्हा परिषदा, ग्रामपंचायती, जिल्हा बँका आणि दूध संघांच्या निवडणुका झाल्या, तेव्हाच्या गर्दीत कोरोना पसरला नाही. आता परिपत्रक काढून शिवप्रेमींवर निर्बंध लादून गुन्हे दाखल करण्याचा इशारा देणे, हे अन्यायकारक आहे. शिवजयंतीनिमित्त मराठा क्रांती मोर्चाने आयोजित केलेल्या वाहन रॅलीला पोलिसांनी परवानगी नाकारली. यामुळे बुधवारची रॅली रद्द करण्यात आली. एवढेच नव्हे तर कार्यकर्त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. शिवसेनेनेही ‘एक राजा - एक जयंती’ या तत्त्वानुसार १९ फेब्रुवारी रोजीच्या शिवजयंतीत सहभागी व्हावे, असे आवाहन आम्ही करतो. शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण कोणाच्या हस्ते करायचे, हा प्रशासनाचा निर्णय आहे. या पत्रकार परिषदेला महाेत्सव समितीचे राजू शिंदे, मनोज पाटील, प्रा. चंद्रकांत भराट, सुरेश वाकडे, मनोज गायके, सुमित खांबेकर, राजगौरव वानखेडे आणि अप्पासाहेब कुढेकर उपस्थित होते.

आम्ही सायंकाळपासून जल्लोष करणारशिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण मध्यरात्री असले तरी जिल्हा शिवजयंती महोत्सव समिती दुपारी चार वाजल्यापासूनच क्रांती चौकात जल्लोषाला सुरुवात करील. शासनाने शिवप्रेमींच्या भावना लक्षात घेऊन विशेष बाब म्हणून परिपत्रक काढून १८ फेब्रुवारी रोजी रात्रभर वाद्य वाजविण्याची परवानगी द्यावी, अशी समितीची मागणी असल्याचे त्यांनी नमूद केले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादkranti chowkक्रांती चौकShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज