शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

काँग्रेसशी आघाडीची शक्यता कमीच; आमचा लढा भाजपशी : प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 12:54 IST

ईव्हीएम हटेल,तर हे सरकार हटेल

ठळक मुद्दे आम्ही २८८ जागा जाहीर करू, आमचा लढा भाजपशी आहेसुजात आंबेडकर लढणार नाही...

औरंगाबाद : काँग्रेसशी आघाडीची शक्यता कमीच आहे. आम्ही २८८ जागा जाहीर करू, आमचा लढा भाजपशी आहे, अशी भूमिका वंचित आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत मांडली. 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मौलवी आणि उलेमांची मते जाणून घेण्यासाठी आज बाळासाहेब औरंगाबादेत आले होते. त्याआधी पत्रकारांशी वार्तालाप करताना त्यांनी एमआयएमने शंभर जागांची मागणी केली आहे, यासंदर्भात खडसावले की, उद्या ते दोनशे जागा मागतील. मागायला काय जातंय, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. 

अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले की, विधानसभा निवडणुकीसाठी आधी आम्ही लहान ओबीसींची यादी जाहीर करू. तोपर्यंत काँग्रेसने आम्ही भाजपची बी टीम कसे हे सिद्ध केले तर आम्ही बोलणीस तयार राहू. काँग्रेसकडे उमेदवार नाहीत, हे त्यावेळीही सांगत होतो, आताही तीच स्थिती आहे. लोकसभा निवडणुकीत मौलवींनी मुस्लिम मते काँग्रेसकडे वळवली, यात शंकाच नाही. स्वत: असदुद्दीन ओवेसी यांनीही ते जाहीरपणे कबूल केलेले आहे. मुस्लिम मते मौलवींच्या हातात आहेत असा याचा अर्थ होतो, असे सांगत, यावेळी तीन तलाक आणि ३७० कलम रद्द करण्याच्या मुद्यावर काँग्रेस, राष्ट्रवादीने सभात्यागाची भूमिका घेतली. मग त्यांच्याबरोबर का राहायचे, असा प्रश्न मुस्लिम समाजास पडला आहे. म्हणूनच ते एक पर्याय म्हणून वंचित बहुजन आघाडीबरोबर राहतील, असा विश्वास मला आहे.

मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण, असे विचारता ते उत्तरले, उमेदवारच सक्षम द्यायचे असे धोरण ठरवले आहे. एका सर्व्हेनुसार ७० टक्के मतदारांना काम करणारा आमदार हवाय. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा दाखवल्याने उमेदवारांना वाटते की, काम केले नाही तरी चालेल. ही चुकीची प्रथा भाजपने सुरू केली.

‘मदत’ हा शब्द नाही...दुष्काळात आणि आता पूर आला असतानाही हे सरकार उदासीन आहे. मदत करणे हा शब्द यांच्या विचारसरणीत नाही, तुमचे तुम्ही पाहून घ्या, अशी यांची प्रवृत्ती आहे. या शब्दात त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. अमित भुईगळ, रामभाऊ पेरकर व अनेक कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती होती.

ईव्हीएम हटेल,तर हे सरकार हटेलईव्हीएम हटेल, तर हे सरकार हटेल, हे नक्की, तसेच ईव्हीएममध्ये गडबड आहे, हे सिद्ध करायला काही हॅकर्स ग्रुप तयार आहेत. अगदी न्यायालयातसुद्धा, असे विधान अ‍ॅड. आंबेडकर यांनी केले. 

सुजात आंबेडकर लढणार नाही...सुजात आंबेडकर हा माझा मुलगा अवघा २२ वर्षांचा आहे. शिवाय तो पत्रकारितेच्या पुढील शिक्षणासाठी लंडनला जाणार आहे, त्यामुळे त्याच्या निवडणूक लढण्याचा प्रश्नच नाही, असे स्पष्टीकरण बाळासाहेबांनी दिले.  

टॅग्स :Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरcongressकाँग्रेसAurangabadऔरंगाबाद