शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
3
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
4
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
5
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
6
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
7
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
8
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
9
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
10
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
11
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
12
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
13
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
14
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
15
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
16
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
17
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
18
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
19
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
20
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!

शिक्षकांच्या बदली प्रक्रियेला औरंगाबाद खंडपीठात आव्हान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 13:12 IST

बदली प्रक्रियेला आव्हान देणाऱ्या औरंगाबाद जिल्हा परिषदेमधील शिक्षकांच्या याचिकेच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस.व्ही. गंगापूरवाला आणि न्या. एस.के. कोतवाल यांनी प्रतिवादींना नोटीस बजावण्याचा आदेश दिला

औरंगाबाद : बदली प्रक्रियेला आव्हान देणाऱ्या औरंगाबाद जिल्हा परिषदेमधीलशिक्षकांच्या याचिकेच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस.व्ही. गंगापूरवाला आणि न्या. एस.के. कोतवाल यांनी प्रतिवादींना नोटीस बजावण्याचा आदेश मंगळवारी (दि.१२ जून) दिला. याचिकेची पुढील सुनावणी १८ जूनला होणार आहे. 

महाराष्ट्र जिल्हा परिषद शिक्षक कृती समिती, औरंगाबादचे समन्वयक सदानंद माडेवार व इतर १७८ जणांनी अ‍ॅड. सिद्धेश्वर एस. ठोंबरे यांच्यामार्फत खंडपीठात याचिका दाखल केली आहे. त्यांनी राज्य शासन, औरंगाबादचे विभागीय आयुक्त, औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी आणि गटविकास अधिकारी यांना प्रतिवादी केले आहे. 

राज्य शासनाने जिल्हा परिषदेच्या सहशिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसंदर्भात २७ फेब्रुवारी २०१७ च्या शासन निर्णयाद्वारे धोरण ठरविले आहे. त्यानुसार बदल्या होणे अपेक्षित असताना राज्य शासनाने व जिल्हा परिषदांनी वरील शासन निर्णयानुसार बदल्या केल्या नाहीत. शासन निर्णयानुसार बदल्या करण्याचे अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आहेत; मात्र राज्य शासनाने ‘एनआयसी’मार्फत ‘आॅनलाईन’ प्रक्रिया राबविली. त्यांनी शासन निर्णयानुसार बदल्या केल्या नाहीत, त्यामुळे औरंगाबाद व राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये शासन निर्णयानुसार बदल्या झाल्या नाहीत. 

शासन निर्णयानुसार विशेष संवर्ग शिक्षक भाग-१ आणि भाग-२ निर्माण केले आहेत. दोन्ही संवर्गांना बदलीमध्ये प्राधान्य दिले आहे. हा प्राधान्यक्रमसुद्धा पाळला नाही. भाग-१ मधील शिक्षकांनी दाखल केलेले वैद्यकीय, अपंग, विधवा आदी प्रमाणपत्रांची पडताळणी झाली नाही. त्यामुळे संबंधित त्या संवर्गातील आहेत किंवा नाही याची खातरजमा झाली नाही. पती-पत्नी एकत्रीकरणामध्ये दोघेही जिल्हा परिषदेमध्ये सेवेत असतील तरच त्यांची बदली केली जाते; परंतु दोघांपैकी एक खाजगी सेवेत असेल, तर बदली केली जात नाही. अशा प्रकरणात दोघांपैकी एकाला ‘विस्थापित’ घोषित करणे आवश्यक होते. बदलीस पात्र शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध के ल्या नाहीत.

शिक्षकांकडून जिल्ह्यातील २० शाळांचा पसंतीक्रम घेणे आवश्यक असताना तो घेतला नाही. शासन निर्णयानुसार टप्पा क्रमांक १,२,३,४ व ५ नुसार बदल्या करणे आवश्यक असताना तसे केले नाही. बदली प्रक्रिया शासन निर्णयाच्या विरोधात केल्यामुळे संपूर्ण बदली प्रक्रिया रद्द करून नव्याने शासन निर्णयानुसार बदली प्रक्रिया राबवावी, अशी विनंती याचिकेत केली आहे.

टॅग्स :Aurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठTeacherशिक्षकTransferबदलीAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषद