शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

छत्रपती संभाजीनगरात रिक्षाचालकांचा ‘चक्का जाम’; आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल

By संतोष हिरेमठ | Updated: January 10, 2024 11:34 IST

रिक्षा बंद असल्याने  जालना रोडवरून जाणाऱ्या सिटी बस प्रवाशांनी खचाखच भरल्या होत्या. अनेकांनी बसच्या दारात थांबून प्रवास केला

छत्रपती संभाजीनगर : रिक्षा चालकांनी विविध मागण्यांसाठी आज रिक्षा बंद आंदोलन पुकारले आहे. या बंदला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे बाहेर गावाहून आलेल्या प्रवाशांचे बस स्टँड व रेल्वे स्टेशनवर हाल होताना दिसत आहे. त्याचबरोबर विद्यार्थी, कामगार आणि महिला यांना या आंदोलनामुळे त्रास सहन करावा लाग आहे.  रिक्षा कमी आणि प्रवासी जास्त असे व्यस्त प्रमाण असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल सुरू आहे.

रिक्षा बंद असल्याने  जालना रोडवरून जाणाऱ्या सिटी बस प्रवाशांनी खचाखच भरल्या होत्या. अनेकांनी बसच्या दारात थांबून प्रवास केला

रिक्षाचालकांच्या विविध मागण्यांवर आरटीओ कार्यालयाची माहिती : मागणी : रिक्षाचालकांसाठी स्वतंत्र रिक्षाचालक कल्याणकारी महामंडळाची लवकर अंमलबजावणी करावी.आरटीओ : सदर बाब ही शासन स्तरावरील आहे. सदर मागणीचे निवेदन हे पुढील कार्यवाहीसाठी शासनास सादर करण्यात येईल.

मागणी : कंपनीच्या बस, खासगी वाहनांतून होणाऱ्या अवैध प्रवासी वाहतुकीला आळा बसण्यासाठी कायमस्वरूपी भरारी पथक नेमावे.आरटीओ : कार्यालयाच्या वायुवेग पथकातील कार्यकारी अधिकाऱ्यांना कंपन्यांच्या कामगारांना ने-आण करणाऱ्या बसेसने नियमाविरुद्ध वाहतूक केल्यास दंडात्मक कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मागणी : स्मार्ट सिटी बस फक्त मनपा हद्दीत चालविण्यात यावी. ग्रामीण भागातील फेऱ्या बंद कराव्यात.आरटीओ : प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने घेतलेल्या निर्णयानुसार स्मार्ट सिटी बसला मनपा हद्दीत व मनपा हद्दीबाहेर २० कि.मी.च्या आत प्रवासी वाहतुकीची परवानगी देण्यात आलेली आहे.

मागणी : रिक्षांचे शेअरिंग दर निश्चित करून दर फलक त्वरित लावून देण्यात यावेत.आरटीओ : शेअरिंग रिक्षांचे मार्ग निश्चित करण्यासाठी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाची मान्यता आवश्यक आहे. प्राधिकरणाच्या आगामी बैठकीत वाहतूक शाखेच्या सहकार्याने सदर प्रस्ताव ठेवण्यात येईल. 

टॅग्स :auto rickshawऑटो रिक्षाAurangabadऔरंगाबादRto officeआरटीओ ऑफीस