शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

भावाला भेटून घरी जाणाऱ्या विवाहितेच्या गळ्यातील दिड तोळ्याची सोनसाखळी चोरट्यांनी हिसकावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 17:39 IST

याप्रकरणी जवाहरनगर ठाण्यात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात  आला.

औरंगाबाद: भावाला भेटून  घरी जाणाऱ्या  महिलेच्या गळ्यातील दिड तोळ्याची सोनसाखळी दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेली. ही खळबळजनक घटना टिळकनगर येथील दत्तमंदीराजवळ  सोमवारी(दि.१०) दुपारी १.२१ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी जवाहरनगर ठाण्यात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात  आला.

जवाहरनगर पोलिसांनी सांगितले की, टिळकनगर येथील रहिवासी शालिनी हजारे यांचे भाऊ त्यांच्याच कॉलनीत राहतात. आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास त्या भाऊ आणि भावजयीला भेटण्यासाठी भावाच्या घरी मोपेडने गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी घरासमोर मोपेड उभी केली होती. दुपारी १.२१ वाजेच्या सुमारास शालिनी भावाला भेटून घरी जाण्यासाठी मोपेडजवळ आल्या.यावेळी त्यांनी मोपेडला चावी लावली त्याचवेळी दुचाकीस्वार दोन चोरटे अचानक त्यांच्या जवळ आले. यावेळी एकाने त्यांच्या गळ्यातील दिड तोळ्याची सोनसाखळी हिसकावल्याने शालिनी या खाली पडल्याने त्यांच्या हाताला खरचटले.

यावेळी शालिनी या मोपेडने त्यांचा पाठलाग करू शकतात, याचा अंदाज चोरट्यांना आल्याने त्यांनी शालिनी यांच्या मोपेडची चावी काढून पळ काढला. यावेळी शालिनी यांनी आरडाओरड केली, मात्र चोरटे खिवंसरा पार्कच्या दिशेने सुसाट निघून गेले. या घटनेची माहिती मिळताच जवाहरनगर ठाण्याचे निरीक्षक शरद इंगळे, गस्तीवरील गुन्हेशाखेचे निरीक्षक मधुकर सावंत, सहायक निरीक्षक अजबसिंग जारवाल, उपनिरीक्षक अमोल देशमुख, सहायक उपनिरीक्षक नंदकुमार भंडारे, कर्मचारी राजू साळुंके  आणि जवाहरनगर ठाण्यातील अन्य अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पहाणी केली.

परिसरातील विविध घरांवरील सीसीटिव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजची तपासणी पोलीस अधिकारी कर्मचारी सायंकाळपर्यंत करीत होते. शालिनी यांच्या तक्रारीवरून चोरट्यांविरोधात जवाहरनगर ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीjawaharnagar areaजवाहरनगर परिसरAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस