शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
2
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
3
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
4
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
5
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
6
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
7
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
9
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
10
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
11
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
12
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
13
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
14
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
१२ अफेयर, २ वर्षात झाला घटस्फोट, आता या अभिनेत्रीला थाटायचाय दुसरा संसार
16
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
17
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
18
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
19
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
20
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक

कृत्रिम पावसाच्या प्रयोगाचे केंद्र पश्चिम महाराष्टÑात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 12:47 AM

कृत्रिम पावसाच्या प्रयोगाचे केंद्र मराठवाड्याऐवजी पश्चिम महाराष्ट्रात उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सोलापूर येथे हे केंद्र उभारण्यात येणार असून, त्याचा मराठवाड्याला फारसा लाभ होणार नाही, असे हवामानतज्ज्ञांचे मत आहे. यानिमित्ताने मराठवाड्याची पुन्हा उपेक्षा होण्याची शक्यता आहे. हे केंद्र औरंगाबादेत सुरू करण्यासाठी २०१५ पासून विषय चर्चेला येत होता.

ठळक मुद्दे दोन विमाने खरेदीचा प्रस्ताव : मराठवाड्याला पुन्हा वाटाण्याच्या अक्षता

विकास राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कृत्रिम पावसाच्या प्रयोगाचे केंद्र मराठवाड्याऐवजी पश्चिम महाराष्ट्रात उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सोलापूर येथे हे केंद्र उभारण्यात येणार असून, त्याचा मराठवाड्याला फारसा लाभ होणार नाही, असे हवामानतज्ज्ञांचे मत आहे. यानिमित्ताने मराठवाड्याची पुन्हा उपेक्षा होण्याची शक्यता आहे. हे केंद्र औरंगाबादेत सुरू करण्यासाठी २०१५ पासून विषय चर्चेला येत होता.केंद्रीय विज्ञान मंत्रालय व राज्य शासनाच्या साहाय्याने सोलापूर येथे कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी केंद्र सुरु होणार आहे. येत्या १ जूनपासून कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याचा प्रयत्न आहे. १०० कोटींच्या खर्चाची तरतूद यासाठी करण्यात येत असून, त्यातून दोन विमानांची खरेदीदेखील करण्यात येणार असल्याची माहिती आहे.सोलापूर, सांगली जिल्ह्यातील मानदेशाचा कायमस्वरूपी दुष्काळी पट्टा, उस्मानाबाद, लातूर व शेजारच्या कर्नाटकातील बीदर या पर्जन्यछायेतील प्रदेशाला याचा लाभ होईल. त्यामुळे सोलापूर येथे सी-डॉप्लर रडार बसविण्याबाबत तयारी सुरू झाल्याचे वृत्त आहे. जून २०१५ मध्ये मराठवाड्यात क्लाऊड सीडिंगचा (कृत्रिम पावसाचा प्रयोग) करण्यात आला होता. त्यासाठी औरंगाबाद विभागीय आयुक्तालयाच्या चौथ्या मजल्यावर सी-डॉप्लर रडार बसविण्यात आले होेते. २७ कोटींचा खर्च त्यासाठी झाला होता.पुण्यातील भौतिकशास्त्र तथा हवामानतज्ज्ञ किरणकुमार जोहरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले, मुळात सोलापूरला केंद्र स्थापन करणे हे भौगोलिकदृष्ट्या फायदेशीर ठरणारे नाही. १ जूनपासून सोलापूर येथून कृ त्रिम पावसाचा प्रयोग करण्याच्या हालचालींच्या बातम्या येत आहेत, परंतु त्या काळात महाराष्ट्रात ढगांची गर्दी कमी असते. जर ढगांची गर्दी नसेल तर काय करणार, असा प्रश्न आहे. दोन विमाने खरेदी करण्यात येणार आहेत. कृत्रिम पावसाच्या प्रयोगाचे केंद्र एका राज्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असायला हवे.कायमस्वरूपी केंद्राची शक्यता मावळलीमराठवाड्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग २०१५ मध्ये पहिल्यांदा झाला. सतत पाच वर्षांपासून या भागात दुष्काळी परिस्थिती आहे. कोट्यवधी रुपयांचे दुष्काळी पॅकेज देऊनही प्रश्न पूर्णंत: मिटलेला नाही, त्यामुळे कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याचा निर्णय सरकाने २०१५ मध्ये घेतला.प्रयोग यशस्वी झाला तर शासन कृत्रिम पावसासाठी लागणारी महागडी यंत्रणा खरेदी करून औरंगाबाद येथे कायमस्वरूपी केंद्र स्थापन करण्याचा निर्णय होणार होता; परंतु गेल्या वर्षी आयुक्तालयावरील सी-डॉप्लर रडार काढून ते हलविण्यात आले. त्यामुळे येथील केंद्र होण्याची शक्यता मावळली होती. ते केंद्र आता सोलापूरमध्ये उभारण्याच्या हालचाली सुरू आहेत.का हवे होते औरंगाबादला केंद्रऔरंगाबाद हे सेंटर कशासाठी निवडले आहे. याप्रकरणी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे तत्कालीन संचालक सुहास दिवसे आणि शास्त्रज्ञ आर.व्ही. शर्मा यांनी सांगितले होते की, ३०० ते ४५० कि़ मी. परिसरात येथून मुंबई, पुणे, अकोला, जळगाव-धुळे, अहमदनगर, सोलापूर, सांगली, सातारा आणि पूर्ण मराठवाड्यातील परिसरातील दुष्काळग्रस्त भाग यामुळे नियंत्रित होऊ शकतो.

टॅग्स :RainपाऊसMarathwadaमराठवाडा