शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
2
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
3
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
4
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
5
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
6
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
7
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
8
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
9
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
10
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
11
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
12
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
13
छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
14
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
15
केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
16
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
17
Video: बॉडीबिल्डर्सनी आधी सफाई कामगाराची उडवली खिल्ली, मग पठ्ठ्याने जे केलं ते पाहून...
18
Viral Video: ई- रिक्षा शोरूमबाहेर नेली अन् पेट्रोल टाकून पेटवून दिली; तरुणानं असं का केलं?
19
IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा
20
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

कृत्रिम पावसाच्या प्रयोगाचे केंद्र पश्चिम महाराष्टÑात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 00:48 IST

कृत्रिम पावसाच्या प्रयोगाचे केंद्र मराठवाड्याऐवजी पश्चिम महाराष्ट्रात उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सोलापूर येथे हे केंद्र उभारण्यात येणार असून, त्याचा मराठवाड्याला फारसा लाभ होणार नाही, असे हवामानतज्ज्ञांचे मत आहे. यानिमित्ताने मराठवाड्याची पुन्हा उपेक्षा होण्याची शक्यता आहे. हे केंद्र औरंगाबादेत सुरू करण्यासाठी २०१५ पासून विषय चर्चेला येत होता.

ठळक मुद्दे दोन विमाने खरेदीचा प्रस्ताव : मराठवाड्याला पुन्हा वाटाण्याच्या अक्षता

विकास राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कृत्रिम पावसाच्या प्रयोगाचे केंद्र मराठवाड्याऐवजी पश्चिम महाराष्ट्रात उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सोलापूर येथे हे केंद्र उभारण्यात येणार असून, त्याचा मराठवाड्याला फारसा लाभ होणार नाही, असे हवामानतज्ज्ञांचे मत आहे. यानिमित्ताने मराठवाड्याची पुन्हा उपेक्षा होण्याची शक्यता आहे. हे केंद्र औरंगाबादेत सुरू करण्यासाठी २०१५ पासून विषय चर्चेला येत होता.केंद्रीय विज्ञान मंत्रालय व राज्य शासनाच्या साहाय्याने सोलापूर येथे कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी केंद्र सुरु होणार आहे. येत्या १ जूनपासून कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याचा प्रयत्न आहे. १०० कोटींच्या खर्चाची तरतूद यासाठी करण्यात येत असून, त्यातून दोन विमानांची खरेदीदेखील करण्यात येणार असल्याची माहिती आहे.सोलापूर, सांगली जिल्ह्यातील मानदेशाचा कायमस्वरूपी दुष्काळी पट्टा, उस्मानाबाद, लातूर व शेजारच्या कर्नाटकातील बीदर या पर्जन्यछायेतील प्रदेशाला याचा लाभ होईल. त्यामुळे सोलापूर येथे सी-डॉप्लर रडार बसविण्याबाबत तयारी सुरू झाल्याचे वृत्त आहे. जून २०१५ मध्ये मराठवाड्यात क्लाऊड सीडिंगचा (कृत्रिम पावसाचा प्रयोग) करण्यात आला होता. त्यासाठी औरंगाबाद विभागीय आयुक्तालयाच्या चौथ्या मजल्यावर सी-डॉप्लर रडार बसविण्यात आले होेते. २७ कोटींचा खर्च त्यासाठी झाला होता.पुण्यातील भौतिकशास्त्र तथा हवामानतज्ज्ञ किरणकुमार जोहरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले, मुळात सोलापूरला केंद्र स्थापन करणे हे भौगोलिकदृष्ट्या फायदेशीर ठरणारे नाही. १ जूनपासून सोलापूर येथून कृ त्रिम पावसाचा प्रयोग करण्याच्या हालचालींच्या बातम्या येत आहेत, परंतु त्या काळात महाराष्ट्रात ढगांची गर्दी कमी असते. जर ढगांची गर्दी नसेल तर काय करणार, असा प्रश्न आहे. दोन विमाने खरेदी करण्यात येणार आहेत. कृत्रिम पावसाच्या प्रयोगाचे केंद्र एका राज्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असायला हवे.कायमस्वरूपी केंद्राची शक्यता मावळलीमराठवाड्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग २०१५ मध्ये पहिल्यांदा झाला. सतत पाच वर्षांपासून या भागात दुष्काळी परिस्थिती आहे. कोट्यवधी रुपयांचे दुष्काळी पॅकेज देऊनही प्रश्न पूर्णंत: मिटलेला नाही, त्यामुळे कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याचा निर्णय सरकाने २०१५ मध्ये घेतला.प्रयोग यशस्वी झाला तर शासन कृत्रिम पावसासाठी लागणारी महागडी यंत्रणा खरेदी करून औरंगाबाद येथे कायमस्वरूपी केंद्र स्थापन करण्याचा निर्णय होणार होता; परंतु गेल्या वर्षी आयुक्तालयावरील सी-डॉप्लर रडार काढून ते हलविण्यात आले. त्यामुळे येथील केंद्र होण्याची शक्यता मावळली होती. ते केंद्र आता सोलापूरमध्ये उभारण्याच्या हालचाली सुरू आहेत.का हवे होते औरंगाबादला केंद्रऔरंगाबाद हे सेंटर कशासाठी निवडले आहे. याप्रकरणी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे तत्कालीन संचालक सुहास दिवसे आणि शास्त्रज्ञ आर.व्ही. शर्मा यांनी सांगितले होते की, ३०० ते ४५० कि़ मी. परिसरात येथून मुंबई, पुणे, अकोला, जळगाव-धुळे, अहमदनगर, सोलापूर, सांगली, सातारा आणि पूर्ण मराठवाड्यातील परिसरातील दुष्काळग्रस्त भाग यामुळे नियंत्रित होऊ शकतो.

टॅग्स :RainपाऊसMarathwadaमराठवाडा