शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

कृत्रिम पावसाच्या प्रयोगाचे केंद्र पश्चिम महाराष्टÑात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 00:48 IST

कृत्रिम पावसाच्या प्रयोगाचे केंद्र मराठवाड्याऐवजी पश्चिम महाराष्ट्रात उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सोलापूर येथे हे केंद्र उभारण्यात येणार असून, त्याचा मराठवाड्याला फारसा लाभ होणार नाही, असे हवामानतज्ज्ञांचे मत आहे. यानिमित्ताने मराठवाड्याची पुन्हा उपेक्षा होण्याची शक्यता आहे. हे केंद्र औरंगाबादेत सुरू करण्यासाठी २०१५ पासून विषय चर्चेला येत होता.

ठळक मुद्दे दोन विमाने खरेदीचा प्रस्ताव : मराठवाड्याला पुन्हा वाटाण्याच्या अक्षता

विकास राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कृत्रिम पावसाच्या प्रयोगाचे केंद्र मराठवाड्याऐवजी पश्चिम महाराष्ट्रात उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सोलापूर येथे हे केंद्र उभारण्यात येणार असून, त्याचा मराठवाड्याला फारसा लाभ होणार नाही, असे हवामानतज्ज्ञांचे मत आहे. यानिमित्ताने मराठवाड्याची पुन्हा उपेक्षा होण्याची शक्यता आहे. हे केंद्र औरंगाबादेत सुरू करण्यासाठी २०१५ पासून विषय चर्चेला येत होता.केंद्रीय विज्ञान मंत्रालय व राज्य शासनाच्या साहाय्याने सोलापूर येथे कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी केंद्र सुरु होणार आहे. येत्या १ जूनपासून कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याचा प्रयत्न आहे. १०० कोटींच्या खर्चाची तरतूद यासाठी करण्यात येत असून, त्यातून दोन विमानांची खरेदीदेखील करण्यात येणार असल्याची माहिती आहे.सोलापूर, सांगली जिल्ह्यातील मानदेशाचा कायमस्वरूपी दुष्काळी पट्टा, उस्मानाबाद, लातूर व शेजारच्या कर्नाटकातील बीदर या पर्जन्यछायेतील प्रदेशाला याचा लाभ होईल. त्यामुळे सोलापूर येथे सी-डॉप्लर रडार बसविण्याबाबत तयारी सुरू झाल्याचे वृत्त आहे. जून २०१५ मध्ये मराठवाड्यात क्लाऊड सीडिंगचा (कृत्रिम पावसाचा प्रयोग) करण्यात आला होता. त्यासाठी औरंगाबाद विभागीय आयुक्तालयाच्या चौथ्या मजल्यावर सी-डॉप्लर रडार बसविण्यात आले होेते. २७ कोटींचा खर्च त्यासाठी झाला होता.पुण्यातील भौतिकशास्त्र तथा हवामानतज्ज्ञ किरणकुमार जोहरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले, मुळात सोलापूरला केंद्र स्थापन करणे हे भौगोलिकदृष्ट्या फायदेशीर ठरणारे नाही. १ जूनपासून सोलापूर येथून कृ त्रिम पावसाचा प्रयोग करण्याच्या हालचालींच्या बातम्या येत आहेत, परंतु त्या काळात महाराष्ट्रात ढगांची गर्दी कमी असते. जर ढगांची गर्दी नसेल तर काय करणार, असा प्रश्न आहे. दोन विमाने खरेदी करण्यात येणार आहेत. कृत्रिम पावसाच्या प्रयोगाचे केंद्र एका राज्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असायला हवे.कायमस्वरूपी केंद्राची शक्यता मावळलीमराठवाड्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग २०१५ मध्ये पहिल्यांदा झाला. सतत पाच वर्षांपासून या भागात दुष्काळी परिस्थिती आहे. कोट्यवधी रुपयांचे दुष्काळी पॅकेज देऊनही प्रश्न पूर्णंत: मिटलेला नाही, त्यामुळे कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याचा निर्णय सरकाने २०१५ मध्ये घेतला.प्रयोग यशस्वी झाला तर शासन कृत्रिम पावसासाठी लागणारी महागडी यंत्रणा खरेदी करून औरंगाबाद येथे कायमस्वरूपी केंद्र स्थापन करण्याचा निर्णय होणार होता; परंतु गेल्या वर्षी आयुक्तालयावरील सी-डॉप्लर रडार काढून ते हलविण्यात आले. त्यामुळे येथील केंद्र होण्याची शक्यता मावळली होती. ते केंद्र आता सोलापूरमध्ये उभारण्याच्या हालचाली सुरू आहेत.का हवे होते औरंगाबादला केंद्रऔरंगाबाद हे सेंटर कशासाठी निवडले आहे. याप्रकरणी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे तत्कालीन संचालक सुहास दिवसे आणि शास्त्रज्ञ आर.व्ही. शर्मा यांनी सांगितले होते की, ३०० ते ४५० कि़ मी. परिसरात येथून मुंबई, पुणे, अकोला, जळगाव-धुळे, अहमदनगर, सोलापूर, सांगली, सातारा आणि पूर्ण मराठवाड्यातील परिसरातील दुष्काळग्रस्त भाग यामुळे नियंत्रित होऊ शकतो.

टॅग्स :RainपाऊसMarathwadaमराठवाडा