शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

माणगाव परिषदेचे शताब्दी वर्ष विद्यापीठ साजरे करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 11:51 PM

कोल्हापूरमधील माणगाव येथे १९२० मध्ये राजर्षी शाहू महाराज यांनी आयोजित सभेनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाची देशपातळीवर ओळख झाली. या ऐतिहासिक घटनेचे शताब्दी वर्ष कोल्हापूरचे शिवाजी विद्यापीठ आणि येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संयुक्तरीत्या साजरे करणार आहे, अशी माहिती कुलगुरू देवानंद शिंदे यांनी गुरुवारी (दि.१३) पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देविद्यापीठ : १९२० ला शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांची झाली होती सभा

औरंगाबाद : कोल्हापूरमधील माणगाव येथे १९२० मध्ये राजर्षी शाहू महाराज यांनी आयोजित सभेनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाची देशपातळीवर ओळख झाली. या ऐतिहासिक घटनेचे शताब्दी वर्ष कोल्हापूरचे शिवाजी विद्यापीठ आणि येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संयुक्तरीत्या साजरे करणार आहे, अशी माहिती कुलगुरू देवानंद शिंदे यांनी गुरुवारी (दि.१३) पत्रकार परिषदेत दिली.राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाते अत्यंत जिव्हाळ्याचे होते. १९२० ला कोल्हापूर जिल्ह्यातील माणगाव येथे शाहू महाराजांनी मागासवर्गीयांची परिषद आयोजित केली होती. या परिषदेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. यावेळी प्रथमच शाहू महाराजांनी, ‘मागासवर्गीयांनो तुम्हाला तुमचा नेता मिळाला’ असे सांगून बाबासाहेब हे देशाचे नेते आहेत असे त्यांच्या भाषणातून जाहीर केले. या ऐतिहासिक घटनेचे हे शताब्दी वर्ष आहे. हे वर्ष कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठ आणि येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संयुक्तरीत्या साजरे करणार आहे. या माध्यमातून दोन्ही विद्यापीठे विविध उपक्रम राबवून महापुरुषांना अभिवादन करतील, अशी माहिती कुलगुरू देवानंद शिंदे यांनी दिली.परिषदेची माहिती व्यापक व्हावीमाणगाव परिषद ही घटना मोठी असून, याबद्दल पुरेसे बोलले जात नाही. यानंतरच खऱ्या अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा घटनाकार म्हणून उदय झाला. नव्या पिढीला याची माहिती व्हावी, या घटनेची व्यापकता वाढून प्रबोधन व्हावे या हेतूने दोन्ही विद्यापीठे हे शताब्दी वर्ष साजरे करणार असल्याचेही कुलगुरू शिंदे यांनी सांगितले.व्यवस्थापन सुधार हेच लक्षविद्यापीठातील शिक्षक-विद्यार्थी, कर्मचारी- अधिकारी यात सुसंवाद व्हावा यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे कुलगुरू शिंदे यांनी सांगितले. तसेच सध्या सुरू असलेल्या सीईटी आणि त्यानंतर प्रवेश प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पाडणे हे मुख्य काम आहे. विद्यापीठात विद्यार्थी हे केंद्रस्थानी असून, शिक्षक हा गाभा असून येथील बौद्धिक संपदेचा योग्य वापर करण्यासंदर्भात योग्य निर्णय घेण्यात येतील. विविध विभागातील रिक्त पदांवर सीएसबीवरील प्राध्यापकांच्या नियुक्त्या प्राधान्याने करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. यासोबतच विद्यार्थिनी वसतिगृहातील अडचणी स्वत: जाऊन पाहणार असल्याची माहितीसुद्धा कुलगुरू शिंदे यांनी दिली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्रuniversityविद्यापीठ