मानूर येथे पट्टाभिषेक सोहळा उत्साहात

By Admin | Updated: August 18, 2016 00:57 IST2016-08-18T00:30:15+5:302016-08-18T00:57:53+5:30

राजेश खराडे , बीड जय...शिवा...हर...हर महादेव च्या जयघोषाने तब्बल चार वर्षानंतर मनूर येथील देवस्थान दुमदुमले होते. न्यायालयीन वाद मिटल्यानंतर नागेश विश्वनाथ पुराणिक यांची

To celebrate the Pattabhishek festival at Manoor | मानूर येथे पट्टाभिषेक सोहळा उत्साहात

मानूर येथे पट्टाभिषेक सोहळा उत्साहात


राजेश खराडे , बीड
जय...शिवा...हर...हर महादेव च्या जयघोषाने तब्बल चार वर्षानंतर मनूर येथील देवस्थान दुमदुमले होते. न्यायालयीन वाद मिटल्यानंतर नागेश विश्वनाथ पुराणिक यांची मठाधिपती म्हणून निवड करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. श्रावण महिन्याचे औचित्य साधले. बुधवारी मंदिर परिसरात राजयोग साधून पट्टाभिषेक करण्यात आला. मठसंस्थानचे उत्तराधिकार बहाल करून गुरू गिरी शिवाचार्य मानूरकर महाराज म्हणून त्यांचे नामकरण करण्यात आले.
हजारो भाविकांच्या उपस्थितीत बुधवारी पहाटे ६ वा. पासून मानूर देवस्थानात पट्टाभिषकास सुरवात झाली होती. शिवाचार्य मांढकेर महाराज यांच्या गुरू साक्षीने व शिवलिंग शिवाचार्य महाराज बेंगळीकर यांच्या गुरूतत्वात हा अभिषेक पार पडला. नागेश पुराणिक महराज यांची जय...शिवा...हर. ..हर... महादेवच्या जघोषात मानूर गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. कीर्तन, प्रवचन व महिलांच्या डोक्यावरील कलशाने लक्ष वेधले होते. पट्टाभिषेकाचा विधी उरकल्यानंतर मंदिर परिसरातच शंखनादाने धर्मसभेला सुरवात झाली होती. यावेळी धर्मगुरू-शिवाचार्य, मानूर मठाचे शिष्य, शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.मनोहर धोंडे, आ. जयदत्त क्षीरसागर, माजी मंत्री. सुरेश धस, जयदत्त धस, जिल्हाध्यक्ष सचिन शहागडकर, संजय गिराम, तालुकाध्यक्ष प्रवीण शेटे, उमाकांत शेटे, वैजिनाथ काळकर, शैलेश जगापूरे, प्रकाश स्वामी, संध्या तोछकर, अरूण लथे, रोहिदास पाटील, सरपंच विठ्ठल वनवे, संजय गाढवे यांच्यासह इतर जिल्ह्यातून व परराज्यातील वीरशैव समाजाचे भाविक उपस्थित होते.
यावेळी शिवा संघटनेचे अध्यक्ष म्हणाले की, न्यायालयाच्या निर्णयानंतर मठाच्या विकासाला योग्य दिशा मिळणार आहे. गावकऱ्यांचे मतपरिवर्तन झाले ही मोठी बाब आहे. राज्यातील ३५० मठापैकी बीड जिल्ह्यात कपिलधार येथे मन्मथ स्वामी यांची समाधी असून मानूर येथे त्यांचेच गुरूगड असल्याने जिल्ह्याचे मोठे भाग्य आहे. गत पाचवर्षात विकास कामांना बसलेली खिळ आता मोडीत काढून कामाला लागायचे आहे. वीरशैव समाजांच्या तत्वांची अंमलबजावणी करून शिवा संघटना काम करीत आहे. येथील मठाकरिता गुरूवर्य परंडकर महाराज व गुरू गिरी शिवाचार्य महाराज यांचे मोठे योगदान राहिले आहे. आता विरपक्ष शिवाचार्य नागेश महाराज यांच्या रुपाने मठाधिपती लाभले असून पुर्वजांची उणिव भासू देणार नाहीत. महाराजांच्या प्रत्येक निर्णयामागे शिवा संघअना एक ढाल म्हणून कार्यरत राहणार असल्याचे यावेळी प्रा. धोंडे यांनी सांगून शिवभक्तांमध्ये नवचैतन्य निर्माण केले. आ. जयदत्त क्षीरसागर यांनी मानूर मठाची महती सांगितली. न्यायालयाच्या निर्णयानंतर संपूर्ण वाद मिटल असून येथील मठाच्या गुरूघराची सबंध देशात चर्चा असल्याचे सांगितले. आता भाविक आणि देवस्थानाचा धागा मजबूत करणे गरजेचे आहे. ते म्हणाले की, देवस्थानची फसवणूक केल्यास कशी काटाला लागते हे आपणाला माहिती आहेच. त्यामुळे आगामी चांगली भावना ठेऊनच काम करण्याचा सूचक सल्ला त्यांनी दिला. माजी मंत्री सुरेश धस यांनी गत पाच वर्षात मठाची झालेली दुरवस्था मांडली. दरम्यानच्या घटना ह्या गैरसमजुतीमधून झाल्या होत्या. त्याबद्दल धस यांनी जाहिर माफी मागून पुन्हा मठाच्या विकासाबाबत आशा व्यक्त केली. शिवाचार्य बेळंकीकर महराज, शिवाचार्य माढेकर महाराज आदींनी मनोगत व्यक्त करून गुरूगिरी शिवाचार्य नागेश महाराज यांना भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. धर्मसभेनंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

Web Title: To celebrate the Pattabhishek festival at Manoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.