शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

मोतीबिंदू शस्त्रकियेला 'कोरोना'ची लागण; शेकडो रुग्णांना काचबिंदू होण्याचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 15:26 IST

मोतीबिंदू ५० वर्षांवरील व्यक्तीत आढळून येण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे रुग्णाला अंधुक दिसते.

ठळक मुद्देमार्चपासून शस्त्रक्रिया ठप्प आहेतमोतीबिंदू अधिक दिवस तसाच राहिला, तर त्याचे रूपांतर काचबिंदूत होते.

- संतोष हिरेमठ 

औरंगाबाद : राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत होणाऱ्या मोतीबिंदू शस्त्रकियेलाही कोरोनाची लागण झाली आहे. मार्चपासून या शस्त्रक्रिया ठप्प आहेत. परिणामी, शेकडो रुग्णांच्या मोतीबिंदूचे रूपांतर काचबिंदूत होऊन कायमची नजर जाण्याचा धोका नेत्र शल्यचिकित्सकांकडून व्यक्त होत आहे.

मोतीबिंदू ५० वर्षांवरील व्यक्तीत आढळून येण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे रुग्णाला अंधुक दिसते. मोतीबिंदू अधिक दिवस तसाच राहिला, तर त्याचे रूपांतर काचबिंदूत होते. त्यातून अधिक त्रास सहन करण्याची वेळ येते. दृष्टी जाण्याचीही भीती असते. राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्य नागरिकांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया होत असतात; परंतु राज्यात कोरोनाचा शिरकाव झाला आणि मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया बंद पडल्या. याचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील रुग्णांना बसत आहे. मोतीबिंदू शस्त्रक्रियांचे लक्ष्य आगामी कालावधीत अधिक शिबीर घेऊन पूर्ण केले जाईल, असे आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्नील लाळे यांनी सांगितले.

एका जिल्ह्यात ३०० ते ५०० शस्त्रक्रियाराज्यात एका जिल्ह्यात महिन्याला ३०० ते ५०० शस्त्रक्रिया होतात. एकट्या औरंगाबादेत जिल्हा रुग्णालयांतर्गत आमखास मैदानासमोरील नेत्र विभागात महिन्याला सुमारे २५० ते ३०० रुग्णांच्या शस्त्रक्रिया होतात. मात्र, जिल्ह्यात मार्चपासून या शस्त्रक्रिया बंद आहेत. राज्यभरात हीच स्थिती आहे. 

रोजच्या जेवणाची सोय नाही, तिथे शस्त्रक्रिया कशी करणार?लक्ष्मीबाई पवार  (पिंप्रीराजा औरंगाबाद) म्हणाल्या, तीन महिन्यांपासून चकरा मारत आहे. मोतीबिंदू आता पिकला आहे.  शंकर तोकडे म्हणाले, एका डोळ्याची शस्त्रक्रिया झाली; पण दुसऱ्या डोळ्याची शस्त्रक्रिया बाकी आहे. राम जाधव म्हणाले, खाजगी रुग्णालयात २० हजार रुपये सांगितले. कोरोनामुळे दोन वेळच्या जेवणाची सोय होत नाही, तिथे या शस्त्रकियेसाठी इतके पैसे कुठून आणायचे.  

खाजगीत लाखापर्यंत खर्चखासगी रुग्णालयांमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियांसाठी ५ हजारांपासून तर एक लाख रुपयांपर्यंत रक्कम मोजावी लागते. मात्र, राष्ट्रीय योजनेंतर्गत ही शस्त्रक्रिया मोफत केली जाते. त्यामुळे शहर व ग्रामीण भागातील गरीब व मध्यमवर्गातील नागरिक मोठ्या प्रमाणात त्याचा लाभ घेतात; परंतु सरकारी रुग्णालयात शस्त्रक्रिया बंद आणि खाजगीत सुरू, अशी सध्या परिस्थिती असल्याचे शासकीय नेत्र चिकित्सा अधिकारी संघटनेने सांगितले.

शस्त्रक्रिया सुरू कराराज्यात मार्चपासून सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत असलेल्या शासकीय रुग्णालयांत मोतीबिंदू शस्त्रक्रिया बंद आहेत. त्यामुळे रुग्णांची विशेषत: ग्रामीण भागातील रुग्णांची हेळसांड होत आहे. त्यामुळे मोतीबिंदू शस्त्रक्रिया पुन्हा सुरू करण्याची मागणी आम्ही केली आहे. - डॉ. महेश वैष्णव, राज्य अध्यक्ष, शासकीय नेत्र  चिकित्सा अधिकारी संघटना

टॅग्स :Healthआरोग्यdoctorडॉक्टरAurangabadऔरंगाबाद