शहरं
Join us  
Trending Stories
1
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
2
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
3
मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, नेमकं प्रकरण काय?
4
'हल्ली मुली नग्न होऊन पैसे कमावत आहेत'; साध्वी ऋतंभरा यांच्या विधानाने नवा वाद
5
फक्त ३,००० रुपये भरा आणि वर्षभर टोल फ्री प्रवास करा, १५ ऑगस्टपासून नवा नियम! फक्त 'या' वाहनांना लागू
6
Mahabharat: एखादी गोष्ट बायकांच्या पोटात राहत नाही, त्याला कारणीभूतआहे महाभारतातली 'ही' कथा!
7
IND vs ENG : एक धाव वाचवण्याच्या नादात 'मॅच विनर' खेळाडू कसोटीतून OUT; टीम इंडिया याचा फायदा उठवणार?
8
PM Kisan योजनेच्या २० व्या हप्त्यासाठी फक्त एक दिवस शिल्लक; लाभार्थींच्या यादीत नाव आहे का चेक करा
9
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
10
चीनमुळे अनेक उद्योगांवर संकट, सामना करण्यासाठी आता भारताचा 'मास्टर प्लान', सरकार उचलणार पाऊल?
11
महाराष्ट्र बदलतोय : पैठणी ते कोल्हापुरी चप्पल, MSME उद्योगांची डिजिटल झेप!
12
२ पिढ्या पण ध्येय एकच! माय-लेकीच्या जोडीची दमदार कामगिरी, एकत्र पास केली NEET
13
दमदार इंजिन, शानदार मायलेज..; Honda ने लॉन्च केली स्वस्त स्पोर्ट्स बाईक, किंमत...
14
Powerful Air Forces : जगातील सगळ्यात ताकदवान हवाई दलं; भारत 'टॉप ५'मध्ये कितव्या स्थानावर?
15
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
16
रमीला ऑलिम्पिक दर्जा मिळणार, कोकाटेंना क्रीडा मंत्रालय देऊन सन्मानच; काँग्रेसचा महायुतीला चिमटा
17
Monsoon Recipe: तुम्ही कधी पंजाबी शिरा 'प्यायलात' का? ट्राय करा, पावसाळी आजारांवरचा चविष्ट उपाय!
18
ओव्हल कसोटीत टीम इंडियाकडून झाली मोठी चूक, ठरू शकते पराभवाचं कारण  
19
UPI New Rule: आजपासून लागू झाले यूपीआयचे नवे नियम; सारखं सारखं करता येणार नाही 'हे' काम
20
दीड वर्षांचा लेक, महिन्याभरापूर्वी प्रमोशन; लेफ्टनंट कर्नल भानू प्रताप शहीद, दगड पडले अन्...

कॅबिनेटमंत्री भुजबळ नेमके कोणत्या सरकारवर टीका करीत आहेत ? संभाजी ब्रिगेडचा सवाल

By बापू सोळुंके | Updated: November 18, 2023 12:25 IST

संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांचा सवाल

छत्रपती संभाजीनगर : जालना जिल्ह्यातील अंबड येथे ओबीसी समाजाच्या मेळाव्यात महाराष्ट्र राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. कदाचित ते राज्य सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असल्याने सरकारचा भाग आहे, हे ते विसरलेले दिसतात, असा टोला संभाजी ब्रिगेडचे राज्य प्रवक्ता डॉ.शिवानंद भानुसे यांनी लगावला.

डॉ. भानुसे म्हणाले की, भुजबळ यांना राज्य सरकारचे निर्णय त्यांना पटत नसेल तर त्यांनी मंत्रिमंडळातून बाहेर पडावे किंवा सरकारविरोधी भूमिका घेणाऱ्या भुजबळांची मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेटमधून हकालपट्टी करावी, हीच खरी लोकशाही असल्याचे त्यांना दाखवून द्यावे, असे आपले त्यांना आव्हान आहे. भुजबळ यांनी अंबड येथील सभेमध्ये राज्य सरकारने नेमलेल्या राज्य मागासवर्गीय आयोगावर, मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या तीन न्यायमूर्तीच्या समितीमधील न्यायमूर्ती संंदीप शिंदे समितीवर, न्यायमूर्ती गायकवाड आयोगावर आणि राज्य सरकारच्या कामकाजावर कडाडून टीका केली. सरकारचा एक भाग असलेला मंत्रीच राज्य सरकारवर टीका करतो. हे मोठे आश्चर्य आहे. जर त्यांना राज्य सरकारच्या भूमिका, सरकारचे ध्येय, धोरण, सरकारचे कामकाज आवडत नाही. तर ते राज्यसरकार मधून बाहेर का पडत नाहीत ? आणि ते स्वतः सरकारचा घटक असल्यामुळे ते नेमक्या कोणत्या राज्य सरकारवर टीका करतात ? असा सवाल भानुसे यांनी केला. आपल्याच सरकारवर टीका करणाऱ्या भुजबळांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे बडतर्फ का करत नाहीत. याचा अर्थ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्री छगन भुजबळ व विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे सर्व मिळून महाराष्ट्रातील जनतेला वेड्यात काढत असल्याचे ते म्हणाले.

जाणीवपूर्वक जातीय तेढ निर्माण करू नकाओबीसी नेते प्रकाश शेंडगे म्हणाले की, तुम्ही जर भुजबळांना पाडणार असाल तर आम्ही ११७ मराठ्यांचे आमदार पाडू. त्यावर आमचं म्हणणं आहे की, जर येत्या अधिवेशनात जे आमदार मराठा आरक्षणावर बोलले नाही तर आम्हीच भुजबळांसह सर्वानाच पाडू. हा शिव, फुले, शाहू, आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. येथे जाणीवपूर्वक जाती-जातीत तेढ निर्माण करू नका, असा इशाराही संभाजी ब्रिगेडने दिला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMaratha Reservationमराठा आरक्षणOBC Reservationओबीसी आरक्षण