छत्रपती संभाजीनगर : शहराची तहान भागविण्यासाठी २७४० कोटी रुपये खर्च करून नवीन पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत महापालिकेला स्वहिस्सा म्हणून ८२२ कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. एवढी मोठी रक्कम मनपाकडे नाही. मागील काही वर्षांपासून ही रक्कम बिनव्याजी कर्ज स्वरूपात मिळावी यासाठी मनपाचे प्रयत्न सुरू होते. मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत मनपाला ८२२ कोटींचे कर्ज मंजूर करण्यात आले. हुडकोकडून हे कर्ज मनपाला ८.९० टक्के दराने मिळेल. या कर्जाचा हफ्ता दरमहा किमान १७ ते १८ कोटी रुपये राहणार आहे.
२७४० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेत केंद्र शासन २५ टक्के, राज्य शासन ४५ टक्के आणि मनपा ३० टक्के रक्कम देईल असे ठरले. त्यानुसार कोरोना संसर्गापूर्वी काम सुरू झाले. महापालिकेने आपल्या हिश्शाची रक्कम टाकलीच नाही. कारण एवढी मोठी रक्कम मनपाकडे नाही. मागील २ वर्षांपासून बिनव्याजी कर्ज मिळावे यासाठी मनपाकडून प्रयत्न सुरू होते. या प्रयत्नांना यश आले नाही. शेवटी राज्य शासनाने मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत मनपाला हुडकोकडून ८.९० टक्के दराने ८२२ कोटी २२ लाख रुपये मंजूर केले. या कर्जाचा दरमहा हप्ता किमान १७ ते १८ कोटी रुपये येईल. एवढी मोठी रक्कमही मनपाला अदा करणे शक्य होणार नाही.
-योजनेचा एकूण खर्च-२७४० कोटी रुपये-केंद्र सरकार हिस्साः २५ टक्के (६८५ कोटी १९ लाख)- राज्य शासन हिस्साः ४५ टक्के (१२३३ कोटी ३४ लाख)
- महापालिकेचा हिस्साः ३० टक्के (८२२ कोटी २२ लाख)
आतापर्यंत कोणाचा किती निधी प्राप्तशासन....... एकूण हिस्सा..... दिलेला निधी..... प्रलंबित निधी (आकडे कोटीत)केंद्र.............६८५ ------------६४६------------- ३९राज्य....... १२३३---------------- ११६१------------७२मनपा........८२२------------------०००-------------८२२