बीड बायपास ठरतोय मृत्यूचा सापळा

By Admin | Updated: May 6, 2016 00:02 IST2016-05-05T23:59:09+5:302016-05-06T00:02:56+5:30

औरंगाबाद : जालना रोडनंतर गेल्या काही वर्षांत बीड बायपास रोड सर्वाधिक वर्दळीचा मार्ग बनला आहे. अवजड वाहनांसह सातारा-देवळाई परिसरातील नागरिकांसाठी हा मार्ग महत्त्वाचा आहे;

Bypassing the bead leads to the trap of death | बीड बायपास ठरतोय मृत्यूचा सापळा

बीड बायपास ठरतोय मृत्यूचा सापळा

औरंगाबाद : जालना रोडनंतर गेल्या काही वर्षांत बीड बायपास रोड सर्वाधिक वर्दळीचा मार्ग बनला आहे. अवजड वाहनांसह सातारा-देवळाई परिसरातील नागरिकांसाठी हा मार्ग महत्त्वाचा आहे; परंतु या रस्त्यावर पावला-पावलावर वाहनधारकांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. अपघातांची मालिका थांबत नसल्याने एकप्रकारे बीड बायपास मृत्यूचा सापळाच ठरत आहे.
बीड बायपास रोडवरील एमआयटी महाविद्यालयासमोर कंटेनरने दुचाकीला दिलेल्या धडकेत मुलगी ठार झाल्याची मंगळवारी सायंकाळी घटना घडली. दुचाकीवरून वडिलांसोबत जात असताना एमआयटी महाविद्यालयाजवळील गतिरोधक आल्याने वडिलांनी दुचाकीची गती कमी केली. त्याच वेळी पाठीमागून येणाऱ्या कंटनेरने दुचाकीला धडक दिली आणि अपघात झाला. यामध्ये डोक्याला मार लागल्याने मुलीला प्राण गमवावा लागला. भरधाव वाहनांचा वेग गतिरोधकाजवळ अचानक कमी होतो. अशा वेळी पाठीमागून येणारी वाहने धडकण्याचा धोका निर्माण होत आहे. लांबचा वळसा टाळण्यासाठी वाहनधारक थेट राँग साईड वाहने पळविण्यावर भर देत आहेत. त्यातून अपघाताला आमंत्रण मिळत आहे.

Web Title: Bypassing the bead leads to the trap of death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.