शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

'रेड्याच्या मुखी वेद बोलविला'; ऐतिहासिक घटनेस झाले ७३३ वर्ष पूर्ण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 18:22 IST

संत ज्ञानेश्वर महाराजांनी पैठणच्या नागघाटावर रेड्याच्या मुखातून वेद म्हणून घेतले होते.

             रेड्यामुखी वेद बोलविला               गर्व द्विज्यांचा हरविला।।

मुंजीसाठी शुद्धीपत्र मिळविण्या करीता संत ज्ञानेश्वर महाराजांनी पैठणच्या नागघाटावर रेड्याच्या मुखातून वेद म्हणून घेतले होते. या घटनेला आज वसंत पंचमीला ७३३ वर्ष पूर्ण झाले, यानिमित्ताने संत ज्ञानेश्वर महाराज भक्त मंडळाच्या वतीने रेड्याच्या मुर्तीस अभिषेक घालून परंपरेनुसार नागघाटावर वसंत पंचमी उत्सव साजरा करण्यात आला.

रेड्याच्या डोक्यावर हात वेदाचे उच्चार रेड्याच्या मुखातून...गोदाकाठावरीर सर्वात प्राचिन घाट म्हणून नागघाट ओळखला जातो. हा घाट सातवाहनकालापासून अस्तित्वात आहे.  नागडोह म्हणून महानुभावांच्या साहित्यात नागघाटाची नोंद आहे. याच नागघाटावर ज्ञानेश्वरांनी रेड्यामुखी वेद वदविण्याचा चमत्कार करून दाखविला,  संत निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान-मुक्ताबाई  ही भावंडे पैठण धर्मपीठाच्या अधिकारी मंडळीकडून शुद्धीपत्र घेण्यासाठी नागघाटावर आले होते. तेव्हा एकाने  ज्ञानेश्वरांना,  तू जिवाशिवाचे तत्त्वज्ञान सांगतोस मग रेड्याच्या मुखातून वेद म्हणवून दाखव असे आव्हान दिले. तेथून एक रेडा चालला होता. ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि वेदांचे उच्चारण रेड्याच्या मुखातून होऊ लागले. त्यावेळी ज्ञानेश्वर महाराजांचे वय अवघे १२ वर्षांचे होते. या घटनेने नागघाटाचे महत्त्व आजही अबाधित आहे.

नागघाट राष्ट्रीय स्मारक घोषित करा....अनेक महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांचा साक्षिदार असलेला गोदावरी काठावरील नागघाट अत्यंत प्राचीन वास्तू आहे. नागघाटाच्या परिसरात शालिवाहन राजवटीचे अवशेष आजही उभे असून ते पुरातत्व खात्याच्या ताब्यात आहेत. एतिहासिक वारसा असलेल्या नागघाटास राष्ट्रीय स्मारक करा अशी मागणी सातत्याने होत असून  या मागणीची दखल अद्याप पुरातत्व खात्याने घेतली नाही.

पैठणकरांनी उत्साहात केला साजरा  नागघाटावरील रेड्याच्या मुर्तीस द्वारकाबाई तांगडे व सुमनबाई मांदळे यांच्या हस्ते व महेश शिवपूरी यांच्या मंञघोषात अभिषेक घालण्यात आला. यावेळी बंडेराव जोशी यांनी ज्ञानेश्वरीच्या मुखोद्गत असलेल्या ५०० ओव्यांचे पारायण केले. सामाजिक कार्यकर्ते दिनेश पारीख, बन्सीलाल चावक, अँड. चंद्रशेखर कुलकर्णी, विष्णू ढवळे, संतोष छडीदार, रमेश खांडेकर, सतिष सराफ, भिमसिंग बुंदिले, जगन्नाथ जमादार, रावसाहेब गोर्डे, शंकर खंदाडे, शहादेव लोहारे आदींनी यावेळी मनोगत व्यक्त केले. 

उत्सव यशस्वी करण्यासाठी भालचंद्र बेंद्रे, गणेश बांगर, धनराज चितलांगी, प्रशांत हिंगे, किशोर भाकरे, जितू घोडके, जना मिटकर, नवनाथ वडेकर, श्रीरंग मडके, प्रकाश रावस, सुयश शिवपूरी, संजय पाटील, ईश्वर म्हस्के, रमेश पाठक, स्वप्निल देवरे, अशोक महेपडे, अरविंद तांगडे, राजू भंडारी, अनिल सराफ, गोविंद शिंदे, प्रसाद ख्रिस्ती, गोकूळ वरकड, पंडीत बोंबले, योगेश साबळे, संतोष कुलकर्णी, तुकाराम बडसल, पियुष सराफ, लालू जव्हेरी, मंदार उज्जैनकर, सुनील जगधने, केदार मिरदे, मुकेश सोनारे, विलास उफाड, राजू लोहीया आदींनी विशेष परीश्रम घेतले. रेड्याच्या दगडी मुर्तीवर पुष्पवृष्टी करून महा आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली.

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAurangabadऔरंगाबादAdhyatmikआध्यात्मिक