शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद जिल्ह्याचा ६३ कोटींचा टंचाई आराखडा तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 20:10 IST

 जिल्ह्यात यंदा अत्यल्प पाऊस झाल्यामुळे पाणीटंचाई तीव्र स्वरुपात जाणवू लागली आहे.

औरंगाबाद :  जिल्ह्यात यंदा अत्यल्प पाऊस झाल्यामुळे पाणीटंचाई तीव्र स्वरुपात जाणवू लागली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेने आॅक्टोबर ते डिसेंबर, असा तीन महिन्यांचा ६३ कोटी ३० लाख रुपयांचा टंचाई आराखडा तयार केला आहे. तथापि, या टंचाई आराखड्यात टँकर व विहीर अधिग्रहणाचा खर्च मात्र, जून २०१९ अखेरपर्यंतचा प्रस्तावित करण्यात आला आहे. 

साधारणपणे पावसाळा अखेर आॅक्टोबरमध्ये टंचाई आराखडा तयार करून तो जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला जातो. जिल्हा परिषदेमार्फत आॅक्टोबर ते डिसेंबर, जानेवारी ते मार्च आणि एप्रिल ते जून, असा तीन- तीन महिन्यांचा टंचाई आराखडा तयार केला जातो. यंदा जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट असल्यामुळे टंचाई आराखड्यात उपाययोजना सुचविण्यात आलेल्या आहेत. 

यामध्ये जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई असलेल्या २४५ गावांमध्ये ५६४ विंधन विहिरी घेण्याचे प्राधान्याने सुचविलेले आहे. ज्यामुळे काहीअंशी का होईना या २४५ गावांतील नागरिकांची तहान भागेल. ३२ गावांमध्ये तात्पुरती नळ योजनांची कामे करणे, ८४ गावांमध्ये असलेल्या पाणीपुरवठा योजनांच्या दुरुस्तीची कामे सुचविण्यात आली आहेत. याशिवाय ९ गावांमध्ये असलेल्या विंधन विहिरींची दुरुस्तीही प्रस्तावित करण्यात आलेली आहे. या टंचाई आराखड्यामध्ये आॅक्टोबर ते जूनअखेरपर्यंत टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी ५१० टँकर व ३८० विहिरींचे अधिग्रहण करावे लागेल, असे नमूद करण्यात आले असून, यासाठी जूनअखेरपर्यंत लागणाऱ्या निधीचीदेखील तरतूद करण्यात आली आहे.

पूर्वी तीन- तीन महिन्यांसाठी अपेक्षित टँकर व विहीर अधिग्रहणाची संख्या नमूद केली जात होती; परंतु अनेकदा मंजूर गावांपेक्षा टँकरची संख्या जास्त दिसत होती. त्यामुळे टंचाई आराखड्यात आॅक्टोबर ते जूनअखेरपर्यंत अपेक्षित टँकर व विहीर अधिग्रहण संख्या नमूद करण्याच्या सूचना होत्या. त्यानुसार नोंदी करण्यात आल्या आहेत. 

जिल्ह्यात सध्या गंगापूर, त्याखालोखाल पैठण व त्यानंतर वैजापूर या तीन तालुक्यांमध्ये सर्वाधिक पाणीटंचाई आहे. गंगापूर तालुक्यातील ७६ गावे, पैठण तालुक्यातील ४३ गावे, तर वैजापूर तालुक्यातील ४० गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. कन्नड, खुलताबाद व सोयगाव या तीन तालुक्यांमध्ये मात्र, सध्या तरी पाणीटंचाई जाणवत नसल्यामुळे या तिन्ही तालुक्यांत सध्या टँकर सुरू नाहीत. असे असले तरी उर्वरित ६ तालुक्यांमध्ये २०४ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून, ११९ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदdroughtदुष्काळWaterपाणीfundsनिधी