शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

औरंगाबाद जिल्ह्याचा ६३ कोटींचा टंचाई आराखडा तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 20:10 IST

 जिल्ह्यात यंदा अत्यल्प पाऊस झाल्यामुळे पाणीटंचाई तीव्र स्वरुपात जाणवू लागली आहे.

औरंगाबाद :  जिल्ह्यात यंदा अत्यल्प पाऊस झाल्यामुळे पाणीटंचाई तीव्र स्वरुपात जाणवू लागली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेने आॅक्टोबर ते डिसेंबर, असा तीन महिन्यांचा ६३ कोटी ३० लाख रुपयांचा टंचाई आराखडा तयार केला आहे. तथापि, या टंचाई आराखड्यात टँकर व विहीर अधिग्रहणाचा खर्च मात्र, जून २०१९ अखेरपर्यंतचा प्रस्तावित करण्यात आला आहे. 

साधारणपणे पावसाळा अखेर आॅक्टोबरमध्ये टंचाई आराखडा तयार करून तो जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला जातो. जिल्हा परिषदेमार्फत आॅक्टोबर ते डिसेंबर, जानेवारी ते मार्च आणि एप्रिल ते जून, असा तीन- तीन महिन्यांचा टंचाई आराखडा तयार केला जातो. यंदा जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट असल्यामुळे टंचाई आराखड्यात उपाययोजना सुचविण्यात आलेल्या आहेत. 

यामध्ये जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई असलेल्या २४५ गावांमध्ये ५६४ विंधन विहिरी घेण्याचे प्राधान्याने सुचविलेले आहे. ज्यामुळे काहीअंशी का होईना या २४५ गावांतील नागरिकांची तहान भागेल. ३२ गावांमध्ये तात्पुरती नळ योजनांची कामे करणे, ८४ गावांमध्ये असलेल्या पाणीपुरवठा योजनांच्या दुरुस्तीची कामे सुचविण्यात आली आहेत. याशिवाय ९ गावांमध्ये असलेल्या विंधन विहिरींची दुरुस्तीही प्रस्तावित करण्यात आलेली आहे. या टंचाई आराखड्यामध्ये आॅक्टोबर ते जूनअखेरपर्यंत टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी ५१० टँकर व ३८० विहिरींचे अधिग्रहण करावे लागेल, असे नमूद करण्यात आले असून, यासाठी जूनअखेरपर्यंत लागणाऱ्या निधीचीदेखील तरतूद करण्यात आली आहे.

पूर्वी तीन- तीन महिन्यांसाठी अपेक्षित टँकर व विहीर अधिग्रहणाची संख्या नमूद केली जात होती; परंतु अनेकदा मंजूर गावांपेक्षा टँकरची संख्या जास्त दिसत होती. त्यामुळे टंचाई आराखड्यात आॅक्टोबर ते जूनअखेरपर्यंत अपेक्षित टँकर व विहीर अधिग्रहण संख्या नमूद करण्याच्या सूचना होत्या. त्यानुसार नोंदी करण्यात आल्या आहेत. 

जिल्ह्यात सध्या गंगापूर, त्याखालोखाल पैठण व त्यानंतर वैजापूर या तीन तालुक्यांमध्ये सर्वाधिक पाणीटंचाई आहे. गंगापूर तालुक्यातील ७६ गावे, पैठण तालुक्यातील ४३ गावे, तर वैजापूर तालुक्यातील ४० गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. कन्नड, खुलताबाद व सोयगाव या तीन तालुक्यांमध्ये मात्र, सध्या तरी पाणीटंचाई जाणवत नसल्यामुळे या तिन्ही तालुक्यांत सध्या टँकर सुरू नाहीत. असे असले तरी उर्वरित ६ तालुक्यांमध्ये २०४ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून, ११९ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदdroughtदुष्काळWaterपाणीfundsनिधी