शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

औरंगाबाद जिल्ह्याचा ६३ कोटींचा टंचाई आराखडा तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 20:10 IST

 जिल्ह्यात यंदा अत्यल्प पाऊस झाल्यामुळे पाणीटंचाई तीव्र स्वरुपात जाणवू लागली आहे.

औरंगाबाद :  जिल्ह्यात यंदा अत्यल्प पाऊस झाल्यामुळे पाणीटंचाई तीव्र स्वरुपात जाणवू लागली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेने आॅक्टोबर ते डिसेंबर, असा तीन महिन्यांचा ६३ कोटी ३० लाख रुपयांचा टंचाई आराखडा तयार केला आहे. तथापि, या टंचाई आराखड्यात टँकर व विहीर अधिग्रहणाचा खर्च मात्र, जून २०१९ अखेरपर्यंतचा प्रस्तावित करण्यात आला आहे. 

साधारणपणे पावसाळा अखेर आॅक्टोबरमध्ये टंचाई आराखडा तयार करून तो जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला जातो. जिल्हा परिषदेमार्फत आॅक्टोबर ते डिसेंबर, जानेवारी ते मार्च आणि एप्रिल ते जून, असा तीन- तीन महिन्यांचा टंचाई आराखडा तयार केला जातो. यंदा जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट असल्यामुळे टंचाई आराखड्यात उपाययोजना सुचविण्यात आलेल्या आहेत. 

यामध्ये जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई असलेल्या २४५ गावांमध्ये ५६४ विंधन विहिरी घेण्याचे प्राधान्याने सुचविलेले आहे. ज्यामुळे काहीअंशी का होईना या २४५ गावांतील नागरिकांची तहान भागेल. ३२ गावांमध्ये तात्पुरती नळ योजनांची कामे करणे, ८४ गावांमध्ये असलेल्या पाणीपुरवठा योजनांच्या दुरुस्तीची कामे सुचविण्यात आली आहेत. याशिवाय ९ गावांमध्ये असलेल्या विंधन विहिरींची दुरुस्तीही प्रस्तावित करण्यात आलेली आहे. या टंचाई आराखड्यामध्ये आॅक्टोबर ते जूनअखेरपर्यंत टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी ५१० टँकर व ३८० विहिरींचे अधिग्रहण करावे लागेल, असे नमूद करण्यात आले असून, यासाठी जूनअखेरपर्यंत लागणाऱ्या निधीचीदेखील तरतूद करण्यात आली आहे.

पूर्वी तीन- तीन महिन्यांसाठी अपेक्षित टँकर व विहीर अधिग्रहणाची संख्या नमूद केली जात होती; परंतु अनेकदा मंजूर गावांपेक्षा टँकरची संख्या जास्त दिसत होती. त्यामुळे टंचाई आराखड्यात आॅक्टोबर ते जूनअखेरपर्यंत अपेक्षित टँकर व विहीर अधिग्रहण संख्या नमूद करण्याच्या सूचना होत्या. त्यानुसार नोंदी करण्यात आल्या आहेत. 

जिल्ह्यात सध्या गंगापूर, त्याखालोखाल पैठण व त्यानंतर वैजापूर या तीन तालुक्यांमध्ये सर्वाधिक पाणीटंचाई आहे. गंगापूर तालुक्यातील ७६ गावे, पैठण तालुक्यातील ४३ गावे, तर वैजापूर तालुक्यातील ४० गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. कन्नड, खुलताबाद व सोयगाव या तीन तालुक्यांमध्ये मात्र, सध्या तरी पाणीटंचाई जाणवत नसल्यामुळे या तिन्ही तालुक्यांत सध्या टँकर सुरू नाहीत. असे असले तरी उर्वरित ६ तालुक्यांमध्ये २०४ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून, ११९ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदdroughtदुष्काळWaterपाणीfundsनिधी