कृषी क्षेत्राला चालना देणारा अर्थसंकल्प

By Admin | Updated: March 19, 2016 00:55 IST2016-03-19T00:33:06+5:302016-03-19T00:55:13+5:30

लातूर : कृषी आणि ग्रामीण अर्थकारणाला चालना देणारा राज्याचा अर्थसंकल्प आहे. कृषीसाठी विविध योजना अर्थसंकल्पात जाहीर झाल्या असून

Budget to promote agriculture sector | कृषी क्षेत्राला चालना देणारा अर्थसंकल्प

कृषी क्षेत्राला चालना देणारा अर्थसंकल्प


लातूर : कृषी आणि ग्रामीण अर्थकारणाला चालना देणारा राज्याचा अर्थसंकल्प आहे. कृषीसाठी विविध योजना अर्थसंकल्पात जाहीर झाल्या असून, कृषी विकासात झालेली घट या अर्थसंकल्पामुळे भरून निघेल. मूल्यवर्धित कर वाढविल्यामुळे व्यापारी वर्गाचे नुकसान झाल्याच्या व्यापारी वर्गातून उमटल्या आहेत.५ टक्क्यांवरून व्हॅट वाढवून तो साडेपाच टक्के केला आहे़ मराठवाड्यात दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे़ टॅक्स कमी करा म्हणून शासनाकडे मागणी करूनही तो वाढविण्यात आल्याने व्यापाऱ्यांसाठी मारक आहे. अर्धा टक्का व्हॅट वाढविल्यामुळे व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडेल, असे व्यापारी महासंघाचे दिनेश गिल्डा, प्रदीप सोलंकी म्हणाले.
अर्थसंकल्प शेतकरी प्रधान आहे़ शेतीपूरक योजनेस चालना आहे. मोठी तरतूद शेतकऱ्यांसाठी या अर्थसंकल्पात झाली असल्याचे चार्टर्ड अकौंटंट प्रकाश कासट म्हणाले.
शेतकरी सावरेल...
अर्थसंकल्पात शेतकरी केंद्रबिंदू आहे. विशेष तरतुदी आहेत़ त्यामुळे शेतकरी नापिकी, कर्ज बाजारीपणातून सावरेल, असे कर सल्लागार अ‍ॅड. विश्वनाथ पंचाक्षरी म्हणाले.
अर्थसंकल्पात कृषीसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. पाणीटंचाई, रोजगार हमी, जलसाक्षरता आदींबाबत उपाययोजना असल्याचे आ. संभाजीराव पाटील म्हणाले.
शेतीला २५ हजार कोटी, रोहयोला १ हजार कोटी, शालेय साहित्या वरील करमाफ, श्रीमंतांच्या वस्तू महाग व गरिबांच्या स्वस्त केल्याचे भाजपा नेते शैलेश लाहोटी म्हणाले.

Web Title: Budget to promote agriculture sector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.