शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

‘अर्था’चा झाला अनर्थ; औरंगाबाद महानगरपालिकेला अर्थसंकल्प फुगविण्याची भारी हौस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 18:45 IST

पन्नास टक्केही अंमलबजावणी होत नसताना दरवर्षी फुगविले जाते ‘बजेट’

ठळक मुद्देमागील वर्षी प्रशासनाने १२०० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला होता. महापालिकेच्या तिजोरीत ८०० कोटींपेक्षा अधिक निधी येत नाही. . दरवर्षी अर्थसंकल्प तयार करण्यापूर्वी वस्तुनिष्ठ अर्थसंकल्पावर निव्वळ चर्चा होते. मुळात मनपा प्रशासनाकडूनच फुगीर अर्थसंकल्पाला चालना देण्यात येते.

औरंगाबाद : महापालिका दरवर्षी आपल्या अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पाडत असते. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी तब्बल २०२० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प प्रशासनाने मांडला आहे. स्थायी समिती, सर्वसाधारण सभा यामध्ये आणखी पाचशे कोटी रुपयांची वाढ करणार, हे निश्चित. दरवर्षी मनपाचा अर्थसंकल्प मार्चअखेरीस थेट जमिनीवर येतो हे सर्वश्रुत असतानाही फुगीर अर्थसंकल्प तयार करण्याची हौस पूर्ण होत नाही.

महापालिकेच्या तिजोरीत शासन अनुदान, मालमत्ता कर, पाणीपट्टी, नगररचना आदी विभागांकडून ८०० कोटींपेक्षा अधिक निधी येत नाही. ४०० कोटी पगारावर खर्च होतात. २०० कोटी रुपये विजेचे बिल, पाणीपुरवठा, घनकचरा आदी अत्यावश्यक गरजांवर खर्च करण्यात येतात. विकासकामांसाठी २०० कोटींपेक्षाही कमी निधी शिल्लक राहतो. मागील अनेक वर्षांपासून या आर्थिक परिस्थितीत सुधारणा झालेली नाही आणि भविष्यातही होण्याची शक्यता कमीच आहे. मात्र, औरंगाबादकरांना दरवर्षी आपल्या अर्थसंकल्पात मनपा प्रशासन, पदाधिकारी दिवास्वप्न दाखवितात. दरवर्षी अर्थसंकल्प तयार करण्यापूर्वी वस्तुनिष्ठ अर्थसंकल्पावर निव्वळ चर्चा होते. प्रत्यक्षात कृती अजिबात होत नाही. मुळात मनपा प्रशासनाकडूनच फुगीर अर्थसंकल्पाला चालना देण्यात येते. त्यामुळे पदाधिकारी त्यावर ‘कळस’ चढविण्याचे काम करतात. 

२०१९-२० या आर्थिक वर्षाचे अर्थसंकल्प शुक्रवारी मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी स्थायी समितीला सादर केले. या अर्थसंकल्पात प्रशासनाने पाणीपुरवठा योजना, घनकचरा प्रकल्प, हरित औरंगाबाद, जलसिंचनची कामे, उदयोन्मुख खेडाळूंना वाव देणे, स्मार्ट सिटी, सफारीपार्क, वाहतूक सिग्नल अत्याधुनिक करणे, रस्त्यांची कामे, मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त, अग्निशमन विभाग बळकटीकरण, मनपा शाळांचा दर्जा उंचावणे, आरोग्य सुविधा बळकट करणे, महिलांसाठी विविध कल्याणकारी उपक्रम राबविणे आदी घोषणांचा अक्षरश: पाऊसच पाडण्यात आला आहे. कागदावर हा अर्थसंकल्प अत्यंत गोंडस वाटतो. वर्ष संपत आल्यावर हाच गोंडस अर्थसंकल्प काटेरी झाडाप्रमाणे दिसू लागतो.

१८०० कोटींवरून ८३१ कोटींवर आलेमागील वर्षी प्रशासनाने १२०० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प स्थायी समितीला सादर केला होता. त्यात स्थायी समिती, सर्वसाधारण सभेने मिळून तब्बल ६६४ कोटी रुपयांची वाढ केली होती. दोन दिवसांपूर्वी आयुक्तांनी मागील वर्षीचा सुधारित अर्थसंकल्प सादर केला तेव्हा ८३१ कोटी ४३ लाखांचे अंदाजपत्रक देण्यात आले. प्रशासन, पदाधिकाऱ्यांसाठी ही मोठी नामुष्की आहे.

अर्थसंकल्पातील कामे सोशल मीडियावरमागील वर्षीचेच उदाहरण द्यायचे तर प्रत्येक नगरसेवकाने आपल्या वॉर्डातील पाच ते सहा कोटी रुपयांची कामे अर्थसंकल्पात घुसडली. अर्थसंकल्प पुस्तिकेत आलेल्या कामांची यादी सोशल मीडियावर टाकून नगरसेवकांनी स्वत:ची पाठही थोपटून घेतली. वर्षअखेरीस त्यातील चार कामेही झालेली नाहीत. पुढील वर्षभरातही ही कामे होण्याची कोणतीही चिन्हे नाहीत.

मागील पाच वर्षांची अवस्थावर्ष     अंतिम अर्थसंकल्प    अंतिम अर्थसंकल्प२०१४-१५    ७७० कोटी    ४४७ कोटी२०१५-१६    ९५२ कोटी    ७९५ कोटी२०१६-१७    १०७६ कोटी    ६५० कोटी२०१७-१    १४०० कोटी    ८०० कोटी२०१८-१९    १८६४ कोटी    ८३१ कोटी

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाfundsनिधीBudgetअर्थसंकल्प 2023Aurangabadऔरंगाबाद