शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
4
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
5
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
6
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
7
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
8
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
9
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
10
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
11
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
12
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
13
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
14
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
15
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
16
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
17
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
18
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
19
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
20
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
Daily Top 2Weekly Top 5

बीएसएनलची गाशा गुंडाळण्याची तयारी

By admin | Updated: August 17, 2014 01:42 IST

बापू सोळुंके, औरंगाबाद भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) गुंडाळण्यासाठी दिल्लीवरून जोरदार हालचाली सुरू झाल्या असल्याची धक्कादायक माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळाली आहे.

बापू सोळुंके, औरंगाबादभारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) गुंडाळण्यासाठी दिल्लीवरून जोरदार हालचाली सुरू झाल्या असल्याची धक्कादायक माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळाली आहे. त्याअनुषंगाने २१ आणि २२ आॅगस्ट रोजी देशभरातील प्रत्येक राज्याच्या बीएसएनएल मुख्य महाव्यवस्थापकांची बैठक दिल्ली येथे आयोजित करण्यात आली आहे.वरिष्ठ सूत्रांनी सांगितले की, बीएसएनएलने मोबाईल, इंटरनेट सेवेत पदार्पण केल्यानंतर देशात दूरसंचार क्षेत्रात फार मोठी क्रांती झाली. खाजगी कंपन्या इन्कमिंग कॉलसाठी चार्जेस आकारत होते. त्यांनी सर्व प्रकारच्या सेवाशुल्कात कपात केली. ग्राहक सेवेला प्राधान्य देणारे बीएसएनएल मात्र दोन वर्षांपासून तोट्यात आले आहे. २०१२ साली आणलेल्या नवीन टेलिकॉम धोरणानुसार बीएसएनएलची मालकी आणि मनुष्यबळाची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेण्यात आला.गेल्या काही वर्षांपासून बीएसएनएलला नवीन इन्फ्रास्ट्रक्चर उभारणीसाठी निधी दिला जात नाही. एवढेच नव्हे तर दहा वर्षांत एकाही नवीन अधिकारी, कर्मचाऱ्याची भरती करण्यात आली नाही. उलटपक्षी दरवर्षी दहा हजार कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत, तरीही बीएसएनएलमध्ये २ लाख कर्मचारी अतिरिक्त असल्याचा अहवाल डिओलाईट या खाजगी सल्लागार संस्थेने नुकताच केंद्र शासनास दिला आहे. कर्मचाऱ्यांची कपात केली तरच तोटा कमी करण्यावर उपाय असल्याचे शासनास पटवून देण्यात आले आहे. बीएसएनएलमध्ये जिल्हा आणि तालुकास्तरावर असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे कपात करावी आणि केवळ तेथे सेल्स प्रतिनिधी आणि मेटेनन्स सांभाळणारे दोन- चार कर्मचारी ठेवावे, असा सल्ला खाजगी एजन्सीने दिला आहे. २१, २२ आॅगस्ट रोजी दिल्लीत बैठकया एजन्सीच्या अहवालानुसार कार्यवाही करण्यासाठी बीएसएनएलने देशभरातील प्रत्येक राज्याच्या बीएसएनएल मुख्य महाव्यवस्थापकांची बैठक २१ आणि २२ आॅगस्ट रोजी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कर्मचारी कपातीसंदर्भात निर्णय होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.बीएसएनएल वाचविण्यासाठी विविध कर्मचारी संघटना एकत्र आल्या आहेत. संघटनांनी देशपातळीवर जॉइंट फोरम स्थापन केला आहे. कर्मचारी संघटनांना बाजूला ठेवून केंद्र सरकार बीएसएनएल खाजगी कंपन्यांच्या घशात घालण्याचा घाट घातला आहे. त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी जॉइंट फोरमने १२ आॅगस्ट रोजी संचार सदनासमोर निदर्शने केली. तसेच २१ आॅगस्ट रोजी दिल्लीत होणाऱ्या बैठकीच्या वेळीही निदर्शने करणार आहेत. - रंजन दाणी, अध्यक्ष, बीएसएनएल जॉइंट फोरम