आरटीई प्रवेशातील भ्रष्टाचाराची साखळी तोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:02 IST2021-03-01T04:02:17+5:302021-03-01T04:02:17+5:30
औरंगाबाद : आरटीई प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे. यात होणाऱ्या भ्रष्टाचाराची साखळी तोडा या मागणीसाठी आरटीई पालक संघाने राजनगर, ...

आरटीई प्रवेशातील भ्रष्टाचाराची साखळी तोडा
औरंगाबाद : आरटीई प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे. यात होणाऱ्या भ्रष्टाचाराची साखळी तोडा या मागणीसाठी आरटीई पालक संघाने राजनगर, गारखेडा येथे निदर्शने केली. तसेच भ्रष्टाचाराच्या पुराव्यानिशी तक्रारी केल्या असून, चौकशीअंती दोषी आढळलेल्या शाळांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा. त्या शाळांची मान्यता रद्द करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
आरटीई प्रक्रियेमध्ये लॉटरीत नंबर लागल्यानंतर देखील नामांकित इंग्रजी शाळांकडून १० ते २५ हजार रुपये घेतले जातात. नामांकित शाळेत प्रवेशासाठी बोगस भाडे करारनामे वापरले जातात. मराठी माध्यमाच्या अनुदानित शाळांमध्ये पहिली प्रवेशासाठी १५ ते २५ हजार रुपये घेत आहेत. तसेच दरवर्षी तीन हजार रुपये शुल्क सक्तीने वसूल करण्यात येत आहे. आरटीई प्रवेश प्रक्रियेमध्ये दोन वेळा पालक विद्यार्थी नाव नोंदवत आहेत. ही भ्रष्टाचाराची साखळी तोडा, अशी मागणी आरटीई पालक संघाकडून मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचे प्रशांत साठे यांनी सांगितले. निवेदनावर प्रशांत साठे, जगन्नाथ वराडे, सुनील मगरे, सचिन पोपटघर, गजानन पाटील, आदींच्या सह्या आहेत.