शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

पोरगं अक्षरं गिरविणार अन् निसर्गालाही जीव लावणार! प्रत्येक शाळांमध्ये होणार ‘इको क्लब’

By राम शिनगारे | Updated: July 18, 2024 20:18 IST

पहिल्या दिवसापासून पर्यावरणाचे धडे ‘इको क्लब’अंतर्गत शाळांमध्ये पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पर्यावरणाविषयी धडे द्यायचे आहेत.

छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार भविष्यात चांगले यशस्वी आणि नवोपक्रमशील नागरिक बनविण्यासाठी सर्व शालेय विद्यार्थ्यांमध्ये विशिष्ट कौशल्ये आणि क्षमता विकसित होणे गरजेचे आहे. या कौशल्यामध्ये पाणी आणि नैसर्गिक संसाधने यांचे जतन, स्वच्छता इतरच्या अनुषंगाने पर्यावरण जाणीवजागृती विकसित करणे, ही महत्त्वाची क्षमता आहे. ‘समग्र शिक्षक’अंतर्गत शाळेतील ‘इको क्लब’ ही एक योजना असून, या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी संवेदनशीलता विकसित करणे, सद्य:स्थितीतील पर्यावरणीय समस्या जाणून घेणे, सकारात्मक दृष्टिकोन आणि पर्यावरण संरक्षणाकरिता उपक्रम घेतले जातात. 

पहिल्या दिवसापासून पर्यावरणाचे धडे ‘इको क्लब’अंतर्गत शाळांमध्ये पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पर्यावरणाविषयी धडे द्यायचे आहेत. त्यासाठी एका आठवड्याचे उन्हाळी शिबिरही आयोजित करायचे आहे. त्या शिबिराच्या माध्यमातून आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारणे, शाश्वत अन्नप्रणाली स्वीकारणे, ई-कचरा कमी करणे, कचरा कमी करणे, ऊर्जा व पाणी बचत आणि प्लास्टिकचा वापर टाळणे या सात थीमवर आधारित उपक्रमाचे आयोजन करायचे आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शाळांमध्ये ‘इको क्लब’ देशभरात लागू करण्यात आलेले नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार प्रत्येक शाळांमध्ये इको क्लबची स्थापना करायची आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना पर्यावरणविषयी जनजागृती करून त्याचे संवर्धन कसे होईल, याकडे लक्ष द्यायचे आहे. नैसर्गिक संसाधनांचे जतन करणार नैसर्गिक संसाधनांचे जतन करण्यासाठी विद्यार्थ्यांना पहिलीच्या वर्गापासूनच प्रशिक्षण देण्याची योजना ‘इको क्लब’च्या माध्यमातून विकसित केली जाणार आहे. त्यातून नैसर्गिक संसाधनांचा वापर हा अतिशय काटकसरीने केला पाहिजे, त्याविषयी जनजागृतीही करण्यात येणार आहे. ई-कचराही कमी करणार पर्यावरणाचा ऱ्हास होण्यामध्ये ई-कचऱ्यांचाही मोठ्या प्रमाणात वाटा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ई-कचरा कमी करण्यासाठी शाळांमध्ये ई-कचरा संकलन केंद्र तयार करणे, ई-कचऱ्याचा पर्यावरणावर होणाऱ्या परिणामाविषयी माहिती देणे, या कचऱ्याची विल्हेवाट आणि जतन करून ठेवण्यासाठी अधिकृत संस्थांशी संपर्क साधण्याचेही प्रशिक्षण देण्यात येतील.

पर्यावरण जतन करण्याचा संदेशनवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रत्येक शाळांमध्ये इको क्लबची स्थापना करण्यात आली आहे. या उपक्रमांमध्ये शाळांमधील शिक्षकांसह विद्यार्थीही मोठ्या आनंदाने सहभागी होत आहेत. पर्यावरण संवर्धनासाठी यापूर्वीही अनेक शाळांमध्ये डेन्स फॉरेस्ट ही संकल्पना राबविण्यात आलेली आहे. त्यातून विद्यार्थ्यांना पर्यावरण जतन करण्याचा संदेश दिलेला आहे.-जयश्री चव्हाण, शिक्षणाधिकारी 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEducationशिक्षण