शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

चीनवरील बहिष्कार : औरंगाबादेतील उद्योगांना कच्च्या मालासाठी आहे अन्य देशांचा पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 19:17 IST

औरंगाबादेतील उद्योगांवर फारसा परिणाम होणार नाही 

ठळक मुद्देऔरंगाबादेतील उद्योगांचे आयातीऐवजी निर्यातीचे प्रमाण जास्त आहे. चीनमधून अवघी १० टक्के म्हणजे २०० कोटींची आयात केली जाते.

औरंगाबाद : औरंगाबादेतील केवळ ७० ते ८० कंपन्या चीनमधून कच्चा माल मोठ्या प्रमाणात आयात करतात. मात्र, चीनमधील लॉकडाऊनच्या काळात तेथील संपूर्ण व्यवहार बंद होते. त्या काळात औरंगाबादेतील उद्योगांनी अन्य देशांकडून कच्चा माल आयात केला. त्यामुळे चीनवरील बहिष्कारामुळे येथील उद्योगांवर फारसा परिणाम होणार नाही, असे मत उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. 

अन्य देशांच्या तुलनेत चीनमधून येणारा कच्चा माल किंवा वस्तू नक्कीच स्वस्त आहेत. मात्र, त्यांचे आयुष्यमानही तेवढेच कमी आहे. चीनमधील वस्तूंवर बहिष्कार टाकला, तर औरंगाबादेतील उद्योग व बाजारपेठेवर काही दिवस थोडाफार परिणाम जाणवेल. तसेही औरंगाबादेतील उद्योगांचे आयातीऐवजी निर्यातीचे प्रमाण जास्त आहे. औरंगाबादेतील पाचही औद्योगिक वसाहतींतील कंपन्यांमध्ये जगभरातील विविध देशांतून वर्षाकाठी साधारणपणे दोन हजार कोटींचा कच्चा माल, मशिनरी किंवा संबंधित अन्य वस्तूंची आयात होते. यापैकी चीनमधून अवघी १० टक्के म्हणजे २०० कोटींची आयात केली जाते. चीनमधून प्रामुख्याने प्लास्टिक, अ‍ॅल्युमिनियम, मेडिसिनचा कच्चा माल जास्त प्रमाणात येतो. काही स्पेअर पार्ट येतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चीनमध्ये १२ जानेवारी ते मार्चअखेरपर्यंत ७६ दिवसांचा लॉकडाऊन होता. त्या काळात तेथील संपूर्ण व्यवहार बंद होते. तेव्हा औरंगाबादेतील उद्योगांनी वेगवेगळे पर्यायी मार्गही शोधले. अन्य देशांतून कच्चा माल आयात केला. स्वदेशी कच्चा मालही घेतला. मात्र, त्याची किंमत थोडी महाग पडली. त्यामुळे चीनमधील लॉकडाऊनमुळे येथील उद्योगांना देश आणि अन्य देशांतील कच्च्या मालाचे स्रोत समजले आहेत.

काही काळ टंचाई जाणवेलयासंदर्भात ‘सीआयआय’चे मराठवाडा अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी यांनी सांगितले की, चीनमध्ये तयार होणाऱ्या वस्तूंवर बहिष्कार टाकला, तर आपल्या देशांत काही काळ थोडी टंचाई जाणवेल. जगातील अन्य देशांतून कच्चा माल आयात करून त्या वस्तू भारतात तयार होतील. सुरुवातीला त्याची किंमतही थोडी जास्त वाटेल; पण यातूनच खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर होण्याची संधी आहे. भारतीय ग्राहकांनी हे समजून घेतले पाहिजे.

आॅटोमोबाईल उद्योगाकडूनही निर्यातीवर भर‘मासिआ’चे अध्यक्ष अभय हंचनाळ यांनी सांगितले की, औरंगाबादेतील बजाजसारखे आॅटोमोबाईल उद्योग आणि लहान-मोठ्या आॅटोमोबाईल वस्तू (स्पेअर पार्ट) बनविणाऱ्या उद्योगांची आयात कमी आणि निर्यातीवरच जास्त भर आहे. त्यामुळे चीनवरील बहिष्काराचा आॅटोमोबाईल उद्योगावर फारसा परिणाम होणार नाही. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादbusinessव्यवसायchinaचीन