शहरं
Join us  
Trending Stories
1
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
2
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
3
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
4
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
5
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
6
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
7
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
8
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
9
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
10
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
11
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
12
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
13
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
14
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
15
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
16
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
17
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
18
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
19
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
20
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय

चीनवरील बहिष्कार : औरंगाबादेतील उद्योगांना कच्च्या मालासाठी आहे अन्य देशांचा पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 19:17 IST

औरंगाबादेतील उद्योगांवर फारसा परिणाम होणार नाही 

ठळक मुद्देऔरंगाबादेतील उद्योगांचे आयातीऐवजी निर्यातीचे प्रमाण जास्त आहे. चीनमधून अवघी १० टक्के म्हणजे २०० कोटींची आयात केली जाते.

औरंगाबाद : औरंगाबादेतील केवळ ७० ते ८० कंपन्या चीनमधून कच्चा माल मोठ्या प्रमाणात आयात करतात. मात्र, चीनमधील लॉकडाऊनच्या काळात तेथील संपूर्ण व्यवहार बंद होते. त्या काळात औरंगाबादेतील उद्योगांनी अन्य देशांकडून कच्चा माल आयात केला. त्यामुळे चीनवरील बहिष्कारामुळे येथील उद्योगांवर फारसा परिणाम होणार नाही, असे मत उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. 

अन्य देशांच्या तुलनेत चीनमधून येणारा कच्चा माल किंवा वस्तू नक्कीच स्वस्त आहेत. मात्र, त्यांचे आयुष्यमानही तेवढेच कमी आहे. चीनमधील वस्तूंवर बहिष्कार टाकला, तर औरंगाबादेतील उद्योग व बाजारपेठेवर काही दिवस थोडाफार परिणाम जाणवेल. तसेही औरंगाबादेतील उद्योगांचे आयातीऐवजी निर्यातीचे प्रमाण जास्त आहे. औरंगाबादेतील पाचही औद्योगिक वसाहतींतील कंपन्यांमध्ये जगभरातील विविध देशांतून वर्षाकाठी साधारणपणे दोन हजार कोटींचा कच्चा माल, मशिनरी किंवा संबंधित अन्य वस्तूंची आयात होते. यापैकी चीनमधून अवघी १० टक्के म्हणजे २०० कोटींची आयात केली जाते. चीनमधून प्रामुख्याने प्लास्टिक, अ‍ॅल्युमिनियम, मेडिसिनचा कच्चा माल जास्त प्रमाणात येतो. काही स्पेअर पार्ट येतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चीनमध्ये १२ जानेवारी ते मार्चअखेरपर्यंत ७६ दिवसांचा लॉकडाऊन होता. त्या काळात तेथील संपूर्ण व्यवहार बंद होते. तेव्हा औरंगाबादेतील उद्योगांनी वेगवेगळे पर्यायी मार्गही शोधले. अन्य देशांतून कच्चा माल आयात केला. स्वदेशी कच्चा मालही घेतला. मात्र, त्याची किंमत थोडी महाग पडली. त्यामुळे चीनमधील लॉकडाऊनमुळे येथील उद्योगांना देश आणि अन्य देशांतील कच्च्या मालाचे स्रोत समजले आहेत.

काही काळ टंचाई जाणवेलयासंदर्भात ‘सीआयआय’चे मराठवाडा अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी यांनी सांगितले की, चीनमध्ये तयार होणाऱ्या वस्तूंवर बहिष्कार टाकला, तर आपल्या देशांत काही काळ थोडी टंचाई जाणवेल. जगातील अन्य देशांतून कच्चा माल आयात करून त्या वस्तू भारतात तयार होतील. सुरुवातीला त्याची किंमतही थोडी जास्त वाटेल; पण यातूनच खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर होण्याची संधी आहे. भारतीय ग्राहकांनी हे समजून घेतले पाहिजे.

आॅटोमोबाईल उद्योगाकडूनही निर्यातीवर भर‘मासिआ’चे अध्यक्ष अभय हंचनाळ यांनी सांगितले की, औरंगाबादेतील बजाजसारखे आॅटोमोबाईल उद्योग आणि लहान-मोठ्या आॅटोमोबाईल वस्तू (स्पेअर पार्ट) बनविणाऱ्या उद्योगांची आयात कमी आणि निर्यातीवरच जास्त भर आहे. त्यामुळे चीनवरील बहिष्काराचा आॅटोमोबाईल उद्योगावर फारसा परिणाम होणार नाही. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादbusinessव्यवसायchinaचीन