शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

चीनवरील बहिष्कार : औरंगाबादेतील उद्योगांना कच्च्या मालासाठी आहे अन्य देशांचा पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 19:17 IST

औरंगाबादेतील उद्योगांवर फारसा परिणाम होणार नाही 

ठळक मुद्देऔरंगाबादेतील उद्योगांचे आयातीऐवजी निर्यातीचे प्रमाण जास्त आहे. चीनमधून अवघी १० टक्के म्हणजे २०० कोटींची आयात केली जाते.

औरंगाबाद : औरंगाबादेतील केवळ ७० ते ८० कंपन्या चीनमधून कच्चा माल मोठ्या प्रमाणात आयात करतात. मात्र, चीनमधील लॉकडाऊनच्या काळात तेथील संपूर्ण व्यवहार बंद होते. त्या काळात औरंगाबादेतील उद्योगांनी अन्य देशांकडून कच्चा माल आयात केला. त्यामुळे चीनवरील बहिष्कारामुळे येथील उद्योगांवर फारसा परिणाम होणार नाही, असे मत उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. 

अन्य देशांच्या तुलनेत चीनमधून येणारा कच्चा माल किंवा वस्तू नक्कीच स्वस्त आहेत. मात्र, त्यांचे आयुष्यमानही तेवढेच कमी आहे. चीनमधील वस्तूंवर बहिष्कार टाकला, तर औरंगाबादेतील उद्योग व बाजारपेठेवर काही दिवस थोडाफार परिणाम जाणवेल. तसेही औरंगाबादेतील उद्योगांचे आयातीऐवजी निर्यातीचे प्रमाण जास्त आहे. औरंगाबादेतील पाचही औद्योगिक वसाहतींतील कंपन्यांमध्ये जगभरातील विविध देशांतून वर्षाकाठी साधारणपणे दोन हजार कोटींचा कच्चा माल, मशिनरी किंवा संबंधित अन्य वस्तूंची आयात होते. यापैकी चीनमधून अवघी १० टक्के म्हणजे २०० कोटींची आयात केली जाते. चीनमधून प्रामुख्याने प्लास्टिक, अ‍ॅल्युमिनियम, मेडिसिनचा कच्चा माल जास्त प्रमाणात येतो. काही स्पेअर पार्ट येतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चीनमध्ये १२ जानेवारी ते मार्चअखेरपर्यंत ७६ दिवसांचा लॉकडाऊन होता. त्या काळात तेथील संपूर्ण व्यवहार बंद होते. तेव्हा औरंगाबादेतील उद्योगांनी वेगवेगळे पर्यायी मार्गही शोधले. अन्य देशांतून कच्चा माल आयात केला. स्वदेशी कच्चा मालही घेतला. मात्र, त्याची किंमत थोडी महाग पडली. त्यामुळे चीनमधील लॉकडाऊनमुळे येथील उद्योगांना देश आणि अन्य देशांतील कच्च्या मालाचे स्रोत समजले आहेत.

काही काळ टंचाई जाणवेलयासंदर्भात ‘सीआयआय’चे मराठवाडा अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी यांनी सांगितले की, चीनमध्ये तयार होणाऱ्या वस्तूंवर बहिष्कार टाकला, तर आपल्या देशांत काही काळ थोडी टंचाई जाणवेल. जगातील अन्य देशांतून कच्चा माल आयात करून त्या वस्तू भारतात तयार होतील. सुरुवातीला त्याची किंमतही थोडी जास्त वाटेल; पण यातूनच खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर होण्याची संधी आहे. भारतीय ग्राहकांनी हे समजून घेतले पाहिजे.

आॅटोमोबाईल उद्योगाकडूनही निर्यातीवर भर‘मासिआ’चे अध्यक्ष अभय हंचनाळ यांनी सांगितले की, औरंगाबादेतील बजाजसारखे आॅटोमोबाईल उद्योग आणि लहान-मोठ्या आॅटोमोबाईल वस्तू (स्पेअर पार्ट) बनविणाऱ्या उद्योगांची आयात कमी आणि निर्यातीवरच जास्त भर आहे. त्यामुळे चीनवरील बहिष्काराचा आॅटोमोबाईल उद्योगावर फारसा परिणाम होणार नाही. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादbusinessव्यवसायchinaचीन