शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

दोघेही विवाहित मात्र प्रेम जुळले; एकत्र येता येत नसल्याने पती-पत्नी, मुलांना सोडून संपवले जीवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2021 18:36 IST

Married Couple Commit Suicide : सीमा कांबळे आणि सचिन हे जवळच्याच वसाहतीत राहत असल्याने एकमेकांना ओळखत होते.

ठळक मुद्दे पती-पत्नी, मुलांना सोडून प्रेमीयुगूलाने घेतला गळफासएकाच साडीने दोघांनी कवटाळले मृत्यूला

औरंगाबाद: दोघेही अन्यत्र विवाहित असतांना त्यांचे प्रेम जुळून आले. या विवाहबाह्य संंबंधांतून त्या प्रेमीयुगुलाने एकाच साडीने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपविली. ही सनसनाटी घटना हर्सूल परिसरातील एकतानगरात मंगळवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास समोर आली. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. यातील प्रेयसीच्या मागे तीन मुले व पतीसह अन्य कुटुंबिय आहेत. तर प्रियकराच्या मागे पत्नी व अन्य कुटुंब आहे. ( lover man n women commit suicide leaving their children, Husband and wife behind) 

याप्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सीमा ईश्वर कांबळे (३५, रा.एकतानगर, हर्सूल) आणि सचिन गंगाधर पेटारे (२७, रा.एन १३, वानखेडेनगर, हर्सूल ) अशी आत्महत्या करणाऱ्यांची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले की, सीमा कांबळे आणि सचिन हे जवळच्याच वसाहतीत राहत असल्याने एकमेकांना ओळखत होते. सचिनचे दोन वर्षापूर्वी लग्न झाले होते. तर सीमाला १२ व ६ वर्षाच्या मुली आणि ९ वर्षाचा मुलगा अशी ३ अपत्य आहेत. तीचा पती खाजगी नोकरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतो. सीमा आणि सचिन यांचे गेल्या काही वर्षापासून मित्रत्वाचे संबंध होते. लग्न झाल्यानंतरही त्याचे सीमाच्या घरी येणेजाणे होते. मंगळवारी सकाळी सीमाचा पती कामावर गेला होता. तर सचिनही जेवणाचा डबा घेऊन कामावर जातो, असे घरी सांगून निघाला. 

काम न मिळाल्याने तो सीमाच्या घरी गेला. तेव्हा सीमाची तिन्हे मुले घरी होती. सचिन तेथे गेल्यावर दोन्ही मुली आणि मुलगा खेळण्यासाठी घराबाहेर गेले. सीमा आणि सचिन यांनी अचानक खोलीचे दार आतून बंद करून घेत छताच्या हुकाला साडी बांधली. साडीच्या एका पदराने सीमा तर दुसऱ्या पदराने सचिनने गळफास घेऊन आत्महत्या केली. ११.३० वाजेच्या सुमारास सीमाचा मुलगा आणि मुली घरी परतल्या तेव्हा त्यांना घराचे दार आतून बंद दिसले. आवाज देऊन आणि दार ठोठावूनही आई दार उघडत नसल्याने त्यांनी रडतच घरमालक आणि शेजाऱ्यांना ही बाब सांगितली. घरमालकाने दार ठोठावून पाहिले मात्र आतून प्रतिसाद मिळाला नाही. दाराच्या फटीतून आत पाहिले असता सीमा आणि सचीन लटकलेले दिसले. त्यांनी सीमाच्या पतीला आणि हर्सूल पोलिसांना फोन करून तेथे बोलावून घेतले. पोलीस उपनिरीक्षक अतुलकुमार ठोकळ, उपनिरीक्षक गिरी, हवालदार पालवे, काटकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. दार तोडले असता सीमा आणि सचिन यांनी एकाच साडीला गळफास घेतलेला दिसला. त्यांना घाटीत दाखल करण्यात आले. अपघात विभागातील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

सीमाच्या मुलांनी फोडला हंबरडासीमा आणि सचिन यांनी गळफास घेतल्याचे घरमालकाने पाहिल्यानंतर त्यांनी आणि शेजाऱ्यांनी तिच्या मुलांना तेथून दुसरीकडे नेले. मात्र काहीतरी अघटीत घडल्याचे मुलांच्या लक्षात आले व त्यांनी हंबरडा फोडला. काही वेळाने वडिल व नातेवाईकांसोबत घाटीत आलेल्या एका मुलाने वडिलांना बिलगून हंबरडा फोडला. यामुळे वातावरण गंभीर बनले होते.

टॅग्स :Deathमृत्यूAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी