शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
2
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
3
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
4
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
5
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
6
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
7
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
8
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
9
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
10
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
11
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
12
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
13
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
15
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
16
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
17
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
18
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
19
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
20
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
Daily Top 2Weekly Top 5

दोघेही विवाहित मात्र प्रेम जुळले; एकत्र येता येत नसल्याने पती-पत्नी, मुलांना सोडून संपवले जीवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2021 18:36 IST

Married Couple Commit Suicide : सीमा कांबळे आणि सचिन हे जवळच्याच वसाहतीत राहत असल्याने एकमेकांना ओळखत होते.

ठळक मुद्दे पती-पत्नी, मुलांना सोडून प्रेमीयुगूलाने घेतला गळफासएकाच साडीने दोघांनी कवटाळले मृत्यूला

औरंगाबाद: दोघेही अन्यत्र विवाहित असतांना त्यांचे प्रेम जुळून आले. या विवाहबाह्य संंबंधांतून त्या प्रेमीयुगुलाने एकाच साडीने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपविली. ही सनसनाटी घटना हर्सूल परिसरातील एकतानगरात मंगळवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास समोर आली. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. यातील प्रेयसीच्या मागे तीन मुले व पतीसह अन्य कुटुंबिय आहेत. तर प्रियकराच्या मागे पत्नी व अन्य कुटुंब आहे. ( lover man n women commit suicide leaving their children, Husband and wife behind) 

याप्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सीमा ईश्वर कांबळे (३५, रा.एकतानगर, हर्सूल) आणि सचिन गंगाधर पेटारे (२७, रा.एन १३, वानखेडेनगर, हर्सूल ) अशी आत्महत्या करणाऱ्यांची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले की, सीमा कांबळे आणि सचिन हे जवळच्याच वसाहतीत राहत असल्याने एकमेकांना ओळखत होते. सचिनचे दोन वर्षापूर्वी लग्न झाले होते. तर सीमाला १२ व ६ वर्षाच्या मुली आणि ९ वर्षाचा मुलगा अशी ३ अपत्य आहेत. तीचा पती खाजगी नोकरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतो. सीमा आणि सचिन यांचे गेल्या काही वर्षापासून मित्रत्वाचे संबंध होते. लग्न झाल्यानंतरही त्याचे सीमाच्या घरी येणेजाणे होते. मंगळवारी सकाळी सीमाचा पती कामावर गेला होता. तर सचिनही जेवणाचा डबा घेऊन कामावर जातो, असे घरी सांगून निघाला. 

काम न मिळाल्याने तो सीमाच्या घरी गेला. तेव्हा सीमाची तिन्हे मुले घरी होती. सचिन तेथे गेल्यावर दोन्ही मुली आणि मुलगा खेळण्यासाठी घराबाहेर गेले. सीमा आणि सचिन यांनी अचानक खोलीचे दार आतून बंद करून घेत छताच्या हुकाला साडी बांधली. साडीच्या एका पदराने सीमा तर दुसऱ्या पदराने सचिनने गळफास घेऊन आत्महत्या केली. ११.३० वाजेच्या सुमारास सीमाचा मुलगा आणि मुली घरी परतल्या तेव्हा त्यांना घराचे दार आतून बंद दिसले. आवाज देऊन आणि दार ठोठावूनही आई दार उघडत नसल्याने त्यांनी रडतच घरमालक आणि शेजाऱ्यांना ही बाब सांगितली. घरमालकाने दार ठोठावून पाहिले मात्र आतून प्रतिसाद मिळाला नाही. दाराच्या फटीतून आत पाहिले असता सीमा आणि सचीन लटकलेले दिसले. त्यांनी सीमाच्या पतीला आणि हर्सूल पोलिसांना फोन करून तेथे बोलावून घेतले. पोलीस उपनिरीक्षक अतुलकुमार ठोकळ, उपनिरीक्षक गिरी, हवालदार पालवे, काटकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. दार तोडले असता सीमा आणि सचिन यांनी एकाच साडीला गळफास घेतलेला दिसला. त्यांना घाटीत दाखल करण्यात आले. अपघात विभागातील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

सीमाच्या मुलांनी फोडला हंबरडासीमा आणि सचिन यांनी गळफास घेतल्याचे घरमालकाने पाहिल्यानंतर त्यांनी आणि शेजाऱ्यांनी तिच्या मुलांना तेथून दुसरीकडे नेले. मात्र काहीतरी अघटीत घडल्याचे मुलांच्या लक्षात आले व त्यांनी हंबरडा फोडला. काही वेळाने वडिल व नातेवाईकांसोबत घाटीत आलेल्या एका मुलाने वडिलांना बिलगून हंबरडा फोडला. यामुळे वातावरण गंभीर बनले होते.

टॅग्स :Deathमृत्यूAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी