शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांचे मराठी सुधारण्यासाठी झटणारा पुस्तक विक्रेता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 12:01 IST

उर्दू माध्यमातील मुलांनाही उत्तम मराठी यावे यासाठी विशेष उपक्रमांची आखणी

ठळक मुद्देमिर्झा अब्दुल कय्युम नदवी यांनी आखला ३ वर्षाचा कृती आराखडा उर्दू माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी भाषेच्या विकासाचे प्रयत्न

औरंगाबाद : महाराष्ट्रात राहतो म्हटल्यावर इथल्या प्रत्येकाला मराठी बोलता, लिहिता, वाचता येणे गरजेचेच आहे. महाराष्ट्रात सर्व व्यवहार मराठीतून चालतात, शासन निर्णय मराठीत असतात, तसेच काही शासकीय नोकरीच्या बाबतीत मराठी उमेदवारांना मराठी येणे अनिवार्य असते. नोकऱ्या आणि व्यवहारज्ञान यामध्ये ती मागे पडतात. मात्र उर्दू माध्यमातील मुलांनाही उत्तम मराठी यावे यासाठी औरंगाबादमधील पुस्तक विक्रेते मिर्झा अब्दुल कय्युम नदवी यांनी काही वर्षांपासून प्रयत्न चालविले आहेत. 

ग्रामीण भागातील अमराठी मुले उत्तम मराठी बोलतात; पण शहरी भागात मात्र मुस्लिम विद्यार्थी उर्दू माध्यमात शिक्षण घेतात. येथे मुलांना आठवड्यातून केवळ दोन-तीन तास मराठी शिकविली जाते. त्यांचे शिक्षक, पालक, आसपासचे विद्यार्थी हिंदी किंवा उर्दू बोलणारे असतात. त्यामुळे मग या शहरी मुस्लिम मुलांना मराठी शिकविण्यासाठी विशेष मेहनत घ्यावी लागते. यासाठीच अब्दुल नकवी वर्षभर विविध उपक्रम राबवून मुलांमध्ये मराठी विषयाची गोडी लावण्याचा प्रयत्न मिर्झा करत आहेत. उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांकडून मराठीतून पत्रे लिहून घेणे, दर्जेदार मराठी बालसाहित्य या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे, मराठीतील अनेक पुस्तके विविध उर्दू शाळांमधून वाटप करणे आदी उपक्रम नदवी राबवीत आहेत. 

रिड अ‍ॅण्ड लीड फाऊंडेशनतर्फे अब्दुल नदवी यांनी १२ जून रोजी प्राईम स्टार इंग्लिश हायस्कूल येथे उर्दू माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी भाषेचे संवर्धन आणि विकास कसा करता येईल, याबाबत विशेष बैठक घेतली. यादरम्यान पुढील बाबी ठरविण्यात आल्या.-- मुलांची मराठी भाषेतील गुणवत्ता वाढावी म्हणून ३ वर्षांचा कृती आराखडा तयार करणे. - प्रत्येक उर्दू शाळेत मराठी दिवस व मराठी पंधरवडा साजरा करणे.- अल्पसंख्याक आयोगातर्फे मराठी फाऊंडेशन योजनेअंतर्गत इयत्ता ५ वीपासून पुढे प्रत्येक ४० विद्यार्थ्यांमागे एक मराठी शिक्षक नेमणे.- मराठी फाऊंडेशन अंतर्गत मराठी भाषेचा अभ्यासक्रम तयार करणे.- उर्दू माध्यमाच्या शाळांमधील मराठी शिक्षकांसाठी किमान ६ महिन्यांमध्ये एक कार्यशाळा आयोजित करणे.- मराठी भाषा संवर्धन व विकासाची दिशा ठरविण्यासाठी दि. ६ जुलै रोजी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन.

कायदा करावा लागणे शरमेचेआपल्याच राज्यात मराठी सक्तीची करण्याविषयी कायदा करावा लागणे आणि त्यासाठी एवढा लढा द्यावा लागणे ही शरमेची बाब आहे. आज अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांची अशी परिस्थिती आहे की तेथील विद्यार्थ्यांना ना धड मराठी येते, ना हिंदी, ना इंग्रजी. मराठी भाषा कायदा तर झालाच पाहिजे; पण सोबतच मराठीला तंत्रज्ञानाशी जोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज जे अभ्यासक्रम फक्त इंग्रजीतून उपलब्ध आहेत ते मराठीत निर्माण केले पाहिजेत, जेणेकरून लोक मातृभाषेतच शिक्षण घेण्यास प्राधान्य देतील.

मिर्झा नदवी राबवीत असलेले उपक्रमविद्यार्थ्यांना मराठी भाषेची गोडी लागावी म्हणून मिर्झा नदवींमार्फत राबविण्यात येणारे उपक्रम :१. दिवाळीच्या आणि उन्हाळी सुटीत उर्दू भाषिकांसाठी खास ‘चला बोलूया मराठीत’ हा उपक्रम ते स्वत:च्या घरीच राबवितात. यामध्ये विद्यार्थ्यांना मराठी व्याकरणाविषयी माहिती देतात.२. महापुरुषांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना महापुरुषांविषयीचे मराठी पुस्तक वाचायला देणे.३. वाचन प्रेरणा दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मराठी पुस्तकांचे वाटप४. काही महिन्यांपूर्वी त्यांनी मराठी पत्रलेखन स्पर्धा घेतली होती. यामध्ये उर्दू माध्यमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री, विभागीय आयुक्त आणि महापौरांना शुद्ध मराठीत २५ हजार पत्रे लिहिली. 

टॅग्स :marathiमराठीSchoolशाळाStudentविद्यार्थी