शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

बोगस पदवी प्रकरण: महाविद्यालयाच्या झाडाझडतीनंतर तपास ‘एसीपीं’कडून ‘पीआय’कडे वर्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 15:12 IST

अनेकांच्या पदव्या पाेलिसांच्या हाती लागल्यानंतर काही वेळातच प्रकरणाचा तपास अधिकारीच बदलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये बाेगस एम. फिल पदव्यांच्या आधारे पीएचडीला प्रवेश प्रकरणात सहायक पोलिस आयुक्तांच्या पथकाने खुलताबाद येथील कोहिनूर महाविद्यालयात जाऊन झाडाझडती घेतली. त्याठिकाणी अनेकांच्या पदव्या पाेलिसांच्या हाती लागल्यानंतर काही वेळातच प्रकरणाचा तपास अधिकारीच बदलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे सहायक पोलिस आयुक्तांकडून तपास काढून घेत गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षकांकडे तपास देण्यात आल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

विद्यापीठ प्रशासनाने बाेगस एम. फिल पदवीच्या आधारे प्रवेश घेत फसवणूक केल्यामुळे कोहिनूर शिक्षण संस्थेच्या सचिव, सहसचिवांच्या विरोधात बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला होता. या गुन्ह्याचा सुरुवातीला तपास सहायक पोलिस निरीक्षक शेषराव खटाणे यांच्याकडे देण्यात आला होता. या प्रकरणात रॅकेटची शक्यता असल्यामुळे सहायक पोलिस आयुक्त संपत शिंदे यांच्याकडे तपास सोपविण्यात आला. त्यात एसीपी शिंदे यांच्या पथकाने सुरुवातीच्या दोन आरोपींसह इतर तिघांचा गुन्ह्यातील सहभाग निश्चित करीत आरोपी बनवीत अटक केली आहे. अटक आरोपींमधील तीन जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे, तर एक जण न्यायालयीन कोठडीत आहे. या गुन्ह्यात आतापर्यंत पाेलिसांनी अनेकांचे जबाब नोंदविले आहेत. त्याशिवाय १२ ते १४ जण बोगस पदव्यांच्या आधारे नोकरी करीत असल्याचीही माहिती समोर आली होती. या प्रकरणात तपास अधिकाऱ्यांच्या पथकाने खुलताबादच्या कोहिनूर महाविद्यालयात कागदपत्रांची तपासणी केली. त्यात अनेकांच्या पदव्या हाती लागल्या आहेत. या पदव्या जप्त केल्यानंतर काही वेळातच प्रकरणाचे तपास अधिकारी बदलण्यात आले आहेत. सहायक पोलिस आयुक्तांकडून तपास काढून घेत गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षकांकडे तपास देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

राजकीय दबावाची चर्चानागपूर येथील शिक्षक भरतीचे प्रकरण गाजत असतानाच बोगस पदव्यांच्या आधारे नोकरी देणारे रॅकेट उघडकीस येत असतानाच राजकीय दबावापोटी तपास अधिकारी बदलण्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे. सुरुवातीला प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्यामुळे एपीआयकडून तपास काढून घेत एसीपींकडे सोपवला हाेता. आता एसीपींकडून तपास काढून घेत कनिष्ठ अधिकारी असलेल्या पीआयकडे देण्यात आल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर