बोगस डॉक्टरांनी गाशा गुंडाळला !
By Admin | Updated: May 30, 2014 00:25 IST2014-05-29T23:40:38+5:302014-05-30T00:25:07+5:30
लातूर : लातूर जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला होता. जिल्ह्यात १४८ डॉक्टर आरोग्य विभागाच्या लिस्टवर होते.

बोगस डॉक्टरांनी गाशा गुंडाळला !
लातूर : लातूर जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला होता. जिल्ह्यात १४८ डॉक्टर आरोग्य विभागाच्या लिस्टवर होते. त्यांच्यावर पाळत ठेवून आरोग्य विभागाच्या पथकाने कारवाई कडक केल्याने अनेक बोगस डॉक्टरांनी आपला गाशा जिल्ह्यातून गुंडाळला आहे. गेल्या तीन वर्षांत अशा ५२ डॉक्टरांवर गुन्हा दाखल केल्याने त्यांनी जिल्ह्यातून पलायन केले आहे. त्यात बंगाली डॉक्टरांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. वैद्यकीय शिक्षणाची पदवी नसणे, ज्यांना अॅलोपॅथीचे प्रॅक्टीस करण्याची परवानगी नाही, त्यांनी ही प्रॅक्टीस करणे, असे १४८ डॉक्टर जिल्ह्यात वैद्यकीय व्यवसाय करत असल्याचे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे आरोग्य विभागाच्या पथकाने अशा डॉक्टरांवर पाळत ठेवून करवाई करण्याची मोहीम जिल्ह्यात राबविली होती. गेल्या तीन वर्षांत अशा ५२ डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्यावर विविध पोलिस ठाण्यात फसवणूकीचे गुन्हे दाखल करण्यात आले असून, एमबीबीएस, बीएएमएस, डीएम अॅन्ड एस, बीयुएमएस या पदवीधारकांनाच आॅलोपॅथीची प्रॅक्टीस करण्याची परवानगी आहे. अन्य पदवीधारकांना त्यांच्या पॅथीची प्रॅक्टीस करण्याची परवानगी आहे. त्यांना अॅलोपॅथीची प्रॅक्टीस करण्याचा परवाना नाही. पण अनेक बीएचएमएस, डीएचएमएस, नॅचरोपॅथीचे पदवीधारक आॅलोपॅथीची प्रॅक्टीस करतात. वास्तविक पाहता, या पदवीधारकांना अॅलोपॅथीची प्रॅक्टीस करण्याचा अधिकार नाही, पण बरेच डॉक्टर आपली पॅथी सोडून प्रॅक्टीस करत असल्याचे उघडकीस आले आहे. या डॉक्टरांवर कारवाची कुºहाड आरोग्य विभागाने उचलली आहे. त्यानुसार गेल्या तीन वर्षांत अशा ५२ डॉक्टरांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बीएचएमएस, डीएचएमएस पदवीधारकांना १२ क्षारानुसार वैद्यकीय व्यवसाय करण्याचा अधिकार आहे. तर नॅचरोपॅथीच्या विद्यार्थ्यांना नॅचरोपॅथीनुसार वैद्यकीय व्यवसात करण्याचा अधिकार आहे. पण या पॅथीचे पदवीधारक आपली पॅथी सोडून अन्य पॅथीचा व्यवसाय करत असल्याचे उघडकीस आल्याने या कारवाया करण्यात आल्या आहेत. बुधवारीच लातूर शहरातील बाभळगाव रोड येथे एका बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली आहे. (प्रतिनिधी) १४८ संशयित बोगस डॉक्टर जिल्ह्यात होते. या डॉक्टरांच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे तक्रारी प्राप्त झाल्या. त्यानुसार त्यांची गावनिहाय यादी करून गुन्हे दाखल करण्याची मोहीम राबविली. ५२ जणांवर एफआयआर दर्ज करण्यात आला. त्यामुळे बोगस डॉक्टरांचे प्रमाण कमी झाले असल्याचे डॉ. सुधीर बनशेळकीकर म्हणाले. बीएचएमएस पदवीधर शासनाच्या विचाराधीन एमबीबीएस, बीएएमएस, डीएम अॅन्ड एस, बीयुएमएस या चार विद्याशाखेच्या पदवीधारकांनाच अॅलोपॅथीच्या उपचार पध्दतीने वैद्यकीय व्यवसाय करण्याची परवानगी आहे. बीएचएमएसच्या पदवीधारकांनाही अॅलोपॅथीने वैद्यकीय व्यवसाय करण्याची परवानगी देण्याचा विचार शासन करीत आहे. त्यांना परवानगी दिल्यानंतर जिल्ह्यात एकही डॉक्टर बोगस राहणार नाही. परंतू शासनाच्या विचाराधीन हा प्रस्ताव आहे. जिल्ह्यात १४८ बोगस संशयीत डॉक्टर आहेत. त्यापैकी ५२ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तर काहींनी हा व्यवसाय बंद केला आहे. बंगाली अनाधिकृत डॉक्टरांनी तर या जिल्ह्यातून पलायनच केले आहे. येथे झाली कारवाई... बोगस डॉक्टरांवर शिराळा,एकुर्गा, गाधवड, मुरूड, शिवणखेड, जवळा बु., तळेगाव बोरी, हिप्पळगाव, हाडोळती, मरसांगवी, वांजरवडा,जगळपूर, अतनूर, जवळगा, तांदूळजा,वाजंरखेडा, गाधवड, काटगाव, बोरगाव काळे, हरंगूळ, भातखेडा, तावशी तांडा, शिवली, करजगाव, मातोळा, टाका, तपसेचिंचोली, देवर्जन, हंडरगूळी, गुडसूर, आंजनसोंडा, नागझरी, बेलकुंड, कारला, ळजनी, महादेवनगर, किनगाव, कामखेडा, बाभळगाव आदी गावांत बोगस डॉक्टरांचा वैद्यकीय व्यवसाय तेजीत होता. येथील या डॉक्टरांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याने त्यांनी जिल्ह्यातून पळ काढला आहे. खाजगी वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी एमबीबीएस, बीएएमएस, डीएम अॅण्ड एस, बीयुएमएस या पदवीधारकांनाच अॅलोपॅथीची प्रॅक्टीस करता येते. अन्य पॅथींच्या पदवीधारकांना सध्या तरी अॅलोपॅथीची प्रॅक्टीस करण्यास परवानगी नाही. बीएचएमएसच्या पदवीधारकांना प्रॅक्टीस करू देण्यास शासन विचार करीत आहे. अशा आहेत बोगस डॉक्टरांच्या पदव्या... गुन्हे दाखल झालेल्या काही डॉक्टरांकडे पदव्याही नाहीत. तर काहींकडे अप्रमाणीत कागदपत्रे आहेत. तर काहींकडे बीईएमएस, डीएनएम, आरएमपी, डीएचएमएस, डीआयएमएस, डीएचबी, डीआयएबी, बीआयएएम, आरएमडी, डीएनएम, बीएसआरएम, एमबीईएच, एफसीआयएम, बीस्सी.डीएनवायएस आदी पदव्या आहेत. या पदव्यांवर त्यांना वैद्यकीय व्यवसाय करता येत नाही. पण त्यांचा व्यवसाय जोमात होता. आरोगञय विभागाने कारवाईची कुºहाड उगारल्याने आता व्यवसायिकांनी काढता पाय घेतला आहे.