शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ज्या मतदारसंघाने संकटकाळात आसरा दिला, राहुल गांधी तीच सीट सोडणार; प्रियंका गांधी वायनाड लढणार
2
T20 World Cup 2026 साठी १२ संघ ठरले पात्र, पाकिस्तानलाही मिळाली संधी; पण, कशी?
3
मोहन भागवतांच्या मणिपूरवरील वक्तव्यानंतर अमित शाह अॅक्टिव्ह, बोलावली उच्चस्तरीय बैठक...
4
Prithviraj Chavan : सांगलीच्या निकालातून धडा घेतला पाहिजे; पृथ्वीराज चव्हाणांचा उद्धव ठाकरेंना सल्ला
5
६ चौकार, १८ षटकार! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २७ चेंडूंत ठोकले शतक, मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड
6
एसयुव्हींमधला डार्क हॉर्स! MG Gloster Black Storm सोबत ४०२ किमी सवारी; खऱ्या खुऱ्या SUVचे मायलेज किती असेल...
7
'स्वतःच्या प्रमोशनसाठी रेल्वेचा वापर', मल्लिकार्जुन खरगेंचा मोदी सरकारवर आरोप
8
मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी
9
गौतम गंभीरचा 'माणूस' टीम इंडियाचा फिल्डींग कोच होणार, रवी शास्त्रींनी या नावावर मारलेली फुली
10
Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...
11
सर्वात महाग शहर! १ BHK चं भाडं ४ लाख, हेअरकट ५०००; घरकाम करणाऱ्याला ५० हजार पगार
12
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
13
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
14
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
15
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
16
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
17
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह
18
"लोक मदतीसाठी ओरडत होते, हा एक भयंकर क्षण..."; प्रवाशाने सांगितलं नेमकं काय घडलं?
19
याला संघ म्हणावे तरी कसे? पाकिस्तान संघाबाबत कोच गॅरी कर्स्टन यांचे धक्कादायक विधान
20
भारताच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या मार्गात 'मोठा' अडथळा; कॅरेबियन बेटांवर महत्त्वाची घडामोड

बोर्डात लाखभर उत्तरपत्रिका पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2018 1:20 AM

बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार घालून कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने शिक्षण विभागाला वेठीस धरले होते. आज अखेर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिलेल्या आश्वासनावर संघटनेच्या प्रमुख नेत्यांचे समाधान झाल्यामुळे उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्कार मागे घेतला असून, उद्यापासून पेपर तपासणीला सुरुवात करणार असल्याचे ‘जुक्टा’च्या पदाधिका-यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार घालून कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने शिक्षण विभागाला वेठीस धरले होते. आज अखेर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिलेल्या आश्वासनावर संघटनेच्या प्रमुख नेत्यांचे समाधान झाल्यामुळे उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्कार मागे घेतला असून, उद्यापासून पेपर तपासणीला सुरुवात करणार असल्याचे ‘जुक्टा’च्या पदाधिका-यांनी सांगितले.यापूर्वी ३ फेब्रुवारी रोजी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या पदाधिका-यांसोबत शिक्षणमंत्र्यांनी चर्चा केली व अनेक मागण्या निकाली काढण्यासंबंधीचे लेखी आश्वासनही दिले होते. परंतु दिलेल्या आश्वासनासंबंधी १५ दिवसांत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला नाही. त्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने (जुक्टा) बारावीच्या पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला होता.२१ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या परीक्षेच्या जवळपास १ लाख उत्तरपत्रिका तपासणीविना पडून होत्या. बोर्डात होणाºया प्रत्येक नियामक मंडळाच्या बैठकीत पेपर तपासणीवर बहिष्काराचे पत्र जिल्हा पदाधिकारी बोर्डाला देत होते.यासंदर्भात ‘जुक्टा’चे जिल्हाध्यक्ष प्रा. राजेंद्र पगारे व सचिव प्रा. संभाजी कमानदार यांनी सांगितले की, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.त्यामुळे संघटनेने बारावीच्या पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. आज महासंघाच्या पदाधिका-यांसोबत मंत्रालयात शिक्षणमंत्र्यांनी बैठक घेतली. तेव्हा २ मे २०१२ पासून कार्यरत शिक्षकांना विधि व न्याय विभागाची परवानगी घेऊन त्यांना नियुक्ती दिनांकापासून मान्यता व वेतन अदा करणे, शालार्थ प्रणालीमध्ये नावे समाविष्ट करण्यासाठी प्रत्येक विभागात ‘टास्क फोर्स’ स्थापन करण्यात आले. संपकालीन ४२ दिवसांच्या रजा शिक्षकांच्या खात्यावर पूर्ववत जमा करणार, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना संशोधनासाठी कर्तव्य रजा मंजूर करण्यात आली, २३ आॅक्टोबर २०१७ च्या शासन निर्णयाची पूर्वलक्षी प्रभावाने अंमलबजावणी करण्यात येणार नाही, आदी मागण्यांवर तात्काळ निर्णय घेण्यात आला. काही मागण्यांबाबत अर्थमंत्र्यांसोबत १० मार्च रोजी बैठक आयोजित करून त्यात निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थी हित लक्षात घेऊन ‘जुक्टा’ने पेपर तपासणीवरचा बहिष्कार मागे घेतला आहे.