शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

छत्रपती संभाजीनगरात स्वयंघोषित नेत्यांकडून उद्योजकांना ब्लॅकमेलिंग; कसे येणार नवे उद्योग?

By विकास राऊत | Updated: May 8, 2023 13:32 IST

काही संघटना आणि राजकीय पक्षांचे नेते, स्वयंघोषित नेते, सामाजिक कार्यकर्ते, वाळूज, चिकलठाणा व शेंद्रा औद्याेगिक क्षेत्रातील उद्योगांच्या विरोधात एमआयडीसीकडे बिनबुडाच्या तक्ररी करीत आहेत.

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे (एमआयडीसी) ठरावीक राजकीय पक्ष नेते, स्वयंघोषित नेत्यांकडून खोट्या तक्रारी दाखल करून उद्योजकांना ब्लॅकमेल केले जात आहे. वेठीस धरण्याच्या या प्रकारावर जिल्हा उद्योगमित्र समितीच्या बैठकीत गांभीर्याने चिंतन करण्यात आले. अशी परिस्थिती असेल तर डीएमआयसी- ऑरिक मोठे उद्योग गुंतवणूक कशी करतील, असा प्रश्न आहे. गेल्या आठवड्यात जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा उद्योग समिती मित्र समितीच्या बैठकीत मसिआ या संघटनेने याबाबत प्रशासकीय यंत्रणेचे लक्ष वेधले आहे.

संघटनेने चर्चेसाठी उद्योजकांच्या सुरक्षेचा मुद्दा मांडताना खोट्या तक्रारींमुळे औद्योगिक वसाहतींमध्ये राजकीय पक्षांकडून होत असलेल्या खोट्या तक्रारींवरून होणाऱ्या त्रासासह अनेक मुद्यांना हात घातला. जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी सदरील प्रकरण गांभीर्याने घेत पोलिस आयुक्तांच्या कानावर घातले. काही संघटना आणि राजकीय पक्षांचे नेते, स्वयंघोषित नेते, सामाजिक कार्यकर्ते, वाळूज, चिकलठाणा व शेंद्रा औद्याेगिक क्षेत्रातील उद्योगांच्या विरोधात एमआयडीसीकडे बिनबुडाच्या तक्ररी करीत आहेत. उद्योजकांनी बेकायदा अतिक्रमण केल्याच्या खोट्या तक्रारी करून कारवाई करण्यासाठी, उद्योग बंद करण्यासाठी निवेदन दिले जात आहे. एमआयडीसीने कारवाई न केल्यास कारखान्यासमोर अथवा एमआयडीसीच्या कार्यालयासमोर उपोषणाची धमकी दिली जाते. सर्वसाधारणपणे विचार केला तर उद्योग नियमाप्रमाणे बांधकाम करतात. त्यासाठी नियमित परवानगी घेतली जाते; परंतु, सामाजिक संघटना, राजकीय नेते, कार्यकर्ते बळजबरीने हप्ता वसुलीच्या उद्देशाने एमआयडीसीकडे उद्योगांच्या विराेधात तक्रारी करून यंत्रणेला वेठीस धरीत आहेत. एमआयडीसीच्या कार्यकारी अभियंत्यांना याबाबत कळविले आहे, असे उद्योजकांनी समितीच्या बैठकीत नमूद केले.

...तर औद्योगिक वातावरणाला धक्का बसेलकाही ठरावीक राजकीय पक्षाचे वेगवेगळे नेते एकाच प्रकारची तक्रार वेगवेगळ्या उद्योगांच्या विरोधात करतात. या तक्रारींच्या माध्यमातून उद्योजकांना त्रास व धमक्या देऊन रक्कम उकळण्याचा हेतू असल्याचे स्पष्ट आहे. यामुळे उद्योजकांनादेखील कारवाईला सामोरे जावे लागते. अशा प्रकारामुळे औद्याेगिक वातावरणाला धक्का बसू शकतो.

इतर अनेक मुद्यांवर चर्चा....सोलापूर- धुळे मार्गाला एमआयडीसीचे रस्ते जोडणे, वाळूज ओॲसिस चौकात उड्डाणपूल बांधणे, शेंद्रा, वाळूज औद्योगिक वसाहतीत वीजवितरणचे स्वतंत्र केंद्र स्थापन करणे, औद्योगिक वसाहतींमध्ये होणारी वाहतुकीची कोंडी सोडविणे, चिकलठाण्यासह सर्व उद्योग वसाहतींमध्ये सुरळीत पाणीपुरवठा करण्यासह इतर मुद्यांवर बैठकीत चर्चा झाली.

गुंतवणुकीवर परिणाम होईल...उद्योग क्षेत्रामध्ये ब्लॅकमेलिंगचे प्रकार खोट्या तक्रारींच्या आडून सुरू आहेत. फायर सुरक्षा यंत्रणा आहे काय, बीसीसी आहे की नाही. अशा तक्रारी एमआयडीसीकडे केल्या जातात. तक्रारकर्ते राहतात शहरात आणि तक्रारी उद्योगांच्या करतात. यामागे हेतू सर्वश्रुत आहे. याचा इको सिस्टीम व नवीन गुंतवणुकीवर परिणाम होईल. जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्तांच्या कानावर हा सगळा प्रकार घातला आहे.- किरण जगताप, अध्यक्ष मसिआ

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMIDCएमआयडीसीPoliceपोलिस