शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
3
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
4
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
5
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
6
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
7
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
8
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
9
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
10
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
11
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
12
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
13
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
14
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
15
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
16
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
17
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
18
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
19
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
20
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!

छत्रपती संभाजीनगरात स्वयंघोषित नेत्यांकडून उद्योजकांना ब्लॅकमेलिंग; कसे येणार नवे उद्योग?

By विकास राऊत | Updated: May 8, 2023 13:32 IST

काही संघटना आणि राजकीय पक्षांचे नेते, स्वयंघोषित नेते, सामाजिक कार्यकर्ते, वाळूज, चिकलठाणा व शेंद्रा औद्याेगिक क्षेत्रातील उद्योगांच्या विरोधात एमआयडीसीकडे बिनबुडाच्या तक्ररी करीत आहेत.

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे (एमआयडीसी) ठरावीक राजकीय पक्ष नेते, स्वयंघोषित नेत्यांकडून खोट्या तक्रारी दाखल करून उद्योजकांना ब्लॅकमेल केले जात आहे. वेठीस धरण्याच्या या प्रकारावर जिल्हा उद्योगमित्र समितीच्या बैठकीत गांभीर्याने चिंतन करण्यात आले. अशी परिस्थिती असेल तर डीएमआयसी- ऑरिक मोठे उद्योग गुंतवणूक कशी करतील, असा प्रश्न आहे. गेल्या आठवड्यात जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा उद्योग समिती मित्र समितीच्या बैठकीत मसिआ या संघटनेने याबाबत प्रशासकीय यंत्रणेचे लक्ष वेधले आहे.

संघटनेने चर्चेसाठी उद्योजकांच्या सुरक्षेचा मुद्दा मांडताना खोट्या तक्रारींमुळे औद्योगिक वसाहतींमध्ये राजकीय पक्षांकडून होत असलेल्या खोट्या तक्रारींवरून होणाऱ्या त्रासासह अनेक मुद्यांना हात घातला. जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी सदरील प्रकरण गांभीर्याने घेत पोलिस आयुक्तांच्या कानावर घातले. काही संघटना आणि राजकीय पक्षांचे नेते, स्वयंघोषित नेते, सामाजिक कार्यकर्ते, वाळूज, चिकलठाणा व शेंद्रा औद्याेगिक क्षेत्रातील उद्योगांच्या विरोधात एमआयडीसीकडे बिनबुडाच्या तक्ररी करीत आहेत. उद्योजकांनी बेकायदा अतिक्रमण केल्याच्या खोट्या तक्रारी करून कारवाई करण्यासाठी, उद्योग बंद करण्यासाठी निवेदन दिले जात आहे. एमआयडीसीने कारवाई न केल्यास कारखान्यासमोर अथवा एमआयडीसीच्या कार्यालयासमोर उपोषणाची धमकी दिली जाते. सर्वसाधारणपणे विचार केला तर उद्योग नियमाप्रमाणे बांधकाम करतात. त्यासाठी नियमित परवानगी घेतली जाते; परंतु, सामाजिक संघटना, राजकीय नेते, कार्यकर्ते बळजबरीने हप्ता वसुलीच्या उद्देशाने एमआयडीसीकडे उद्योगांच्या विराेधात तक्रारी करून यंत्रणेला वेठीस धरीत आहेत. एमआयडीसीच्या कार्यकारी अभियंत्यांना याबाबत कळविले आहे, असे उद्योजकांनी समितीच्या बैठकीत नमूद केले.

...तर औद्योगिक वातावरणाला धक्का बसेलकाही ठरावीक राजकीय पक्षाचे वेगवेगळे नेते एकाच प्रकारची तक्रार वेगवेगळ्या उद्योगांच्या विरोधात करतात. या तक्रारींच्या माध्यमातून उद्योजकांना त्रास व धमक्या देऊन रक्कम उकळण्याचा हेतू असल्याचे स्पष्ट आहे. यामुळे उद्योजकांनादेखील कारवाईला सामोरे जावे लागते. अशा प्रकारामुळे औद्याेगिक वातावरणाला धक्का बसू शकतो.

इतर अनेक मुद्यांवर चर्चा....सोलापूर- धुळे मार्गाला एमआयडीसीचे रस्ते जोडणे, वाळूज ओॲसिस चौकात उड्डाणपूल बांधणे, शेंद्रा, वाळूज औद्योगिक वसाहतीत वीजवितरणचे स्वतंत्र केंद्र स्थापन करणे, औद्योगिक वसाहतींमध्ये होणारी वाहतुकीची कोंडी सोडविणे, चिकलठाण्यासह सर्व उद्योग वसाहतींमध्ये सुरळीत पाणीपुरवठा करण्यासह इतर मुद्यांवर बैठकीत चर्चा झाली.

गुंतवणुकीवर परिणाम होईल...उद्योग क्षेत्रामध्ये ब्लॅकमेलिंगचे प्रकार खोट्या तक्रारींच्या आडून सुरू आहेत. फायर सुरक्षा यंत्रणा आहे काय, बीसीसी आहे की नाही. अशा तक्रारी एमआयडीसीकडे केल्या जातात. तक्रारकर्ते राहतात शहरात आणि तक्रारी उद्योगांच्या करतात. यामागे हेतू सर्वश्रुत आहे. याचा इको सिस्टीम व नवीन गुंतवणुकीवर परिणाम होईल. जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्तांच्या कानावर हा सगळा प्रकार घातला आहे.- किरण जगताप, अध्यक्ष मसिआ

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMIDCएमआयडीसीPoliceपोलिस