शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
'पोलिसांनी त्याची हत्या केली...'! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
3
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
4
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
5
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
6
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
7
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
8
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
9
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
10
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
11
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
12
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
13
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
14
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
15
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
16
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
17
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
18
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
19
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
20
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन

पूरस्थिती असली तरी पुन्हा भाजपची महाजनादेश यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 12:23 PM

महापुरातून मराठवाड्यातील दुष्काळी भागाकडे ही यात्रा प्रवास करणार आहे.

ठळक मुद्दे२१ ऑगस्ट रोजी आष्टी मतदारसंघातून यात्रेचा मराठवाड्यात प्रवेश होईल. महाजनादेश यात्रा मराठवाड्यातील ३२ मतदारसंघांतून जाणार आहे.

औरंगाबाद : राज्यातील पूरस्थिती अद्याप सुरळीत झालेली नसताना आणि राज्य सरकारकडून अद्याप ठोस उपाययोजना झालेली नसताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा २१ ऑगस्टपासून पुन्हा सुरु होणार आहे. महापुरातून मराठवाड्यातील दुष्काळी भागाकडे ही यात्रा प्रवास करणार आहे. 

महापूर स्थिती हाताळण्यावरून सरकारविरोधात जनक्षोभ निर्माण झाला. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी ‘सेल्फी स्माईल’ करीत पूरग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळले. अर्धे राज्य पुरात बुडालेले असताना मुख्यमंत्री महाजनादेशात गुंतलेले असल्याची टीका विरोधकांनी सुरू केल्यानंतर मुख्यमंत्र्यांना यात्रा अर्धवट सोडून मुंबई गाठावी लागली. त्यांनी पूरपरिस्थितीतून कोल्हापूर, सांगली, सातारा या तिन्ही जिल्ह्यांना बाहेर काढण्यासाठी यंत्रणेला आदेश दिले. मात्र अद्यापही परिस्थिती गंभीर असताना आणि पुरानंतरच्या मदतीबाबत तसेच आरोग्याच्या प्रश्नाबाबत ठोस उपाययोजना झालेली नसताना महाजनादेश यात्रा पुन्हा सुरू होणार आहे. त्यात काही बदल करण्यात आले आहेत. महाजनादेश यात्रा मराठवाड्यातील ३२ मतदारसंघांतून जाणार आहे. आता ही यात्रा २१ ते ३१ ऑगस्टपर्यंत आहे. विभागात १६ आमदार भाजपचे आहेत, तर शिवसेनेचे १५ आमदार आहेत. ३२ मतदारसंघ यात्रेच्या माध्यमातून ढवळून काढल्यानंतर जो जनादेश भाजपच्या पदरी पडेल त्यावर शिवसेनेसोबत युती करायची, की स्वतंत्र लढायचे, याबाबत पक्षांतर्गत चिंतन होण्याची शक्यता आहे. 

स्वबळाची चाचपणी २१ ऑगस्ट रोजी आष्टी मतदारसंघातून यात्रेचा मराठवाड्यात प्रवेश होईल. तेथून बीड, गेवराई तेथून पुढे अंबड व बदनापूर या भागातून औरंगाबाद पूर्व मतदारसंघात सभा होईल. फुलंब्री, सिल्लोड, भोकरदन, जालना, मंठा, सेलू, पाथरी, मानवत, परभणीत भाजपची हवा करण्यात येईल. नंतर औंढा नागनाथ, हिंगोली, कळमनुरी, अर्धापूर, नांदेड, लोहा, अहमदपूर, उदगीर, लातूर, निलंगा, औसा, उस्मानाबाद व तुळजापूरमार्गे सोलापूर जिल्ह्याकडे ही यात्रा रवाना होईल. १० दिवसांत मुख्यमंत्र्यांच्या काही मतदारसंघांत सभा होणार आहेत. या सभांमधून स्वबळाची चाचपणी करण्यात येईल, असे भाजपच्या गोटातून सांगण्यात आले.

टॅग्स :BJPभाजपाMarathwadaमराठवाडाfloodपूर