भाजपाला करावी लागणार धावपळ
By Admin | Updated: May 29, 2014 01:12 IST2014-05-29T00:59:39+5:302014-05-29T01:12:19+5:30
औरंगाबाद : भारतीय जनता पार्टीला मराठवाडा पदवीधर मतदारसंघात निवडणुकीत फार धावपळ करावी लागणार आहे.

भाजपाला करावी लागणार धावपळ
औरंगाबाद : भारतीय जनता पार्टीला मराठवाडा पदवीधर मतदारसंघात निवडणुकीत फार धावपळ करावी लागणार आहे. पक्षाने उमेदवार देण्यास विलंब केल्यामुळे दोन टप्प्यात मराठवाडा पिंजून काढण्यासाठी आज रणनीती आखण्यात आली. ८ जिल्हे आणि ७६ तालुक्यांचा हा मतदारसंघ आहे. भाजपासमोर राष्ट्रवादीचे उमेदवार आ. सतीश चव्हाण यांचे आव्हान आहे. ते आव्हान पेलण्यासाठी भाजपाने रणनीती आखली आहे. एन-३ येथील मध्यवर्ती प्रचार कार्यालयात संघटनमंत्री रवींद्र भुसारी यांच्या उपस्थितीत पदाधिकार्यांची बैठक घेतली. २० दिवसांमध्ये पक्षाला धावपळ करावी लागणार असून, त्या दिशेने तयारी केली जात असल्याचे सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. यावेळी उमेदवार शिरीष बोराळकर, भाजयुमोचे संभाजी निलंगेकर, खा. सुनील गायकवाड यांची उपस्थिती होती. ठाकूर म्हणाले, ३ जून रोजी बोराळकर यांचा अर्ज दाखल करण्यात येईल. यावेळी महायुतीचे सर्व प्रदेश कार्यकारिणीचे नेते, पदाधिकारी व नवनिर्वाचित मंत्र्यांची उपस्थिती असेल. विभाग आणि जिल्हास्तरावर संचालन समित्या तयार करण्यात येणार आहेत. ३ जूनपर्यंत जिल्ह्यांचा प्रवास, त्यानंतर तालुकास्तरावर मेळावे व बैठका होणार आहेत. सोशल मीडिया, कॉल सेंटरची यंत्रणा उभी केल्याचे ते म्हणाले. महायुतीतील सर्व पक्ष सोबत महायुतीमधील सर्व पक्ष सोबत असल्याचा दावा ठाकूर यांनी केला. रिपाइंची नाराजीदेखील दूर करण्यात येईल. शिवसेनेनेदेखील उमेदवार देण्याबाबत वरिष्ठांशी बोलणी सुरू केली आहे. याबाबत ठाकूर म्हणाले, सेनेने इच्छा व्यक्त केली असेल.