शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
4
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
5
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
6
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
8
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
9
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
10
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
11
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
12
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
13
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!
14
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
15
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
16
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
17
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
18
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
19
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
20
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती

मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पीक कर्जापासून वंचित ठेवण्याचा डाव; शिवसेनेचा भाजपवर गंभीर आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2018 5:33 PM

राज्यासह केंद्रातील भाजपा सरकारने मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पीक कर्जापासून वंचित ठेवण्याचा डाव आखला असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेतर्फे करण्यात आला.

ठळक मुद्देसरकारने चार वर्षात घोषीत केलेल्या ६५० योजनांची शिवसेना चिरफाड करणार

औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आॅनलाईन सातबारा देणे बंद केले आहे. तलाठी शेतकऱ्यांना आॅफलाईनही सातबारा देत नाहीत. याचा फटका शेतकऱ्यांना पीक कर्ज घेण्यासाठी तयार कराव्या लागणाऱ्या फाईलला बसत आहे. राज्यासह केंद्रातील भाजपा सरकारने मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पीक कर्जापासून वंचित ठेवण्याचा डाव आखला असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेतर्फे करण्यात आला. चार वर्षात सरकारने ६५० योजनांची घोषणा केली. मात्र त्याची अंमलबजावणी झालेली नसल्यामुळे त्याची चिरफाड करण्याची घोषणाही यावेळी करण्यात आली.

शिवसेनेतर्फे शेतकऱ्यांची कर्जमाफी, पिककर्ज, स्टॅडप इंडिया, मुद्रा लोण या बँकांशी निगडीत असलेल्या योजनातील सत्य माहिती समोर आणण्यासाठी जिल्ह्याची लिड बँक असलेल्या बँक आॅफ महाराष्ट्रच्या सिडकोतील विभागीय कार्यालयासमोर आज (दि.९) ‘सत्याशोधन आंदोलन’ करण्यात आले. यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी फसव्या सरकारच्या घोषणांविरोधात निदर्शने केली. भाजप सरकारला शिव्यांची लाखोली वाहण्यात आली. तसेच कर्जमाफी, पिक कर्जाचे वाटप, मुद्रा लोन अशा विविध सरकारी योजनाची आकडेवारी मांडण्याची आग्रही मागणी केली. 

यावेळी घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता. शेवटी बँकच्या विभागीय अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांना सामोरे जात आकडेवारीसह वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला. त्यावर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीही आकडेवारी सादर करत अधिकाऱ्यांना उघडे पाडले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी, अनिल पोलकर, संतोष जेजुरकर, राजु राठोड, बाळासाहेब थोरात, विजय वाघचौरे, गणेश चोपडे, राजू वैद्य, विश्वनाथ स्वामी, सचिन खैरे, रंजना कुलकर्णी, राजेंद्र दानवे आदींसह शेकडो पदाधिकारी उपस्थितीत होते.

कर्जमाफीच्या फसव्या योजनेचा निषेधराज्य सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करण्याची घोषणा केली होती. मात्र ही योजनाच फसवी असल्याचे दिसून आले आहे. योजनेला सुरुवात होऊन वर्ष झाले आहे. यात ३ लाख ३६ हजार शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. यातील १ लाख ४२ हजार शेतकऱ्यांना कोणताही लाभ मिळालेला नसल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला. सरकारने चार वर्षात घोषीत केलेल्या ६५० योजनांची शिवसेना अशीच चिरफाड करणार असल्याचेही त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाagitationआंदोलनFarmerशेतकरीState Governmentराज्य सरकार