शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

सेनेची कोंडी करण्यासाठी भाजपने काढले 'संभाजीनगर' अस्त्र 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 15:05 IST

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करावे, असे स्वप्न होते.

ठळक मुद्देशहराचे नाव बदलण्याचा ठराव सोमवारी सर्वसाधारण सभेचे आयोजन

औरंगाबाद : १,६८० कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे अस्त्र निकामी ठरल्यानंतर आता महापालिका आणि  शहराच्या राजकारणात शिवसेनेला कसे अडचणीत आणता येईल, यादृष्टीने भाजप डावपेच आखत आहे. २३ डिसेंबर रोजी महापालिका सर्वसाधारण सभेत शहराचे नाव बदलण्याचा प्रस्ताव आणण्याच्या हालचाली भाजपकडून सुरु आहेत. 

यासंबंधीचा प्रस्ताव शुक्रवारी भाजपने महापौरांकडे सादर केला.  शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडी स्थापन करून मुख्यमंत्रीपद मिळविले. महाआघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भाजप सेनेवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडायला तयार नाही. औरंगाबाद महापालिकेत युती तुटल्याची घोषणा भाजपने केली. त्यानंतर उपमहापौर विजय औताडे यांनी राजीनामा दिला. स्थायी समिती सभापती, वॉर्ड सभापती आदी महत्त्वाची पदे आजही भाजपच्या ताब्यात आहेत.  

शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिल्याचा आरोप करून भाजपने शिवसेनेच्या विरोधात आंदोलन केले. सरकारने पाणीपुरवठा योजनेला स्थगिती दिली नसल्याचा निर्वाळा दिल्यानंतर भाजपची उलट कोंडी झाली. आमच्या आंदोलनामुळेच सरकारने पत्र काढल्याचा दावाही भाजपने केला. महापालिकेतील भाजप नगरसेवकांनी आता वेगळीच शक्कल लढविली आहे. सेनेची कोंडी करण्यासाठी शहराचे नाव बदलण्यात यावे, अशी मागणी केली. शुक्रवारी भाजप नगरसेवक विजय औताडे, राजू शिंदे, प्रमोद राठोड, दिलीप थोरात यांनी महापौरांना एक प्रस्ताव दिला. शहराचे नाव ‘संभाजीनगर’करावे असे प्रस्तावात नमूद केले आहे. 

स्वप्न बाळासाहेबांचे...पुढाकार भाजपचाशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करावे, असे स्वप्न होते. त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांना शहराचे नामकरण करणे सोपे जावे, यासाठी सर्वसाधारण सभेत प्रस्ताव घेऊन तो मंजूर करून शासनाकडे पाठवावा, अशी मागणी प्रस्तावात करण्यात आली आहे.

कशासाठी मनपा निवडणुकीसाठी...महापालिका निवडणुकीत भाजपला सर्वाधिक विरोध सेनेचा सहन करावा लागणार आहे. त्यामुळे भाजपने मनपा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ठेवणीतील एक-एक अस्त्र काढणे सुरू केले आहे. भाजपच्या या राजकीय डावपेचाला सेना कशा पद्धतीने शह देते हे २३ डिसेंबर रोजी सर्वसाधारण सभेत दिसून येईल.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabadऔरंगाबादBJPभाजपाShiv Senaशिवसेना