शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

'नळातून येणाऱ्या हवेला पाणी समजा असंही मुख्यमंत्री म्हणतील'; फडणवीसांचा औरंगाबादमध्ये हल्लाबोल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2022 20:13 IST

राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात मी म्हणतोय ना मग औरंगाबादला संभाजीनगर समजा. उद्या ते म्हणतील की दगडाला सोन्याची नाणी समजा आणि नळातून येणाऱ्या हवेला पाणी समजा, असा जोरदार हल्लाबोल राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.

औरंगाबाद-

राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात मी म्हणतोय ना मग औरंगाबादला संभाजीनगर समजा. उद्या ते म्हणतील की दगडाला सोन्याची नाणी समजा आणि नळातून येणाऱ्या हवेला पाणी समजा, असा जोरदार हल्लाबोल राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. ते औरंगाबादमध्ये भाजपाने आयोजित केलेल्या जलआक्रोश मोर्चात बोलत होते. औरंगाबादमध्ये पिण्याच्या पाण्याचा मुद्दा तापला असून यावरुन नागरिकांमध्ये असंतोषाचं वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर आज महापालिकेवर भाजपानं धडक मोर्चाचं आयोजन केलं आहे. 

"हे तर जुम्मे के जुम्मे सरकार...", रावसाहेब दानवेंकडून सरकारचं नामकरण 

देवेंद्र फडणवीसांनी मोर्चात संबोधित करताना ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. "औरंगाबादमधली आजची लढाई ही परिवर्तनाची लढाई नाही. परिवर्तन तर होणारच आहे. पण ही लढाई व्यवस्था परिवर्तनाची आहे. आजचा मोर्चा भाजपाचा नाही. हा मोर्चा जनतेचा मोर्चा आहे. जनतेचा आक्रोश आहे. जनतेच्या आक्रोशाला संघटीत करण्याचं काम भाजपानं केलं आहे. थेंब थेंब पाण्यासाठी संभाजीनगरचा माणूस तरसलेला आहे. अशावेळी आम्ही शांत बसू शकत नाही. मी सरकारला इशारा देतो हा संघर्ष तेव्हाच संपेल जेव्हा इथं पाणी पोहोचेल. तोवर सरकारला रात्रीची झोप लागू देणार नाही", असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीस यांनी केला. 

"आमच्या मुख्यमंत्र्यांना जर सांगितलं की आमच्याकडे पाणी येत नाही. तर ते त्याच्यावर काहीच करायला तयार नाहीत. त्यांनी तर सांगितलं की मी म्हणतो म्हणजे सत्य समजा. मी म्हणतो तर संभाजीनगर समजा. मी म्हणतो म्हणून बेफिकीर समजा. दगडाला सोन्याची नाणी समजा. नळातून येणाऱ्या हवेला पाणी समजा", अशा कवितेच्या पंक्तीतून फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

"यांचे मंत्री जेलात अन् मुख्यमंत्री घरात", रावसाहेब दानवेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

पोस्टर फाडाल पण आक्रोशाचं काय?शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपाच्या जलआक्रोश मोर्चाचं पोस्टर फाडल्याच्या मुद्द्यावरही फडणवीस यांनी संताप व्यक्त केला. "मला आज कळलं की शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आमचे पोस्टर फाडले. पण एक गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही पोस्टर फाडू शकता पण जनतेचा आक्रोश कसा थांबवणार? जेव्हा माझी माय माऊली मनातल्या मनात तुम्हाला शिव्याशाप देते तेव्हा तुम्ही बुडल्याशिवाय राहणार नाही. संभाजीनगरनं आज महाराष्ट्राला हलवून टाकलं आहे. आता मागे हटणार नाही. जोपर्यंत पाण्याचा प्रश्न सुटत नाही तोवर भाजपा झोपणार नाही आणि सत्ताधाऱ्यांना झोपू देणार नाही. सरकारची कुंभकरणी झोप उघडली नाही तर सरकारला कुणी वाचवू शकणार नाही", असं फडणवीस म्हणाले. 

मुख्यमंत्री 'त्या' आजींच्या घरी जाणार का?"मला कुणीतरी सांगितलं की आजच्या जलआक्रोश मोर्चात एक ८० वर्षांच्या आजी रिकामी हंडा घेऊन सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी सहभागी झाल्या आहेत. मला एक गोष्ट मुख्यमंत्र्यांना विचारायची आहे. तुमच्या घराबाहेर ८० वर्षांच्या त्या झुकेगा नहीं आजी बसल्या होत्या. त्या आजींच्या घरी तुम्ही गेलात. आता पिण्याच्या पाण्यासाठी तरणाऱ्या या आजींच्या घरी तुम्ही जाणार का?", अशी टीका फडणवीसांनी केली.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबाद