शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
2
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
3
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
4
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
5
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
6
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
7
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
8
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
9
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
10
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
11
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
12
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
13
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
14
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
15
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
16
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
17
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
18
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
19
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
20
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
Daily Top 2Weekly Top 5

'नळातून येणाऱ्या हवेला पाणी समजा असंही मुख्यमंत्री म्हणतील'; फडणवीसांचा औरंगाबादमध्ये हल्लाबोल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2022 20:13 IST

राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात मी म्हणतोय ना मग औरंगाबादला संभाजीनगर समजा. उद्या ते म्हणतील की दगडाला सोन्याची नाणी समजा आणि नळातून येणाऱ्या हवेला पाणी समजा, असा जोरदार हल्लाबोल राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.

औरंगाबाद-

राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात मी म्हणतोय ना मग औरंगाबादला संभाजीनगर समजा. उद्या ते म्हणतील की दगडाला सोन्याची नाणी समजा आणि नळातून येणाऱ्या हवेला पाणी समजा, असा जोरदार हल्लाबोल राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. ते औरंगाबादमध्ये भाजपाने आयोजित केलेल्या जलआक्रोश मोर्चात बोलत होते. औरंगाबादमध्ये पिण्याच्या पाण्याचा मुद्दा तापला असून यावरुन नागरिकांमध्ये असंतोषाचं वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर आज महापालिकेवर भाजपानं धडक मोर्चाचं आयोजन केलं आहे. 

"हे तर जुम्मे के जुम्मे सरकार...", रावसाहेब दानवेंकडून सरकारचं नामकरण 

देवेंद्र फडणवीसांनी मोर्चात संबोधित करताना ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. "औरंगाबादमधली आजची लढाई ही परिवर्तनाची लढाई नाही. परिवर्तन तर होणारच आहे. पण ही लढाई व्यवस्था परिवर्तनाची आहे. आजचा मोर्चा भाजपाचा नाही. हा मोर्चा जनतेचा मोर्चा आहे. जनतेचा आक्रोश आहे. जनतेच्या आक्रोशाला संघटीत करण्याचं काम भाजपानं केलं आहे. थेंब थेंब पाण्यासाठी संभाजीनगरचा माणूस तरसलेला आहे. अशावेळी आम्ही शांत बसू शकत नाही. मी सरकारला इशारा देतो हा संघर्ष तेव्हाच संपेल जेव्हा इथं पाणी पोहोचेल. तोवर सरकारला रात्रीची झोप लागू देणार नाही", असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीस यांनी केला. 

"आमच्या मुख्यमंत्र्यांना जर सांगितलं की आमच्याकडे पाणी येत नाही. तर ते त्याच्यावर काहीच करायला तयार नाहीत. त्यांनी तर सांगितलं की मी म्हणतो म्हणजे सत्य समजा. मी म्हणतो तर संभाजीनगर समजा. मी म्हणतो म्हणून बेफिकीर समजा. दगडाला सोन्याची नाणी समजा. नळातून येणाऱ्या हवेला पाणी समजा", अशा कवितेच्या पंक्तीतून फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

"यांचे मंत्री जेलात अन् मुख्यमंत्री घरात", रावसाहेब दानवेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

पोस्टर फाडाल पण आक्रोशाचं काय?शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपाच्या जलआक्रोश मोर्चाचं पोस्टर फाडल्याच्या मुद्द्यावरही फडणवीस यांनी संताप व्यक्त केला. "मला आज कळलं की शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आमचे पोस्टर फाडले. पण एक गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही पोस्टर फाडू शकता पण जनतेचा आक्रोश कसा थांबवणार? जेव्हा माझी माय माऊली मनातल्या मनात तुम्हाला शिव्याशाप देते तेव्हा तुम्ही बुडल्याशिवाय राहणार नाही. संभाजीनगरनं आज महाराष्ट्राला हलवून टाकलं आहे. आता मागे हटणार नाही. जोपर्यंत पाण्याचा प्रश्न सुटत नाही तोवर भाजपा झोपणार नाही आणि सत्ताधाऱ्यांना झोपू देणार नाही. सरकारची कुंभकरणी झोप उघडली नाही तर सरकारला कुणी वाचवू शकणार नाही", असं फडणवीस म्हणाले. 

मुख्यमंत्री 'त्या' आजींच्या घरी जाणार का?"मला कुणीतरी सांगितलं की आजच्या जलआक्रोश मोर्चात एक ८० वर्षांच्या आजी रिकामी हंडा घेऊन सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी सहभागी झाल्या आहेत. मला एक गोष्ट मुख्यमंत्र्यांना विचारायची आहे. तुमच्या घराबाहेर ८० वर्षांच्या त्या झुकेगा नहीं आजी बसल्या होत्या. त्या आजींच्या घरी तुम्ही गेलात. आता पिण्याच्या पाण्यासाठी तरणाऱ्या या आजींच्या घरी तुम्ही जाणार का?", अशी टीका फडणवीसांनी केली.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबाद