शहरं
Join us  
Trending Stories
1
माझा आजचा दौरा जड अंतःकरणाने रद्द करावा लागतो आहे; कारण सांगत धनंजय मुंडेंनी दिली माहिती
2
Brahmos Deal with Vietnam : 'ब्रह्मोस' भारताला आणखी मालामाल करणार, हा छोटासा देश चीनशी टक्कर घेणार; होणार 700 मिलियन डॉलरची डील!
3
"तुम मराठी लोग गंदा है...", घाटकोपरमध्ये पुन्हा मराठी-गुजराती वाद, मनसैनिकांनी काय केलं पाहा...
4
सोन्याच्या दरात मोठी तेजी, पोहोचलं १ लाखांच्या जवळ, किंमत कमी होण्याची शक्यता आहे का? पाहा नवे दर
5
लोणावळा रेल्वे रुळाजवळ सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह आढळला; परिसरात खळबळ!
6
IPL 2025: २५ दिवसांपूर्वी केलेली भविष्यवाणी आज काव्या मारनला हसवणार की रडवणार? प्रकरण काय
7
"एकनाथ शिंदेंच्या घरात शूटिंग केलं तेव्हा.."; क्षितीश दातेने सांगितला 'धर्मवीर'चा अनुभव
8
Vastu Tips: घराच्या उत्तर दिशेला ठेवा कुबेर महाराजांची तसबीर आणि 'या' पाच भाग्यदायी वस्तू!
9
"स्क्रीनवर चांगली दिसण्यासाठी ती...", श्रीदेवीच्या मृत्यूबाबतीत बोनी कपूर यांचा धक्कादायक खुलासा
10
Dia Mirza : "तो सीन करताना मी थरथरत होती, मला उलटी झाली"; दीया मिर्झाने सांगितला शुटिंगचा अनुभव
11
५ वर्षात १ लाख रुपयांचे झाले दीड कोटी! आता बोनस शेअर्स आणि लाभांशाची लागणार लॉटरी
12
भारतासमोर चीन गुडघ्यांवर, ड्रॅगन सर्व अटी मानण्यास तयार; नक्की काय आहे प्रकरण?
13
Swami Samartha: आपल्यावर स्वामी कृपा होणार असल्याचे संकेत कसे ओळखावेत? जाणून घ्या!
14
जून आणि ऑगस्टमध्ये रेपो दरात पुन्हा RBI कपात करणार का? लोन होऊ शकतात आणखी स्वस्त
15
लोकांच्या आरोग्याला गंभीर धोका अन् सीडीएससीओने ‘त्या’ ३५ औषधांवर घातली बंदी
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर शनी देणार 'या' पाच राशींना अक्षय्य धनलाभ आणि कीर्ती!
17
"...म्हणून जाती धर्माचे मुद्दे पुढे केले जात आहेत का?", जयंत पाटलांचा महायुती सरकारला सवाल
18
ट्रम्प टॅरिफ धोरणामुळे अमेरिकेची रिझर्व्ह बँकही चिंतेत; अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी व्यक्त केली मोठी भीती
19
कामाच्या वेळी पायावर पाय ठेवला तरी शिक्षा, मुंबईच्या तरुणाचा भयंकर अनुभव, 60 जणांची सुटका
20
लग्न झालेल्या लोकांना विसरण्याचा आजाराचा जास्त धोका? 'ही' आहेत डिमेंशियाची लक्षणं अन् कारणं

पक्ष्यांना पिण्यासाठी ठेवले पाच ठिकाणी पाणी; पक्षी बचाव अभियांतर्गत उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 13:40 IST

कामगार दिन व महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मराठवाडा गुणवंत कामगार विकास संस्था व बाबासाहेब डांगे मित्रमंडळातर्फे शहरातील पाच प्रमुख ठिकाणी पक्ष्यांसाठी  पाण्याची सोय करण्यात आली.

औरंगाबाद : कामगार दिन व महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मराठवाडा गुणवंत कामगार विकास संस्था व बाबासाहेब डांगे मित्रमंडळातर्फे शहरातील पाच प्रमुख ठिकाणी पक्ष्यांसाठी  पाण्याची सोय करण्यात आली. झाडांवर पाण्याने भरलेले पाण्याचे भांडे  टांगण्यात आले व माणसांना त्यात पाणी भरण्याचीही जबाबदारी सोपविण्यात आली. 

पहिल्यांदा कॉ.चंद्रगुप्त चौधरी भवनाच्या टेरेसवर डांगे यांच्या हस्ते व ज्येष्ठ गुणवंत कामगार उत्तम आसबे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्र. ज. निकम गुरुजी यांच्या हस्ते चौधरी भवन परिसरातील झाडावर पाण्याचे भांडे टांगण्यात आले. यावेळी माजी शिक्षणाधिकारी रमेश धनेगावकर, निर्मला बडवे, सुषमा जोशी, शारदा जाधव, राजेंद्र अजमेरा, रमेश तारापुरे, जी. ए. बारस्कर, चंद्रकांत पोतदार, कुलदी गुरव आदींची उपस्थिती होती. 

सिडको बसस्थानकाजवळील  वसंतराव नाईक यांचा पुतळ परिसरातील झाडांवरही पाण्याचे भांडे टांगण्यात आले. यावेळी जगन्नाथ काकडे, डॉ. बी. पी. रेघे, महेश सेवलीकर, सानिका आसबे, मुकुंद कोकणे, संतोष पापडीवाल, विश्वनाथ जांभळे, संजय झट्टू, मच्छिंद्र फुलावरे, पंडितराव तुपे, भीमसिंग शिरे, शिवराज पटणे, उत्तमसिंग दुल्हत आदींची उपस्थिती होती. मराठवाडा गुणवंत कामगार विकास संस्था व बाबासाहेब डांगे मित्रमंडळातर्फे येत्या ६ मे रोजी राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यास पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करून पक्षी बचाव अभियानाचा दुसरा टप्पा सुरू करण्यात येणार आहे. आणखी पाच ठिकाणी झाडांवर पाण्याचे भांडे टांगण्यात येणार आहे.  

मुकुंदवाडी स्मशानभूमीत... मुकुंदवाडी स्मशानभूमीतील झाडांवर पाण्याचे भांडे टांगून तेथील स्मशानजोगी गायकवाड यांच्यावर देखभालीची जबाबदारी सोपविण्यात आली.

पोलिसांचा सहभाग.... मुकुंदवाडी पोलीस ठाणे परिसरातील झाडांवर पाण्याचे भांडे टांगताना  पोलिसांचा उत्स्फूर्त सहभाग मिळाला. यावेळी पोलीस कर्मचारी डॉ. राहुल खटावकर, संजय बहिरव, रवींद्र शिरसाट, गोकुळ जाधव, मधुकर मोरे, माधुरी खरात, सपकाळे, व्यवहारे यांची प्रमुख उपस्थिती होती. राजर्षी शाहू विद्यालय परिसरातील झाडांवर संस्थाचालक आबा बिराजदार,  मुख्याध्यापक मुंगळे, वाल्मीक सुराशे, संतोष माळकर, दिलीप आसबे, धनवटे, सुरेश कोकाटे, अभिजित आसबे, दौलत चौधरी आदींची उपस्थिती होती. 

टॅग्स :Waterपाणीwater shortageपाणीकपातwater scarcityपाणी टंचाई