शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
3
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
4
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
5
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
6
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
7
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
8
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
9
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
10
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
11
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
12
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
13
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
14
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
15
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
16
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
17
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
18
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
19
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
20
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."

हेल्थ केअरचा कोट्यावधींचा घोटाळा; प्रतिमहिना ३५० रुपयेप्रमाणे जमाकरून शेकडो नागरिकांना फसवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 19:44 IST

health care scams in Aurangabad : ज्यांनी तक्रार केलेली नाही, त्यांनी पुढे यावे, असे पोलिसांनी आवाहन केले आहे

ठळक मुद्देआरोपी आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात औरंगाबाद शहरात ३० लाख रुपये उकळले

औरंगाबाद : प्रतिमहिना ३५० रुपयेप्रमाणे २० महिने ७ हजार रुपये गोळा करून शहरातील शेकडो नागरिकांना ३० लाख १३ हजार ८५ रुपयांची फसवूणक केल्याच्या प्रकरणात फेनॉलिनल हेल्थ केअर कंपनीचा प्रमुख नंदलाल केसरसिंग यास आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. हेल्थ केअरचा हा घोटाळा कोट्यवधी रुपयांचा असल्याची माहिती निरीक्षक दादाराव सिनगारे यांनी दिली. तसेच ज्यांनी तक्रार केलेली नाही, त्यांनी पुढे यावे, असे आवाहनही सिनगारे यांनी केले आहे. ( Billions in health care scams; Hundreds of citizens were cheated out of Rs 350 per month) 

अतुल बाळासाहेब जाधव (३५, रा. गट नं.५२/१, सारा व्यंकटेश बिल्डिंग सी १, विंग १, प्लॉट नंबर ९, वडगाव कोल्हाटी, बजाजनगर) यांनी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. यात फेनॉलिनल हेल्थ केअर सर्व्हिसेस कंपनी लिमिटेडचे चेअरमन नंदलाल केसरसिंग, संचालक थक्केमधाथील श्रीधरन नायर, सेबेस्टिन मल्लीकल, मीनबहादूर केसरसिंग, कार्यकारी संचालक विलास बाळकृष्ण नायर आणि जोसेफ लाझर (सर्व रा. मुंबई) यांचा समावेश होता. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी नंदलाल यास लातुर आर्थिक गुन्हे शाखेने अटक केल्याची माहिती तपासात मिळाल्यानंतर औरंगाबाद आर्थिक गुन्हे शाखेने त्याचा ताबा २१ सप्टेंबर रोजी लातुर कारागृहातून घेतला. ही कामगिरी निरीक्षक दादाराव सिनगारे, तपासी अधिकारी सहायक निरीक्षक तृप्ती तोटावार, सहायक फाैजदार गोकुळ वाघ, नाईक विठ्ठल मानकापे, संजय जारवाल, संदीप जाधव, अनिल थोरे, बाबा भानुसे यांच्या पथकाने केली. दरम्यान, आरोपीला २४ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.

हेही वाचा - औरंगाबादमध्ये ऑनर किलिंग ? वडिलांनीच खड्डा खोदून पुरला मुलीचा मृतदेह 

काय आहे प्रकरण ?फेनॉलिनल हेल्थ केअर कंपनीने दरमहा ३५० रुपयेप्रमाणे २० महिने ७ हजार रुपये जमा करून घेतले. या बदल्यात कंपनी नऊ वर्षांनी दुप्पट १४ हजार रुपये देणार होती. तसेच ९ वर्षांच्या कालावधीत दवाखान्याचा खर्च हा या पॉलिसीतंर्गत विनामूल्य होणार असल्याचे कंपनीच्या ज्योतीनगर येथील कार्यालयातील व्यवस्थापक विकास पाटील यांनी सांगितले. यानुसार अतुल जाधव यांनी १ जानेवारी २००५ ते २८ मे २०१८ या कालावधीत पैसे भरले. त्यानंतर ३० आॅक्टोबर २०१५ रोजी पॉलिसीचा कालावधी पूर्ण झाला. त्यामुळे मूळ पॉलिसी व पैसे भरणा पावत्या जमा करून कंपनीच्या मुंबईतील मुख्य कार्यालयातून जाधव यांच्या नावे १४ हजार रुपयांचा धनादेश आला. मात्र तो धनादेश वटलाच नाही. तेव्हा कंपनीच्या कार्यालयात धाव घेतली असता बंद दिसले. याच प्रकारे शहरातील शेकडो जणांना कंपनीने ३० लाख १२ हजार ८५ रुपयांना फसविण्यात आले आहे.

हेही वाचा - बिबी-का-मकबरा परिसरात दडले काय ? उत्खननात स्नानगृह, शौचालयाचा पाया उघडा

हेही वाचा - पत्नी गेली माहेरी, नांदायला परत यावी म्हणून फोटो व्हायरल करून केली बदनामी

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस