शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
2
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
3
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
4
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
5
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
6
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
7
IPL 2026 Retention Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
8
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
9
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
10
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
11
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
12
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
13
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
14
मासिक पाळी येण्यापूर्वी चिडचिड, रडू येतं, मूड जातो, त्याची ५ कारणं- शरीरातले बदल ओळखा पटकन
15
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
16
सोम प्रदोष २०२५: सोम प्रदोषाने आठवड्याची सुरुवात होणार; 'या' ८ राशींना शिवकृपेचे संकेत मिळणार
17
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
18
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
19
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
20
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

बिहारचा विजय निवडणूक आयोगाचा, त्यांच्या विरुद्ध लढा द्यावा लागणार; अंबादास दानवेंचा निर्धार!

By बापू सोळुंके | Updated: November 15, 2025 15:57 IST

मराठवाड्यातील ५२ नगरपालिकांमध्ये महाविकास आघाडी एकत्र

छत्रपती संभाजीनगर: मुंबई महापालिका निवडणूकीसाठी काँग्रेसने स्वबळाचा दिलेला नारा हा त्यांच्या पक्षाचा अधिकार आहे. भाजप व शिंदेगटाला तोडीस तोड अशी आमची आघाडी आहे. मराठवाड्यातील ५२ नगर पालिकांमध्ये महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवित आहे. उर्वरित नगरपरिषदांसंदर्भात उद्या रविवारी निर्णय होणार असल्याचे विधान परिषदेचे माजी विरोधीपक्षनेते तथा उद्धवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी शनिवारी (दि.१५)पत्रकार परिषदेत सांगितले.

महाराष्ट्रासारखी बिहारची अवस्था झाली,याकडे लक्ष वेधले असता दानवे म्हणाले की, सत्ताधाऱ्यांकडून निवडणूक आयोगाचा गैरवापर सुरू आहे. राज्यात शरद पवार , उद्धवसेना यांना दरनिवडणूकीत किमान ५० ते ६० जागा हमखास मिळतात. अशीच परिस्थिती बिहार मध्ये लालू प्रसाद यांच्या पक्षाची आहे. केवळ २५ जागा त्यांच्या येऊच शकत नाहीत. हा विजय निवडणूक आयोगाचा आहे, असा आरोप दानवे यांनी केला. गत विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत जागा वाटपात दिरंगाई झाली. शिवाय मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून उद्धव ठाकरेंचा चेहरा असता तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीतील सर्व पक्षांच्या चार जागा वाढल्या असत्या, असे दानवे म्हणाले. मात्र, निवडणूक आयोगाविरोधात लढा द्यावा लागणार आहे, अन्यथा कार्यकर्त्यांचे मनोबल कमी होईल. 

अजित पवारांचा राजीनामा घ्यावाभाजपा भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप करीत दानवे म्हणाले,  बिहार निवडणुकीचा  अजित पवार यांचा काही संबंध नाही.असे असताना पवार हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना शुभेच्छा द्यायला गेले नव्हते तर पार्थ पवार प्रकरणांत भेटायला गेले होते, असा आरोपही दानवे यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी अजीत  पवारांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

भाजपने कार्यकर्ते पळवलेआमच्या पक्षातील गंगापूरच्या अविनाश पाटील यांना उमेदवारी देतो असे, आमिष दाखवून भाजप आमदार आमदार प्रशांत बंब यांनी पळवून नेले होते. नंतर ते परत आले. भाजपकडे संघटन मजबूत आहे, तर  आमचे कार्यकर्ते का पळवत आहे, असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला.

English
हिंदी सारांश
Web Title : Bihar Victory Belongs to Election Commission; Fight Against Them: Danve

Web Summary : Ambadass Danve alleges Election Commission misuse in Bihar, similar to Maharashtra. He criticized BJP for poaching workers and demanded Ajit Pawar's resignation, accusing him of corruption ties.
टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवेBihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५Uddhav Thackerayउद्धव ठाकरे