शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

मोठा दिलासा! १ फेब्रुवारीपासून छत्रपती संभाजीनगरकरांना दोन दिवसांआड पाणी

By मुजीब देवणीकर | Updated: November 17, 2023 19:50 IST

मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांची घोषणा; ९०० मिमी जलवाहिनीचे काम जानेवारीत पूर्ण

छत्रपती संभाजीनगर : शहरात सध्या आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा होतोय. महापालिका प्रशासनासाठी ही भूषणावह बाब अजिबात नाही. राज्य शासनाच्या विशेष सहकार्याने ९०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. जानेवारी अखेरपर्यंत हे काम पूर्ण होईल. १ फेब्रवारीपासून शहराला दोन दिवसांआड पाणी देण्यात येईल. ज्या भागात नवीन जलवाहिन्या टाकलेल्या आहेत, त्यांना तूर्त कनेक्शन देण्यात येणार नसल्याचेही त्यांनी नमूद केले.

शहरात सध्या दररोज १२२ एमएलडी पाणी येत आहे. पाणी साठविण्याची क्षमता नसल्याने चार दिवसांआड, म्हणजेच पाचव्या दिवशी, तर काही भागांत सातव्या, आठव्या दिवशी पाणीपुरवठा होत आहे. खंडपीठाने आदेश दिल्यानंतरही पाणीपुरवठ्यात पाहिजे तशी सुधारणा झालेली नाही. प्रशासक जी. श्रीकांत यांनीही सध्याच्या परिस्थितीवर आपणही समाधानी नसल्याचे मत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम डिसेंबर २०२४ पर्यंत कोणत्याही परिस्थितीत संपविण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले आहे. त्यापूर्वी शासनाने २०० कोटी रुपये ९०० मिमी जलवाहिनी टाकण्यासाठी अनुदान दिले. जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत ३२ किमी जलवाहिनी टाकण्याचे कामही पूर्ण झाले. ७ किमी काम बाकी आहे. सोबतच जलशुद्धीकरण केंद्र अपडेट करणे, पंपिंग यंत्रणा बसविण्याचे काम जानेवारीअखेरीस होईल. सध्या जायकवाडी येथे ज्या उद्भव विहिरीतून पाणी उपसा करण्यात येणार आहे, त्याच ठिकाणी ९०० मिमीसाठी यंत्रणा बसविली जाईल. शहरात यातून अतिरिक्त ७० ते ८० एमएलडी पाणी मिळेल. पूर्वी ही लाईन सुरू झाल्यावर जुनी ७०० मिमीची लाईन बंद करण्याचा निर्णय घेतला होता. तूर्त ७०० मिमीची अत्यंत जीर्ण झालेली जलवाहिनी सुद्धा सुरू ठेवली जाणार असल्याचे श्रीकांत यांनी सांगितले.

सिडको-हडको, जुने शहरसध्या महापालिका ज्या वसाहतींना पाणीपुरवठा करीत आहे, त्याच वसाहतींना दोन दिवसांआड पाणी मिळेल. ज्या वसाहतींमध्ये नवीन योजनेतून जलवाहिन्या टाकल्या, तेथे तूर्त तरी पाणी देणे शक्य नाही. त्या वसाहतींसाठी टँकरद्वारे पाणी सुरू राहील.

हर्सूलचे पाणीही वाढणारहर्सूल तलावातून सध्या पाच ते सहा एमएलडी पाण्याचा उपसा सुरू आहे. या ठिकाणी ४६ लाख रुपये खर्च करून नवीन जलशुद्धीकरण केंद्र उभारले जात आहे. डिसेंबरपर्यंत हे काम पूर्ण होईल. त्यानंतर दररोज १० एमएलडी पाणी हर्सूल तलावातून घेतले जाईल. १४ वॉर्डांनाही दोन दिवसांआड पाणी मिळेल.

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी