शहरं
Join us  
Trending Stories
1
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
2
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
3
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
4
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
5
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
6
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
7
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
8
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
9
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
10
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
11
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
12
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
13
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
14
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
15
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
16
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
17
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
18
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
19
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
20
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

मोठा दिलासा! १ फेब्रुवारीपासून छत्रपती संभाजीनगरकरांना दोन दिवसांआड पाणी

By मुजीब देवणीकर | Updated: November 17, 2023 19:50 IST

मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांची घोषणा; ९०० मिमी जलवाहिनीचे काम जानेवारीत पूर्ण

छत्रपती संभाजीनगर : शहरात सध्या आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा होतोय. महापालिका प्रशासनासाठी ही भूषणावह बाब अजिबात नाही. राज्य शासनाच्या विशेष सहकार्याने ९०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. जानेवारी अखेरपर्यंत हे काम पूर्ण होईल. १ फेब्रवारीपासून शहराला दोन दिवसांआड पाणी देण्यात येईल. ज्या भागात नवीन जलवाहिन्या टाकलेल्या आहेत, त्यांना तूर्त कनेक्शन देण्यात येणार नसल्याचेही त्यांनी नमूद केले.

शहरात सध्या दररोज १२२ एमएलडी पाणी येत आहे. पाणी साठविण्याची क्षमता नसल्याने चार दिवसांआड, म्हणजेच पाचव्या दिवशी, तर काही भागांत सातव्या, आठव्या दिवशी पाणीपुरवठा होत आहे. खंडपीठाने आदेश दिल्यानंतरही पाणीपुरवठ्यात पाहिजे तशी सुधारणा झालेली नाही. प्रशासक जी. श्रीकांत यांनीही सध्याच्या परिस्थितीवर आपणही समाधानी नसल्याचे मत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम डिसेंबर २०२४ पर्यंत कोणत्याही परिस्थितीत संपविण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले आहे. त्यापूर्वी शासनाने २०० कोटी रुपये ९०० मिमी जलवाहिनी टाकण्यासाठी अनुदान दिले. जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत ३२ किमी जलवाहिनी टाकण्याचे कामही पूर्ण झाले. ७ किमी काम बाकी आहे. सोबतच जलशुद्धीकरण केंद्र अपडेट करणे, पंपिंग यंत्रणा बसविण्याचे काम जानेवारीअखेरीस होईल. सध्या जायकवाडी येथे ज्या उद्भव विहिरीतून पाणी उपसा करण्यात येणार आहे, त्याच ठिकाणी ९०० मिमीसाठी यंत्रणा बसविली जाईल. शहरात यातून अतिरिक्त ७० ते ८० एमएलडी पाणी मिळेल. पूर्वी ही लाईन सुरू झाल्यावर जुनी ७०० मिमीची लाईन बंद करण्याचा निर्णय घेतला होता. तूर्त ७०० मिमीची अत्यंत जीर्ण झालेली जलवाहिनी सुद्धा सुरू ठेवली जाणार असल्याचे श्रीकांत यांनी सांगितले.

सिडको-हडको, जुने शहरसध्या महापालिका ज्या वसाहतींना पाणीपुरवठा करीत आहे, त्याच वसाहतींना दोन दिवसांआड पाणी मिळेल. ज्या वसाहतींमध्ये नवीन योजनेतून जलवाहिन्या टाकल्या, तेथे तूर्त तरी पाणी देणे शक्य नाही. त्या वसाहतींसाठी टँकरद्वारे पाणी सुरू राहील.

हर्सूलचे पाणीही वाढणारहर्सूल तलावातून सध्या पाच ते सहा एमएलडी पाण्याचा उपसा सुरू आहे. या ठिकाणी ४६ लाख रुपये खर्च करून नवीन जलशुद्धीकरण केंद्र उभारले जात आहे. डिसेंबरपर्यंत हे काम पूर्ण होईल. त्यानंतर दररोज १० एमएलडी पाणी हर्सूल तलावातून घेतले जाईल. १४ वॉर्डांनाही दोन दिवसांआड पाणी मिळेल.

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी