शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

मोठी बातमी! कॉपी-पेस्ट प्रबंधावरून संशोधकास दणका, कुलपतींनी केली पीएचडी पदवी रद्द

By राम शिनगारे | Updated: October 26, 2023 12:53 IST

विद्यापीठाच्या ६५ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच पीएच.डी. पदवी रद्द होण्याची घटना घडली आहे.

छत्रपती संभाजीनगर : पीएच.डी. च्या संशोधन प्रबंधात वाड्ःमय चौर्य केल्याप्रकरणी किशोर धाबे यांची पीएच.डी. पदवी रद्द करण्याच्या घेतलेल्या निर्णयास डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल रमेश बैस यांनी मान्यता दिली आहे. विद्यापीठाच्या ६५ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच पीएच.डी. पदवी रद्द होण्याची घटना घडली आहे.

विद्यापीठातील राज्यशास्त्र विषयात किशोर निवृत्ती धाबे यांनी ’ किनवट तालुक्यातील आदिवासी नेतृत्व आणि आदिवासींसाठीच्या कल्याणकारी ध्येय-धोरणांची अंमलबजावणी ’ या विषयात संशोधन केले. या संशोधनाचा शोधप्रबंध २०१३ मध्ये सादर केला. त्यानुसार त्यांना विद्यापीठाकडून पीएच.डी. पदवी मिळाली. या शोध प्रबंधात वाड्ःमय चौर्य केल्याची तक्रार कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांच्याकडे पुरुषोत्तम रामटेके यांनी पुराव्यासह दाखल केली होती. डॉ. मारोती तेगमपुरे व देशमुख यांच्या शोध प्रबंधातील मजकूर चोरल्याचे तक्रारीत म्हटले होते. त्यानुसार कुलगुरू डॉ. येवले यांनी डॉ. धर्मराज वीर, डॉ. शूजा शाकेर व डॉ. मृदुल निळे या तीन सदस्यांची विभागांतर्गत चौकशी समिती नेमली.

या समितीने सदर शोध प्रबंधात ५१ टक्के वाड्ःमय चौर्य झाल्याचा अहवाल दिला. त्यानंतर प्र-कुलगुरु डॉ. श्याम शिरसाठ यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय विद्यापीठस्तरीय सत्यशोधन समितीनेही चौकशी केली. त्यात ६५ टक्के वाड्ःमय चौर्य केल्याचा निष्कर्ष काढला. त्यानंतर व्यवस्थापन परिषद, विद्या परिषदेच्या बैठकीत सर्वानुमते हा अहवाल स्वीकारून पीएच.डी. रद्द करण्यास संमती दिली. त्यानंतर पदवी रद्द करण्याची शिफारस कुलपती रमेश बैस यांच्याकडे करण्यात आली. कुलपतींनी मागील महिन्यात त्यावर सुनावणी घेतली. त्यात विद्यापीठ प्रशासनाचा निर्णय मान्य करून पीएच.डी. रद्द करण्यास मंजुरी दिली. त्याविषयीची माहिती ‘राजभवन’ चे अप्पर सचिव विकास कुलकर्णी यांनी कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांना पत्राद्वारे दिली.

गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रयत्नशीलचार वर्षांच्या कुलगुरू पदाच्या कार्यकाळात शैक्षणिक गुणवत्ता व पायाभूत सुविधांची कठोर अंमलबजावणी केली. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशाप्रमाणे संशोधनाचा दर्जा व गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रयत्न करीत आहोत.- डॉ. प्रमोद येवले, कुलगुरू

संशोधकांनी गांभीर्याने नोंद घ्यावीसंशोधनातील वाड्ःमय चौर्य करण्याचा प्रकार अत्यंत गंभीर असून संशोधकांनी यांची गांभीर्याने नोंद घेतली पाहिजे. अशा घटनांमुळे शैक्षणिक क्षेत्राचे मोठे नुकसान होत आहे. संशोधकांनी अत्यंत गांभीर्याने संशोधन कार्य करावे, तसेच नेमकी तथ्य व निष्कर्ष मांडावेत.- डॉ. श्याम शिरसाठ, प्रकुलगुरू

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादRamesh Baisरमेश बैसEducation Sectorशिक्षण क्षेत्र