शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

मोठी बातमी! कॉपी-पेस्ट प्रबंधावरून संशोधकास दणका, कुलपतींनी केली पीएचडी पदवी रद्द

By राम शिनगारे | Updated: October 26, 2023 12:53 IST

विद्यापीठाच्या ६५ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच पीएच.डी. पदवी रद्द होण्याची घटना घडली आहे.

छत्रपती संभाजीनगर : पीएच.डी. च्या संशोधन प्रबंधात वाड्ःमय चौर्य केल्याप्रकरणी किशोर धाबे यांची पीएच.डी. पदवी रद्द करण्याच्या घेतलेल्या निर्णयास डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल रमेश बैस यांनी मान्यता दिली आहे. विद्यापीठाच्या ६५ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच पीएच.डी. पदवी रद्द होण्याची घटना घडली आहे.

विद्यापीठातील राज्यशास्त्र विषयात किशोर निवृत्ती धाबे यांनी ’ किनवट तालुक्यातील आदिवासी नेतृत्व आणि आदिवासींसाठीच्या कल्याणकारी ध्येय-धोरणांची अंमलबजावणी ’ या विषयात संशोधन केले. या संशोधनाचा शोधप्रबंध २०१३ मध्ये सादर केला. त्यानुसार त्यांना विद्यापीठाकडून पीएच.डी. पदवी मिळाली. या शोध प्रबंधात वाड्ःमय चौर्य केल्याची तक्रार कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांच्याकडे पुरुषोत्तम रामटेके यांनी पुराव्यासह दाखल केली होती. डॉ. मारोती तेगमपुरे व देशमुख यांच्या शोध प्रबंधातील मजकूर चोरल्याचे तक्रारीत म्हटले होते. त्यानुसार कुलगुरू डॉ. येवले यांनी डॉ. धर्मराज वीर, डॉ. शूजा शाकेर व डॉ. मृदुल निळे या तीन सदस्यांची विभागांतर्गत चौकशी समिती नेमली.

या समितीने सदर शोध प्रबंधात ५१ टक्के वाड्ःमय चौर्य झाल्याचा अहवाल दिला. त्यानंतर प्र-कुलगुरु डॉ. श्याम शिरसाठ यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय विद्यापीठस्तरीय सत्यशोधन समितीनेही चौकशी केली. त्यात ६५ टक्के वाड्ःमय चौर्य केल्याचा निष्कर्ष काढला. त्यानंतर व्यवस्थापन परिषद, विद्या परिषदेच्या बैठकीत सर्वानुमते हा अहवाल स्वीकारून पीएच.डी. रद्द करण्यास संमती दिली. त्यानंतर पदवी रद्द करण्याची शिफारस कुलपती रमेश बैस यांच्याकडे करण्यात आली. कुलपतींनी मागील महिन्यात त्यावर सुनावणी घेतली. त्यात विद्यापीठ प्रशासनाचा निर्णय मान्य करून पीएच.डी. रद्द करण्यास मंजुरी दिली. त्याविषयीची माहिती ‘राजभवन’ चे अप्पर सचिव विकास कुलकर्णी यांनी कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांना पत्राद्वारे दिली.

गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रयत्नशीलचार वर्षांच्या कुलगुरू पदाच्या कार्यकाळात शैक्षणिक गुणवत्ता व पायाभूत सुविधांची कठोर अंमलबजावणी केली. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशाप्रमाणे संशोधनाचा दर्जा व गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रयत्न करीत आहोत.- डॉ. प्रमोद येवले, कुलगुरू

संशोधकांनी गांभीर्याने नोंद घ्यावीसंशोधनातील वाड्ःमय चौर्य करण्याचा प्रकार अत्यंत गंभीर असून संशोधकांनी यांची गांभीर्याने नोंद घेतली पाहिजे. अशा घटनांमुळे शैक्षणिक क्षेत्राचे मोठे नुकसान होत आहे. संशोधकांनी अत्यंत गांभीर्याने संशोधन कार्य करावे, तसेच नेमकी तथ्य व निष्कर्ष मांडावेत.- डॉ. श्याम शिरसाठ, प्रकुलगुरू

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादRamesh Baisरमेश बैसEducation Sectorशिक्षण क्षेत्र