शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

मोठी बातमी! औरंगाबाद महापालिकेची निवडणूक थेट पुढील वर्षीच जाणार, दुसऱ्या टप्प्यात समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2022 16:13 IST

१४ महापालिकांची निवडणूक पहिल्या टप्प्यात, औरंगाबादचा दुसऱ्या टप्प्यात समावेश 

औरंगाबाद : राज्य निवडणूक आयोगाने महापालिकांच्या निवडणूक प्रक्रियेला मंगळवारपासून सुरुवात केली. राज्यातील १४ महापालिकांची निवडणूक पहिल्या टप्प्यात घेण्यात येणार असून, औरंगाबादसह इतर महापालिकांची निवडणूक दुसऱ्या टप्प्यात होईल, हे निश्चित. राज्यातील १४ महापालिकांच्या अंतिम प्रभाग रचना राजपत्रात प्रसिद्ध करण्यास सुरुवातही केली.

सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुका घेण्याचे आदेश ४ मे रोजी निवडणूक आयोगाला दिले. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश प्राप्त होताच निवडणूक आयोगाने ११ मार्च २०२२ पर्यंत निवडणुकीच्या अनुषंगाने केलेली कारवाई पुढे सुरू केली. १० मे राेजी राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील १४ महापालिकांसाठी एक आदेश काढला. या आदेशात संबंधित महापालिकांची अंतिम प्रभाग रचना राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. प्रभाग रचना राजपत्रात अंतिम केल्यानंतर लगेच निवडणूक कार्यक्रम घोषित होऊ शकतो.

पावसाळ्यात निवडणुका घेणे शक्य नाही. त्यामुळे पावसाळा संपताच त्या होतील, अशी अपेक्षा आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय पहिल्यांदाच राज्यातील महापालिका निवडणुका होतील, असे आतापर्यंतचे तरी चित्र आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नयेत, अशी सरकारची अपेक्षा आहे. त्यासाठी शासनाने निवडणुका घेण्यासंबंधीचे सर्व अधिकार आपल्याकडे घेतले होते. मात्र ते कायद्याच्या चौकटीत बसले नाही.

१४ महापालिका कोणत्या?नवी मुंबई, वसई-विरार, उल्हासनगर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, नागपूर, सोलापूर, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड, कल्याण-डोंबिवली, बृहन्मुंबई व ठाणे.

दुसऱ्या टप्प्यातील महापालिकाभिवंडी-निझामपूर, पनवेल, मीरा-भाईंदर, मालेगाव, परभणी, औरंगाबाद, नांदेड, नांदेड- वाघाळा, लातूर, चंद्रपूर.

औरंगाबादची स्थितीराज्य निवडणूक आयोगाने दोन दिवसांपूर्वीच औरंगाबाद महापालिका प्रशासनाला नव्याने प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. त्या दृष्टीने मंगळवारपासून प्रशासन कामाला लागले आहे. १७ मे पर्यंत प्रारूप आराखडा आयोगाला सादर करण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहेत. नियोजित वेळेत आराखडा तयार न झाल्यास मनपाकडून आणखी वेळ वाढवून मागितला जाईल.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाElectionनिवडणूक