शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

इसिस आणि नक्षलींचा हिंसाचार रोखण्याचे मोठे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 18:58 IST

लोकसभा निवडणुकीसाठी पोलीस प्रशासनाने उत्तम तयारी केल्याचा पोलीस महासंचालकांचा दावा 

औरंगाबाद : इसिस आणि नक्षली विचाराने प्रभावित होऊन दहशतवादी कृत्य करणाऱ्यांना शोधून त्यांचे मनसुबे धुळीस मिळविण्याचे मोठे आव्हान पोलीस यंत्रणेसमोर आहे. इसिस आणि नक्षली विचाराने प्रभावित होणाऱ्या तरुणांचे समपुदेशन करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम आम्ही करीत असून, यात आम्ही यशस्वी होऊ, असा विश्वास राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

लोकसभा निवडणुकीसाठी पोलीस प्रशासनाच्या तयारीचा आढावा बैठकीसाठी पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल हे औरंगाबादेत आले होते. पोलीस आयुक्तालयात झालेल्या बैठकीसाठी विशेष पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) मिलिंद भारंबे, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र सिंगल, नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक आणि आठ जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षक आणि शहरातील उपायुक्तांची उपस्थिती होती. बैठकीनंतर जयस्वाल यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, लोकसभेची निवडणूक निर्भय आणि मुक्त वातावरणात करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. आजच्या बैठकीत मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघांच्या निवडणुकीची तयारी संबंधित पोलीसप्रमुखांकडून जाणून घेण्यात आली. निवडणुका होईपर्यंत पोलिसांना युद्धपातळीवर काम करावे लागणार आहे. पोलिसांना कायद्यानुसार कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

औरंगाबाद शहरात गतवर्षी लहान-मोठ्या चार दंगली झाल्या होत्या, या पार्श्वभूमीवर औरंगाबादेतील निवडणुकीसाठी जास्त पोलीस बल देणार का, असे विचारले असता महासंचालक म्हणाले की, पोलीस आयुक्तांनी केलेल्या मागणीनुसार त्यांना हवे तेवढे मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाणार आहे. मराठवाड्यातील कोणता मतदारसंघ तुम्हाला संवेदनशील वाटला, या प्रश्नाचे उत्तर देण्याचे त्यांनी टाळले. राज्यात दोन जातींमध्ये तेढ निर्माण करून निवडणूक कालावधीत वातावरण खराब करण्याचा काही लोकांचा प्रयत्न असल्याबाबतचा गुप्तचर संस्थांकडून काही अहवाल आला आहे का, या प्रश्नाचे थेट उत्तर न देता त्यांनी गुप्तचर यंत्रणांकडून येणाऱ्या अहवालांवर आम्ही कार्यवाही करीत असतो, असे सांगितले.

पदानवत केलेल्या उपनिरीक्षकांबाबत माहिती घेतो२०१३ मध्ये खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षकपदाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सुमारे चौदा हजार पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस उपनिरीक्षक पदावरून पदावनत करण्यात आले आहे. त्यांना पोलीस उपनिरीक्षकपदी कायमस्वरूपी पदस्थापना कधी देणार, असा प्रश्न विचारला असता, ते म्हणाले की, हा विषय मला माहिती नाही, मला माहिती घेऊ न अभ्यास करावा लागेल.

लोकसभा निवडणूक निर्भय आणि मुक्त वातावरणात होईल लोकसभा निवडणूक निर्भय आणि मुक्त वातावरणात व्हावी, यासाठी पोलीस यंत्रणा समर्थ आणि सज्ज आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार काय करावे, याबाबतच्या सूचना याआधीच पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्तांना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार समाजकंटकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करणे, नाकाबंदी करणे, हॉटेल्स, वाहने आणि लॉजेची तपासणी करणे आदी कामे सुरू करण्यात आली.

सोशल मीडियाविषयी तक्रार आल्यास कारवाईलोकसभा निवडणुकीचा प्रचार सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणात केला जात आहे. यामुळे सोशल मीडियावर नजर ठेवण्यासाठी स्वतंत्र सेल स्थापन केला आहे का, या प्रश्नाचे उत्तर देताना महासंचालक म्हणाले की, सोशल मीडियावर काही आक्षेपार्ह मजकूर कोणी टाकला आणि याबाबत तक्रार आली तर पोलिसांकडून कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे. 

टॅग्स :PoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्रAurangabadऔरंगाबाद