शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

इसिस आणि नक्षलींचा हिंसाचार रोखण्याचे मोठे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 18:58 IST

लोकसभा निवडणुकीसाठी पोलीस प्रशासनाने उत्तम तयारी केल्याचा पोलीस महासंचालकांचा दावा 

औरंगाबाद : इसिस आणि नक्षली विचाराने प्रभावित होऊन दहशतवादी कृत्य करणाऱ्यांना शोधून त्यांचे मनसुबे धुळीस मिळविण्याचे मोठे आव्हान पोलीस यंत्रणेसमोर आहे. इसिस आणि नक्षली विचाराने प्रभावित होणाऱ्या तरुणांचे समपुदेशन करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम आम्ही करीत असून, यात आम्ही यशस्वी होऊ, असा विश्वास राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

लोकसभा निवडणुकीसाठी पोलीस प्रशासनाच्या तयारीचा आढावा बैठकीसाठी पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल हे औरंगाबादेत आले होते. पोलीस आयुक्तालयात झालेल्या बैठकीसाठी विशेष पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) मिलिंद भारंबे, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र सिंगल, नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक आणि आठ जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षक आणि शहरातील उपायुक्तांची उपस्थिती होती. बैठकीनंतर जयस्वाल यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, लोकसभेची निवडणूक निर्भय आणि मुक्त वातावरणात करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. आजच्या बैठकीत मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघांच्या निवडणुकीची तयारी संबंधित पोलीसप्रमुखांकडून जाणून घेण्यात आली. निवडणुका होईपर्यंत पोलिसांना युद्धपातळीवर काम करावे लागणार आहे. पोलिसांना कायद्यानुसार कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

औरंगाबाद शहरात गतवर्षी लहान-मोठ्या चार दंगली झाल्या होत्या, या पार्श्वभूमीवर औरंगाबादेतील निवडणुकीसाठी जास्त पोलीस बल देणार का, असे विचारले असता महासंचालक म्हणाले की, पोलीस आयुक्तांनी केलेल्या मागणीनुसार त्यांना हवे तेवढे मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाणार आहे. मराठवाड्यातील कोणता मतदारसंघ तुम्हाला संवेदनशील वाटला, या प्रश्नाचे उत्तर देण्याचे त्यांनी टाळले. राज्यात दोन जातींमध्ये तेढ निर्माण करून निवडणूक कालावधीत वातावरण खराब करण्याचा काही लोकांचा प्रयत्न असल्याबाबतचा गुप्तचर संस्थांकडून काही अहवाल आला आहे का, या प्रश्नाचे थेट उत्तर न देता त्यांनी गुप्तचर यंत्रणांकडून येणाऱ्या अहवालांवर आम्ही कार्यवाही करीत असतो, असे सांगितले.

पदानवत केलेल्या उपनिरीक्षकांबाबत माहिती घेतो२०१३ मध्ये खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षकपदाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सुमारे चौदा हजार पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस उपनिरीक्षक पदावरून पदावनत करण्यात आले आहे. त्यांना पोलीस उपनिरीक्षकपदी कायमस्वरूपी पदस्थापना कधी देणार, असा प्रश्न विचारला असता, ते म्हणाले की, हा विषय मला माहिती नाही, मला माहिती घेऊ न अभ्यास करावा लागेल.

लोकसभा निवडणूक निर्भय आणि मुक्त वातावरणात होईल लोकसभा निवडणूक निर्भय आणि मुक्त वातावरणात व्हावी, यासाठी पोलीस यंत्रणा समर्थ आणि सज्ज आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार काय करावे, याबाबतच्या सूचना याआधीच पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्तांना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार समाजकंटकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करणे, नाकाबंदी करणे, हॉटेल्स, वाहने आणि लॉजेची तपासणी करणे आदी कामे सुरू करण्यात आली.

सोशल मीडियाविषयी तक्रार आल्यास कारवाईलोकसभा निवडणुकीचा प्रचार सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणात केला जात आहे. यामुळे सोशल मीडियावर नजर ठेवण्यासाठी स्वतंत्र सेल स्थापन केला आहे का, या प्रश्नाचे उत्तर देताना महासंचालक म्हणाले की, सोशल मीडियावर काही आक्षेपार्ह मजकूर कोणी टाकला आणि याबाबत तक्रार आली तर पोलिसांकडून कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे. 

टॅग्स :PoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्रAurangabadऔरंगाबाद