पुन्हा बीडच भारी!
By Admin | Updated: June 18, 2014 01:41 IST2014-06-17T23:05:48+5:302014-06-18T01:41:20+5:30
व्यंकटेश वैष्णव , बीड बारावीपाठोपाठ दहावीच्या परीक्षेतही बीड जिल्ह्याने आपला दबदबा कायम राखला़

पुन्हा बीडच भारी!
व्यंकटेश वैष्णव , बीड
बारावीपाठोपाठ दहावीच्या परीक्षेतही बीड जिल्ह्याने आपला दबदबा कायम राखला़ गतवर्षी विभागात अव्वलस्थान पटकावणाऱ्या बीडने यावर्षी ९१ टक्के गुणांसह क्रमांक एकचे स्थान कायम राखले़ त्यामुळे मंगळवारी जाहीर झालेल्या निकालात बीडचेच विद्यार्थी भारी ठरले आहेत़
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च २०१४ मध्ये परीक्षा पार पडल्या़ बीड जिल्ह्यातील ३५ हजार ५४८ मुलामुलींनी ही परीक्षा दिली होती. त्यापैकी ३२ हजार ६६० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. बीडच्या निकालाचा टक्का ९१़८८ इतका आहे़ ही टक्केवारी विभागात सर्वाधिक आहे. विभागात बीड खालोखाल जालना जिल्ह्याचा निकाल ८८.४५ टक्के, औरंगाबाद ८८.१४ टक्के, हिंगोली ८०.८३ व परभणी ७९़१६ टक्के इतका लागला. विशेष म्हणजे विभागाची एकून टक्केवारी ८७.०६ इतकी असून त्यापेक्षाही बीड चार टक्क्यांनी पुढे आहे़ त्यामुळे जिल्ह्यातीलच विद्यार्थी हुशार असल्याचे सिद्ध झाले़
मुलींनी पटकावले अव्वलस्थान
जिल्ह्यातील १९ हजार ३४३ मुले व १३ हजार ३१७ मुली असे एकूण ३२ हजार ६६० विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले़ उत्तीर्ण होण्याची मुलांची टक्केवारी ९०़७१ इतकी आहे तर मुलींची टक्केवारी ९३़६२ टक्के इतकी आहे़ जिल्ह्यातील १४ हजार २२४ मुलींनी तर २१ हजार ३२४ मुलांनी ही परीक्षा दिली़
जिल्ह्यात मुलांच्या तुलनेत मुलीच सरस ठरल्या. बीडमध्ये मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९०़७१ तर मुलींची ९३़६२ इतकी आहे़
औरंगाबाद जिल्ह्यातील मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९१.०२ टक्के, परभणीची टक्केवारी ८३.१० , जालन्याची ८८.४५ व हिंगोलीतील मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ८४.०९ इतकी आहे.
मुलींनी वाढविली जिल्ह्याची शान
विभागाची टक्केवारी
औरंगाबाद८८.१४
बीड९१.८८
परभणी७९.१६
जालना८८.४५
हिंगोली८०.८३
एकूण८७.०६
तालुका निहाय
निकालाची टक्केवारी
बीड९४़२९
पाटोदा९३.९७
आष्टी९४.२७
गेवराई९३.७१
माजलगाव८३.५३
अंबाजोगाई८८.८२
केज९३.७०
परळी९०.४८
धारूर८८.२२
शिरूर९३.३३
वडवणी९५.७१