शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

भीमा - कोरेगावातील तणावाचे औरंगाबादेत पडसाद; शहरात पोलीस बंदोबस्तात वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2018 20:06 IST

शहराच्या वेगवेगळ्या भागात जमावाने दगडफेक केली आणि बळजबरीने दुकाने बंद करायला लावल्याने शहरात तणाव निर्माण झाला. यापार्श्वभूमीवर शहर पोलीस अलर्ट झाले राज्य राखीव दलाच्या मदत घेत शहरातील बंदोबस्तात वाढ केली.

ठळक मुद्देपुणे जिल्ह्यातील भीमा -कोरेगाव येथे फलक लावण्यावरून झालेल्या दगडफेक आणि  तणावाचे तीव्र पडसाद सोमवारी सायंकाळी उमटले. पुणे जिल्ह्यातील भीमा -कोरेगाव येथे फलक लावण्यावरून झालेल्या दगडफेक आणि  तणावाचे तीव्र पडसाद सोमवारी सायंकाळी उमटले. यापार्श्वभूमीवर शहर पोलीस अलर्ट झाले राज्य राखीव दलाच्या मदत घेत शहरातील बंदोबस्तात वाढ केली.

औरंगाबाद : पुणे जिल्ह्यातील भीमा -कोरेगाव येथे फलक लावण्यावरून झालेल्या दगडफेक आणि  तणावाचे तीव्र पडसाद सोमवारी सायंकाळी उमटले.पुणे जिल्ह्यातील भीमा -कोरेगाव येथे फलक लावण्यावरून झालेल्या दगडफेक आणि  तणावाचे तीव्र पडसाद सोमवारी सायंकाळी उमटले. यापार्श्वभूमीवर शहर पोलीस अलर्ट झाले राज्य राखीव दलाच्या मदत घेत शहरातील बंदोबस्तात वाढ केली.

दुपारी ४ वाजेच्या सुमारास सिल्लोकडून आलेल्या मलकापूर -औरंगाबाद मशीद परिसरात दोन  आणि शिवाजीनगर येथे एक अशा तीन एस.टी.बसवर दगडफेक करण्यात आली. शिवाय उस्मानपुरा रोडवरील एक शो रूमवर जमावाने दगड भिरकावल्याने शोरूमच्या प्रवेदशदाराची काच फुटली. यानंतर हा जमावाने क्रांतीचौक, उस्मानपुरा ते पीर बजार रस्त्यावरील दुकाने बंद केली. टी.व्ही.सेंटर, येथे सुमारे हजार लोकांचा जमावर रस्त्यावर  आला. यावेळी तेथील होर्डिंग जमावाने पाडून टाकले. यानंतर जमाव भाजी मार्केटमध्ये घुसला. तेथील भाजीपाल्याची दुकाने आणि हातगाड्या उलट्या करून पुढे गेला. यामुळे लहान-मोठे दुकानदारांमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला. जयभवानीनगर येथील एका बँकेच्या एटीएम सेंटरवर दगडफेक करून प्रवेशद्वाराच्या काचा फोडण्यात आल्या.

त्रिमूर्ती चौक, नक्षत्रवाडी, कांचनवाडी, येथील दुकानाच्या काचा फोडण्यात आल्याने दुकानदारांनी आपली दुकाने बंद केली. मुकुंदवाडी,रामनगर येथील लाईफ केअर हॉस्पिटलवर दगडफेक, कॅनाट मार्केटमध्येही दुकाने बंद करायला लावल्याने शहरात तणाव निर्माण झाला. याबाबत माहिती मिळताच पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे, सहायक आयुक्त नागनाथ कोडे, सहायक आयुक्त गोवर्धन कोळेकर,गुन्हेशाखेचे निरीक्षक  शिवाजी कांबळे,पोलीस निरीक्षक श्रीकांत परोपकारी,पोलीस निरीक्षक प्रेमसागर चंद्रमोरे , पोलीस निरीक्षक हेमंत कदम आणि राज्य राखीव दलाचे जवानांनी नागरीकांना शांत राहण्याचे आवाहन केले. शहरात निव्वळ अफवां सुरू होत्या. कोणी वाहने पेटविल्याची अफवा पसरवित होते तर काही जण दुकाने फोडल्याची चर्चा करीत होते. नागरीकांनी अफवावर विश्वास ठेवू नये,शांतता राखावी,असे आवाहन पोलीस उपायुक्त ढाकणे यांनी केले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPoliceपोलिस