शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
5
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
6
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
7
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
8
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
9
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
10
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
11
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
12
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
13
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
14
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
15
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
16
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
17
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
18
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
19
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
20
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?

भीमा - कोरेगावातील तणावाचे औरंगाबादेत पडसाद; शहरात पोलीस बंदोबस्तात वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2018 20:06 IST

शहराच्या वेगवेगळ्या भागात जमावाने दगडफेक केली आणि बळजबरीने दुकाने बंद करायला लावल्याने शहरात तणाव निर्माण झाला. यापार्श्वभूमीवर शहर पोलीस अलर्ट झाले राज्य राखीव दलाच्या मदत घेत शहरातील बंदोबस्तात वाढ केली.

ठळक मुद्देपुणे जिल्ह्यातील भीमा -कोरेगाव येथे फलक लावण्यावरून झालेल्या दगडफेक आणि  तणावाचे तीव्र पडसाद सोमवारी सायंकाळी उमटले. पुणे जिल्ह्यातील भीमा -कोरेगाव येथे फलक लावण्यावरून झालेल्या दगडफेक आणि  तणावाचे तीव्र पडसाद सोमवारी सायंकाळी उमटले. यापार्श्वभूमीवर शहर पोलीस अलर्ट झाले राज्य राखीव दलाच्या मदत घेत शहरातील बंदोबस्तात वाढ केली.

औरंगाबाद : पुणे जिल्ह्यातील भीमा -कोरेगाव येथे फलक लावण्यावरून झालेल्या दगडफेक आणि  तणावाचे तीव्र पडसाद सोमवारी सायंकाळी उमटले.पुणे जिल्ह्यातील भीमा -कोरेगाव येथे फलक लावण्यावरून झालेल्या दगडफेक आणि  तणावाचे तीव्र पडसाद सोमवारी सायंकाळी उमटले. यापार्श्वभूमीवर शहर पोलीस अलर्ट झाले राज्य राखीव दलाच्या मदत घेत शहरातील बंदोबस्तात वाढ केली.

दुपारी ४ वाजेच्या सुमारास सिल्लोकडून आलेल्या मलकापूर -औरंगाबाद मशीद परिसरात दोन  आणि शिवाजीनगर येथे एक अशा तीन एस.टी.बसवर दगडफेक करण्यात आली. शिवाय उस्मानपुरा रोडवरील एक शो रूमवर जमावाने दगड भिरकावल्याने शोरूमच्या प्रवेदशदाराची काच फुटली. यानंतर हा जमावाने क्रांतीचौक, उस्मानपुरा ते पीर बजार रस्त्यावरील दुकाने बंद केली. टी.व्ही.सेंटर, येथे सुमारे हजार लोकांचा जमावर रस्त्यावर  आला. यावेळी तेथील होर्डिंग जमावाने पाडून टाकले. यानंतर जमाव भाजी मार्केटमध्ये घुसला. तेथील भाजीपाल्याची दुकाने आणि हातगाड्या उलट्या करून पुढे गेला. यामुळे लहान-मोठे दुकानदारांमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला. जयभवानीनगर येथील एका बँकेच्या एटीएम सेंटरवर दगडफेक करून प्रवेशद्वाराच्या काचा फोडण्यात आल्या.

त्रिमूर्ती चौक, नक्षत्रवाडी, कांचनवाडी, येथील दुकानाच्या काचा फोडण्यात आल्याने दुकानदारांनी आपली दुकाने बंद केली. मुकुंदवाडी,रामनगर येथील लाईफ केअर हॉस्पिटलवर दगडफेक, कॅनाट मार्केटमध्येही दुकाने बंद करायला लावल्याने शहरात तणाव निर्माण झाला. याबाबत माहिती मिळताच पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे, सहायक आयुक्त नागनाथ कोडे, सहायक आयुक्त गोवर्धन कोळेकर,गुन्हेशाखेचे निरीक्षक  शिवाजी कांबळे,पोलीस निरीक्षक श्रीकांत परोपकारी,पोलीस निरीक्षक प्रेमसागर चंद्रमोरे , पोलीस निरीक्षक हेमंत कदम आणि राज्य राखीव दलाचे जवानांनी नागरीकांना शांत राहण्याचे आवाहन केले. शहरात निव्वळ अफवां सुरू होत्या. कोणी वाहने पेटविल्याची अफवा पसरवित होते तर काही जण दुकाने फोडल्याची चर्चा करीत होते. नागरीकांनी अफवावर विश्वास ठेवू नये,शांतता राखावी,असे आवाहन पोलीस उपायुक्त ढाकणे यांनी केले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPoliceपोलिस