शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
2
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
3
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
4
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
5
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
6
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
7
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
8
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
9
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
10
भाजपचे माजी नगरसेवक हरेश केणी यांचा कॉग्रेस मध्ये प्रवेश
11
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
12
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
13
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
14
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
15
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
16
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
17
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
20
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज

दुष्काळाच्या नावाने चांगभलं! मराठवाड्यात अतिवृष्टीच्या काळातही टँकरचा मारा, करोडो खर्च

By विकास राऊत | Updated: November 16, 2022 16:12 IST

मराठवाड्यात टँकर घोटाळ्याचा शोध सुरू, गेल्या चार वर्षांत हजार मिमीपेक्षा जास्त पाऊस पडूनही टँकरद्वारे पुरविले पाणी

औरंगाबाद : मराठवाड्यात दुष्काळाच्या नावाने टँकर लॉबीचे चांगभलं झाल्याची चर्चा वारंवार होते. मागील चार वर्षांत विभागात पर्जन्यमान सरासरी १ हजार मिलीमीटरच्या पुढे गेले असतानाही या काळात टँकरने पाणीपुरवठ्यावर विभागात कोट्यवधींचा खर्च झाला आहे. यात २०१८ ते २०२२ या काळात अंदाजे ३०० ते ४०० कोटी रुपयांच्या आसपासची रक्कम टँकरद्वारे पाणी पुरविण्यावर खर्च झाल्याचा संशय आहे. याबाबत विधानसभा अधिवेशनात बीडमधील लोकप्रतिनिधींनी तारांकित प्रश्न उपस्थित केल्यानंतर शासनाने सत्यता पडताळणीचे आदेश दिले आहेत.

शासनाच्या आदेशानंतर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी सुमारे ४०० अधिकाऱ्यांची तालुकानिहाय माहिती संकलनासाठी नियुक्ती केली आहे. लेखाधिकारी, सहायक लेखाधिकारी, महसूल कर्मचाऱ्यांचा त्यात समावेश आहे. औरंगाबाद जिल्ह्यासाठी ५५ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे अधिकारी गटविकास अधिकारी कार्यालयात जाऊन टँकर कसे लावले, सुरू कधी केले, किती फेऱ्या झाल्या, याची चौकशी करून त्याचा अहवाल सादर करणार आहेत.

मराठवाड्यात १० वर्षांत शहरी व ग्रामीण भागातील १० पाणीपुरवठा योजनांच्या कामांचा खर्च टँकर लॉबीला दिला आहे. दुष्काळाची इष्टापत्ती करण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा करण्यापलीकडे दुसरी कुठलाही उपाय प्रशासकीय पातळीवर करण्यात आला नाही. परिणामी मराठवाड्यातील ८ हजार ५५० पैकी बहुतांश गावे आजही टंचाई सामना करीत आहेत. एकीकडे टँकरलॉबी पाच वर्षांत गब्बर झाली, तर दुसरीकडे पाच वर्षांत जाेरदार पाऊस होऊनही मराठवाड्यात टंचाईग्रस्त गावांचा आकडा कमी का होत नाही ? असा प्रश्न आहे. २०१५-१७ या दोन वर्षांत लातूरमध्ये थेट रेल्वेद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली. टँकरच्या खर्चाव्यतिरिक्त जलयुक्त शिवार योजनेतही मोठ्या प्रमाणात खर्च झालेला आहे. असे असताना मराठवाड्याला पिण्याचे पाणी कायमस्वरुपी मिळावे, यासाठी काहीही नियोजन होताना दिसून येत नाही.

दशकभरात ८०० कोटींचा खर्चमागील दहा वर्षांत ८०० कोटींचा खर्च टँकरने पाणीपुरवठा करण्यावर झाला आहे. २०१३ ते २०१७ या काळात टँकरने पाणीपुरवठा करण्यावर तब्बल ४०१ कोटींच्या आसपास रक्कम खर्च करण्यात आली. ९ हजार २६५ टँकरने मराठवाड्यातील सुमारे १ कोटी जनतेला पाणी पुरविल्याचा दावा त्यावेळी करण्यात आला होता. त्यापुढे २०१८ पासून २०२२ पर्यंतच्या काळात ४ हजार ८०१ टँकरवर अंदाजे ३९९ कोटींचा खर्च करून टँकरने पाणीपुरवठा करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. चौकशी फक्त याच काळातील होणार आहे.

२०१९ पासून पाऊस जास्त२०१९ पासून विभागाच्या सरासरीपेक्षा जास्तीचा पाऊस होतो आहे. या चारही पावसाळ्यात १ हजार मिली मीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. भूजल पातळीचे प्रमाणदेखील वाढले आहे. असे असताना टँकरने ग्रामीण भागात पाणी द्यावे लागले, हे विशेष.

वर्ष...........टँकर........अंदाजे खर्च२०१३........२१३६........७८२०१४........१४४४........४४२०१५........४०१५........२२९२०१६........ ९४०.........२५२०१७........२१८.........१०२०१८........९७३.........४५२०१९........३,४०२......२१०२०२०........३३२.........११७२०२२........९४...........४२एकूण.......१३,५५४....८००(खर्च कोटी रुपयांत)

टॅग्स :MarathwadaमराठवाडाAurangabadऔरंगाबादRainपाऊस