शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

औरंगाबादमध्ये विशेष घटक योजनेत अचानक वाढले विहिरीचे लाभार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 15:43 IST

विशेष घटक योजनेंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकर्‍यांना विहीर खोदण्यासाठी आतापर्यंत १ लाख रुपयांचे अनुदान दिले जात होते. तेव्हा एक लाखात विहिरीचे खोदकाम होत नसल्यामुळे लाभार्थ्यांनी या योजनेकडे कानाडोळा केला होता; परंतु मागील वर्षापासून हे अनुदान अडीच लाख रुपये झाल्याचे समजताच या योजनेचा लाभ घेण्यासाठी हजारो शेतकर्‍यांनी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडे अर्ज केले आहेत.

औरंगाबाद : विशेष घटक योजनेंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकर्‍यांना विहीर खोदण्यासाठी आतापर्यंत १ लाख रुपयांचे अनुदान दिले जात होते. तेव्हा एक लाखात विहिरीचे खोदकाम होत नसल्यामुळे लाभार्थ्यांनी या योजनेकडे कानाडोळा केला होता; परंतु मागील वर्षापासून हे अनुदान अडीच लाख रुपये झाल्याचे समजताच या योजनेचा लाभ घेण्यासाठी हजारो शेतकर्‍यांनी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडे अर्ज केले आहेत. तथापि, प्राप्त निधीतून मोजक्याच शेतकर्‍यांना लाभ देण्यासाठी कृषी विभागाने सोडत पद्धतीने विहिरींच्या अनुदानाचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. 

अनुसूचित जाती तसेच नवबौद्ध शेतकर्‍यांचा विकास होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी पूर्वी जि.प.च्या कृषी विभागामार्फत विशेष घटक योजनेंतर्गत विहीर खोदण्यासाठी १ लाख रुपयांचे अनुदान दिले जात होते. गेल्या वर्षापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन या नावे शासनाने सुधारित योजना आणली असून, अनुदानातही मोठी वाढ केली आहे. या योजनेंतर्गत अनुसूचित जाती तसेच नवबौद्ध शेतकर्‍यांना नवीन विहिरीसाठी अडीच लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येते. याशिवाय विहिरीसोबतच पंप संच, वीजजोडणी आकार व सूक्ष्म सिंचन संच (ठिबक अथवा तुषार) यासाठी एकत्रित अनुदान देण्यात येते. जुन्या विहिरींच्या दुरुस्तीसाठीही ५० हजार रुपयांपर्यंत लाभ देण्याची या योजनेत तरतूद आहे. 

मागील वर्षापर्यंत एका लाखामध्ये विहीर खोदण्याचे काम पूर्ण होत नसल्यामुळे मागासवर्गीय शेतकर्‍यांनी या योजनेकडे पाठ फिरवली होती. जि.प.च्या कृषी विभागाला विहिरीसाठी प्राप्त होणारा निधी अखर्चित राहत होता. ही बाब लक्षात घेता शासनाकडे अनुदान वाढवून देण्यासाठी अभ्यास समितीने शिफारस केली. त्यानुसार गेल्या आॅक्टोबरमध्ये  योजनेचे नाव बदलेले व अनुदानातही मोठी वाढ केली.  विहिरींसाठी १४ कोटींचा निधी प्राप्तयासंदर्भात कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत विहिरींसाठी आॅनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार २,७०० अर्ज प्राप्त झाले. अर्जांची छाननी सुरू आहे. यंदा या योजनेसाठी १४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, प्राप्त अनुदानानुसार सोडत पद्धतीनेच विहीर व पूरक साहित्याचा लाभ देण्याचा निर्णय घ्यावा लागणार आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीAurangabadऔरंगाबादWaterपाणी