शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
2
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
3
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
4
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
5
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
6
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
7
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
8
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
9
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
10
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
11
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
12
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
13
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
14
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
15
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
16
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
17
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
18
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
19
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
20
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
Daily Top 2Weekly Top 5

खंडपीठात शासनाकडून औरंगाबादच्या घनकचरा निर्मूलनावर कृती कार्यक्रम सादर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 13:33 IST

खंडपीठात सुनावणीदरम्यान राज्य शासन तसेच महानगरपालिकेच्या वतीने शहरात घनकचरा निर्मूलनासंदर्भात तात्कालिक आणि दीर्घकालीन, असे दोन्ही प्रत्यक्ष कृती कार्यक्रम सादर करण्यात आले.

औरंगाबाद : गेल्या महिन्यापासून शहरात साठलेल्या कचर्‍याचा प्रश्न निकाली काढण्याच्या अनुषंगाने आज न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. एस. एम. गव्हाणे यांच्या खंडपीठात सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान राज्य शासन तसेच महानगरपालिकेच्या वतीने शहरात घनकचरा निर्मूलनासंदर्भात तात्कालिक आणि दीर्घकालीन, असे दोन्ही प्रत्यक्ष कृती कार्यक्रम सादर करण्यात आले.खंडपीठाने दोन्ही शपथपत्रातील प्रत्येक मुद्यांवर सविस्तर खुलासा घेऊन अंमलबजावणीसंदर्भात आढावा घेण्याकरिता मंगळवारी (दि.२७ मार्च रोजी) पुढील सुनावणी ठेवली आहे.  

राज्य शासनाचे शपथपत्रराज्य शासनाच्या वतीने नगरविकास खात्याचे उपसचिव सुधाकर बोबडे यांनी शपथपत्र सादर केले. त्यात त्यांनी म्हटल्यानुसार शहरात कचरा व्यवस्थापनासाठीचा प्रकल्प उभारण्यासाठी केंद्र शासनाच्या भारत स्वच्छता अभियानाच्या नियमानुसार ८८ कोटी ८५ लाख रुपयांची आवश्यकता आहे. त्यापैकी ३१ कोटी ९ लाख रुपये केंद्र शासन देणार आहे. २० कोटी ७३ लाख रुपये राज्य शासन देणार आहे. तर ३७ कोटी २ लाख रुपये महापालिकेचा वाटा आहे, तोसुद्धा राज्य शासनच अदा करणार आहे. बुधवारी (दि.२१ मार्च) मुंबईला उच्चाधिकार समितीच्या झालेल्या बैठकीत औरंगाबाद महापालिकेच्या ‘डीपीआर’ला मंजुरी देण्यात आली आहे. महापालिकेने त्वरित काम करण्यासाठी राज्य शासनाने पहिला हप्ता म्हणून १० कोटी ३६ लाख रुपये त्यांच्या खात्यात वर्ग केले आहेत. 

महापालिकेने सादर केले शपथपत्रमहापालिकेने सादर केलेल्या शपथपत्रात कचरा व्यवस्थापनासाठीच्या निधीचा विनियोग कसा केला जाईल याची सविस्तर माहिती खंडपीठात सादर केली. त्यांनी नमूद केल्यानुसार सध्या शहरात रस्त्यावर साठलेला कचरा वेगळा करून ओल्या कचर्‍यावर प्रक्रिया करणार आहे. यासाठी ३.५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. अल्प मुदतीसाठी सुका कचरा वेगळा करण्याकरिता ११.८३ कोटी रुपये, ओल्या कचर्‍यापासून झोननिहाय २७ ठिकाणी खत बनविण्यासाठी ९.५ कोटी, ८ ठिकाणी सुका कचरा वेगळा करण्यासाठी शेड उभारण्याकरिता ६३ लाख, कचर्‍याच्या गाठी बनविण्याचे ८ बेलिंग यंत्र खरेदीसाठी २५.६० लाख, श्रेडर आणि ग्रॅन्युलेटर यंत्र खरेदीसाठी १.३० कोटी, कायम प्रकल्प म्हणून बायोगॅसच्या दहा प्लँटसाठी १२ कोटी रुपये, प्रोसेसिंग शेडसाठी १५.५ कोटी, ३०० टन प्रतिदिवशी कचर्‍यावर प्रोसेसिंग प्लँटसाठी ७ कोटी, उर्वरित कचर्‍यावर शास्त्रीय प्रक्रि यासाठी ३ कोटी आणि नारेगावमध्ये साठलेल्या कचर्‍यावर शास्त्रीय प्रक्रियासाठी २५ कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचे मनपाने शपथपत्रात म्हटले आहे.

टॅग्स :Aurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाState Governmentराज्य सरकारGarbage Disposal Issueकचरा प्रश्नNaregaon Garbage Depoनारेगाव कचरा डेपो