शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
2
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
3
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
4
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
5
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
6
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
7
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
8
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
9
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
10
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
11
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
12
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
13
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
14
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
15
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
16
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
17
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
18
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
19
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
20
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात

लहरी निसर्गासमोर बळीराजा हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 11:23 PM

यंदाही शेतकरी निसर्गासमोर हतबल झाला आहे. त्यातच अजूनही जिल्ह्यातील वीजप्रश्न सुटलेला नाही. रोहित्रासाठी शेतकºयांनी विविध पक्ष, संघटनेच्या वतीने महावितरणपर्यंत जाऊन मोर्चे, आंदोलने केली. मात्र त्याचाही काहीच परिणाम झाल्याचे दिसून येत नाही. अद्याप जिल्ह्यातील बरीच गावे अंधारात आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : यंदाही शेतकरी निसर्गासमोर हतबल झाला आहे. त्यातच अजूनही जिल्ह्यातील वीजप्रश्न सुटलेला नाही. रोहित्रासाठी शेतकºयांनी विविध पक्ष, संघटनेच्या वतीने महावितरणपर्यंत जाऊन मोर्चे, आंदोलने केली. मात्र त्याचाही काहीच परिणाम झाल्याचे दिसून येत नाही. अद्याप जिल्ह्यातील बरीच गावे अंधारात आहेत. त्यांना साधा मोबाईल जरी चार्च करायचा असेल तर शहरी ठिकाणी यावे लागत आहे. अशी भयंकर स्थिती निर्माण झालेली असतानाही त्या गावांना अद्याप रोहित्र मिळालेले नाही. त्यातच भयंकर प्रश्न म्हणजे निसर्गाच्या अवकृपेमुळे तोंडाशी आलेला घासही जाण्याची वेळ येऊन ठेपली आहे. विशेष म्हणजे सोयाबीन काढणीच्या वेळेस आलेल्या पावसाने जमिनीत ओल होती. शिवाय, अधूनमधून हजेरी लावलेल्या पावसानेही पाणीपातळी या काळापर्यंत टिकून राहिली होती. त्यामुळेच यंदा रबीच्या क्षेत्रात कमालाची वाढ झाली होती. मात्र केवळ आणि केवळ वीजपुरवठा खंडित केल्यामुळेच शेतकºयांना विहिरीत असलेले पाणीही देता येत नसल्याचे भयंकर चित्र आहे. त्यामुळे शेतकरी ट्रक्टरवर डायनोमा तयार करुन तीन ते चार विद्युत मोटारी चालवित आहेत. तर बहुतांश शेतकरी डिझेल इंजिनने शेती भिजविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र वातावरणातील बदलामुळे तेही हाती लागते की नाही, याची शाश्वती नाही.लोकमत न्यूज नेटवर्ककळमनुरी : मागील ३ ते ४ दिवसांपासून तालुक्यात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे सर्वच पिकांवर याचा परिणाम होत असून सध्या कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेला आहे.या हंगामात फक्त ५२ टक्केच पाऊस पडला आहे. त्यामुळे आतापासूनच जलस्तर घटत आहे. शेतकरी कापसाचे फरदड पीक घेत असल्याने या पिकांवर सेंद्रीय बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेला आहे. काही भागातील कापसावर घाटेअळीही लागली आहे. त्यामुळे कापसाच्या उत्पन्नावर मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. तुरीचे पीक हे सध्या कळी व फुल अवस्थेमध्ये आहे. या पिकांवर शेंगा पोखरणारी हिरवी अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकºयांनी ही अळी रोखण्यासाठी ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करणे गरजेचे असल्याचे तालुका कृषी अधिकारी गोविंद कल्याणपाड यांनी सांगितले. शेतकरी कापसाचे फरदड पीक घेत आहे. त्यामुळे कापसावर मोठ्या प्रमाणावर रोगराई पडत आहे. ढगाळ वातावरणामुळे हरभºयावर अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. कापसावर शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्यास त्यांचे व्यवस्थापन कसे कराव, याबाबत कृषी विभागाने पत्रके काढून शेतकºयांपर्यंत पोहाचवले आहे. सध्या रब्बीची पेरणी ८० ते ९० टक्के झाली आहे. काही गावात अजूनही गव्हाची पेरणी सुरू आहे. संरक्षित पाणी शेतकºयांनी खरीप व रबीच्या पिकांना देण्याचे आवाहन करण्यात आले. या हंगामात ५२ टक्केच पाऊस झाल्याने गव्हाची पेरणी कमी झाल्याचे चित्र दिसून येत आहे.