४२ केंद्रांवर कापूस खरेदीला सुरूवात
By Admin | Updated: November 17, 2015 00:32 IST2015-11-16T23:43:35+5:302015-11-17T00:32:11+5:30
बीड : कापूस खरेदी हंगामाला सुरूवात झाली असून, जिल्ह्यात ४२ केंद्रांवर कापूस खरेदीला गेल्या १५ दिवसांपासून सुरूवात झाली आहे.

४२ केंद्रांवर कापूस खरेदीला सुरूवात
बीड : कापूस खरेदी हंगामाला सुरूवात झाली असून, जिल्ह्यात ४२ केंद्रांवर कापूस खरेदीला गेल्या १५ दिवसांपासून सुरूवात झाली आहे. आतापर्यंत १ लाख ६९ हजार ८२३ क्विंटल कापसाची खरेदी झाली असल्याची माहिती समोर आली आहे.
कापूस हंगाम २०१५-१६ ला सुरूवात केली असून, आतापर्यंत केवळ बाजार समितीनेच कापूस खरेदीला सुरूवात केली आहे. सीसीआय कॉटन फेडरेशन व खासगी केंद्रांना अद्याप सुरूवात झाली नाही. मात्र, आगामी काळात ही केंद्रे लवकर सुरू होतील यात शंका नाही. बीड तालुक्यात ८, गेवराई - १०, माजलगाव - ६, धारूर - ४, परळी - ४, केज - २, वडवणी - २, कडा - ६ येथे कापूस खरेदी सुरू असून, ३१ आॅक्टोबर पर्यंत १ लाख ६९ हजार ८२३ क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा अधिक भाव मिळत नसल्याची ओरड शेतकऱ्यांमधून होत आहे. दुष्काळ पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या कापूस अधिक भावाने खरेदी जाईल अशी आशा होती. मात्र, ती आता फोल ठरत आहे. किमान ४२०० ते कमाल ४४०० रूपये असा भाव प्रतिक्ंिवटलला दिला जात आहे. हमी दर भाव ३८०० ते ४१०० रूपयांदरम्यान आहे. (प्रतिनिधी)
जिल्ह्यातील माजलगाव व गेवराई या भागात कापसाचे विक्रमी उत्पादन होते. गेवराई येथील कापूस परराज्यात विक्रीसाठी जातो.
४मात्र, यावर्षी दुष्काळ मुक्कामी असल्यामुळे उत्पादन कमी झाला असल्याचा अंदाज तज्ज्ञ व्यक्ती करीत आहेत.
४कापूस खरेदीचा हंगाम संपल्यानंतर गेल्या वर्षीची आणि या वर्षीच्या कापसाच्या खरेदीच्या तुलनेवरून किती फरक आला आहे याची आकडेवारी स्पष्ट होईल.
४शासनाने हमी भाव वाढवून द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे. बाजार समितीच्या परवानाधारक केंद्रांवर कापूस खरेदीला येणाऱ्यांची संख्याही कमी आहे.
४या ठिकाणावर अधिक भाव नाही मिळाला तर शेतकरी परराज्यात कापूस विक्री करतात हा जुना अनुभव आहे. परंतू सध्या कापूस बाहेर विक्रीसाठी नेण्यासारखी परिस्थिती नाही.
४जिल्ह्यातच चांगला भाव मिळाला तर शेतकऱ्यांना माल घेऊन इतरत्र जाण्याची गरज राहणार नाही.